AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विधानसभेला आघाडी किती जागा जिंकणार?, लोकसभेत भाजपच्या किती जागा कमी होणार?; राऊत यांनी पहिल्यांदाच दिलेला आकडा काय?

ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठा दावा केला आहे. राज्यात आज लोकसभा आणि विधानसभा निवडणुका झाल्यास महाविकास आघाडीला किती जागा मिळतील आणि भाजपच्या लोकसभा निवडणुकीत किती जागा कमी होतील याची माहिती राऊत यांनी दिली आहे.

विधानसभेला आघाडी किती जागा जिंकणार?, लोकसभेत भाजपच्या किती जागा कमी होणार?; राऊत यांनी पहिल्यांदाच दिलेला आकडा काय?
sanjay rautImage Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: Apr 19, 2023 | 11:08 AM
Share

मुंबई : ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला 40 जागा मिळणार असल्याचं यापूर्वी भाकीत केलं आहे. मात्र, यावेळी त्यांनी पहिल्यांदाच विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला किती जागा मिळणार याचं भाकीत केलं आहे. तसेच भाजपला लोकसभा निवडणुकीत किती जागांचा फटका बसेल याचं भाकीत करतानाच भाजपला कोणत्या कोणत्या राज्यात सर्वाधिक फटका बसेल यावरही राऊत यांनी मोठं भाष्य केलं आहे. त्यामुळे भाजपचं केंद्रातील सरकार जाणार की राहणार? अशी चर्चा रंगली आहे. संजय राऊत यांनी मीडियाशी बोलताना ही भविष्यवाणी केली आहे.

भाजपने मिंधे गटाबरोबर एक केमिकल लोचा करून ठेवला आहे. या राज्याचं संपूर्ण जनमत या केमिकल लोच्याविरोधात आहे. आता निवडणुका घ्या. हिंमत असेल तर… जशी महापालिकेची टाळाटाळ करता तशी विधानसभा निवडणुकीची टाळाटाळ करू नका. महाराष्ट्रात निवडणुका घेऊन दाखवा. विधानसभेच्या किमान 185 आणि लोकसभेच्या 40 जागा आम्ही जिंकणार आहोत. यासाठी कोणत्याही सर्व्हेची गरज नाही. अंतर्गत नाही आणि बाहेरच्या अशा कोणत्याही सर्व्हेची गरज नाही, असं संजय राऊत यांनी स्पष्ट केलं.

या राज्यात फटका बसणार

यावेळी लोकसभा निवडणुकीत भाजपला मोठा फटका बसणार असल्याचा दावाही त्यांनी केला. कोणत्या कोणत्या राज्यात भाजपला फटका बसेल याची माहितीही त्यांनी दिली आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, बिहार, पश्चिम बंगाल, तेलंगना, छत्तीसगड, झारखंड, मध्यप्रदेश, राजस्थान ही राज्य यावेळी भाजपच्या पाठिशी उभी राहणार नाहीत. भाजपला लोकसभेच्या किमान 100 ते 110 जागा कमी होतील. त्यासाठी सर्व्हेची गरज नाही, असा दावाही त्यांनी केला.

आम्हाला सर्व्हेची गरज नाही

तावडे समितीचा अहवाल आला आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. भाजपचा सर्व्हे बाहेर कसा आला? त्यावर आपण कशाला विश्वास ठेवायचा? असा सवाल करतानाच आम्हाला कोणत्याही सर्व्हेची गरज नाही. लोकभावना भाजपच्या विरोधात आहे. मिंधे गटाचा केमिकल लोचा झाला आहे, असंही त्यांनी सांगितलं.

20 लोक दगावले

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात 14 निरपराध लोकांचा मृत्यू झाला. फडणवीस विरोधी पक्षात असते तर एव्हाना नवी मुंबईत जाऊन पोलिसांसमोर त्यांनी धुडगूस घातला असता. आता ते सत्तेत आहेत. त्यांनी मुख्यमंत्र्यांचा राजीनामा मागावा. या 14 लोकांच्या मृत्यूची जबाबदारी शिंदे-फडणवीस सरकारचीच आहे, असं ते म्हणाले. महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यात उष्माघाताने आणि चेंगराचेंगरीमुळे 20 लोक दगावले. असंही त्यांनी सांगितलं.

Follow Us
ठरलं तर मग! 18 तारखेलाच... राम मंदिर, हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव
ठरलं तर मग! 18 तारखेलाच... राम मंदिर, हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंचा आक्रमक पवित्रा
अखेर प्रकरण पेटलंच! आधी दोन बेडरूम मागितले नंतर थेट... विनायक राऊत
अखेर प्रकरण पेटलंच! आधी दोन बेडरूम मागितले नंतर थेट... विनायक राऊतांच्या वक्तव्याने पुन्हा खळबळ
एसी लोकलमध्ये प्रवाशांचा जीव कोंडला! मुलुंड स्थानकावर महिलांसह अनेक
Mulund Railway Station | एसी लोकलमध्ये प्रवाशांचा जीव कोंडला! मुलुंड स्थानकावर महिलांसह अनेक...नेमकं काय घडलं?
अशी घटना पुन्हा घडू नये; ट्विट करत पवारांनी प्रशासनाला दिल्या सूचना
Rohit Pawar On Jejuri Accident | अशी घटना पुन्हा घडू नये; ट्विट करत रोहित पवारांनी प्रशासनाला दिल्या सूचना
जेजुरी अपघातानंतर सुनेत्रा पवारांची तातडीची धाव, जखमी वारकऱ्यांना...
जेजुरी अपघातानंतर सुनेत्रा पवारांची तातडीची धाव, जखमी वारकऱ्यांच्या मदतीसाठी मोठा निर्णय
ताजमध्ये बॉम्ब ठेवला... दाऊदच्या नावाने धमकी; मध्यरात्री मुंबई....
Mumbai | ताजमध्ये बॉम्ब ठेवला... दाऊदच्या नावाने धमकी; मध्यरात्री मुंबई पोलिसांची मोठी धावपळ!
आष्टीकर, तुम्ही पुन्हा... ऑडिओ क्लिप व्हायरल होताच खळबळ, काय घडलं?
आष्टीकर, तुम्ही पुन्हा... ऑडिओ क्लिप व्हायरल होताच खळबळ, काय घडलं?
राजकीय हालचाली वाढल्या! केंद्रातील मंत्रीमंडळाच्या विस्ताराबाबत...
BJP Meeting | राजकीय हालचाली वाढल्या! केंद्रातील मंत्रीमंडळाच्या विस्ताराबाबत... काय घडतंय?
देवेंद्र फडणवीसांचा नवा विक्रम! शरद पवारांनाही टाकले मागे
Devendra Fadnavis | देवेंद्र फडणवीसांचा नवा विक्रम! मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात शरद पवारांनाही टाकले मागे
देवेंद्र फडणवीस मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष, मग ठाकरे गटाच्या आंदोलनाला
देवेंद्र फडणवीस मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष, मग ठाकरे गटाच्या आंदोलनाला हिरवा कंदील मिळणर?