AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय…”, रश्मी शुक्लांच्या बदलीवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

केंद्रीय निवडणूक आयोगाने सकारात्मक प्रतिसाद देत रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालक पदावरुन बदली केली आहे. यावरुन शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला.

निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय..., रश्मी शुक्लांच्या बदलीवर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
शरद पवार रश्मी शुक्ला
| Updated on: Nov 04, 2024 | 2:28 PM
Share

Sharad Pawar On Rashmi Shukla : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकांचा रणसंग्राम सुरु झाला आहे. आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असून सध्या राजकीय घडामोडींना वेग आला आहे. त्यातच आता नुकतंच शरद पवारांचे निवासस्थान असलेल्या सिल्व्हर ओकवर एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला शरद पवार, उद्धव ठाकरे, संजय राऊत हे नेते उपस्थित होते. या बैठकीत मनोज जरांगे पाटील, रश्मी शुक्ला यांसह विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगांनेही चर्चा झाली. यानंतर शरद पवार, उद्धव ठाकरे आणि संजय राऊतांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली. यावेळी शरद पवारांनी रश्मी शुक्ला यांची बदली करण्यावरुन भाष्य केले.

रश्मी शुक्लांची बदली

केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली केली आहे. काँग्रेस नेते नाना पटोलेंनी यांनी रश्मी शुक्ला यांची बदली करावी, अशी मागणी केली होती. या मागणीवर केंद्रीय निवडणूक आयोगाने सकारात्मक प्रतिसाद देत रश्मी शुक्ला यांची राज्याच्या पोलीस महासंचालक पदावरुन बदली केली आहे. यावरुन शरद पवारांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर शरद पवारांनी निवडणूक आयोगाने चांगला निर्णय घेतला अशी प्रतिक्रिया दिली.

शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया काय?

“निवडणूक आयोगाने घेतलेला निर्णय योग्य आहे. ज्या व्यक्तीचा कालखंड संपलेला आहे, त्याबद्दल जाहीरपणे अनेक लोक बोलतात. सत्तेच्या गैरवापराबद्दल, त्यांना एक्स्टेंशन देऊन त्यांच्या कालखंडात निर्णय घेण्याचा प्रयत्न होता. त्यावर निवडणूक आयोगाने चांगला निर्णय घेतला. आता त्या कोणत्याही पदावर असू नये”, असे शरद पवार म्हणाले.

“मनोज जरांगे आणि आघाडीचा काहीही संबंध नाही”

मनोज जरांगे आणि आघाडीचा काहीही संबंध नाही. हा निर्णय त्यांचा आहे. मला आनंद आहे, त्यांनी हा निर्णय घेतला. भाजपला आमचा विरोध आहे असं त्यांनी सांगितलं. त्यांनी उमेदवार ठेवले असते तर त्याचा फायदा भाजपला झाला असता. या पार्श्वभूमीवर त्यांचा निर्णय योग्य आहे, असे शरद पवारांनी म्हटले.

काँग्रेसकडून बंडखोरी थांबवण्याचे प्रयत्न सुरु

यानंतर शरद पवारांना बंडखोर उमेदवारांबद्दल विचारण्यात आले असता ते म्हणाले, ज्या प्रकारे आम्ही दोघांनी प्रयत्न केले तसं काँग्रेसही प्रयत्न करत आहेत. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बंडखोरी थांबवण्यासाठी प्रयत्न करत आहेत, असे त्यांनी सांगितले.

Follow Us
मोठी बातमी! महाविकास आघाडीत ट्विस्ट; आगे, आगे देखो होता है क्या म्हणत
मोठी बातमी! महाविकास आघाडीत ट्विस्ट; आगे, आगे देखो होता है क्या म्हणत.
नीलम गोऱ्हे की शितल म्हात्रे? विधान परिषदेसाठी कोणाची वर्णी लागणार?
नीलम गोऱ्हे की शितल म्हात्रे? विधान परिषदेसाठी कोणाची वर्णी लागणार?.
सस्पेन्स संपला! राष्ट्रवादीकडून झिशान सिद्धीकी यांच्या नावावर शिक्कामो
सस्पेन्स संपला! राष्ट्रवादीकडून झिशान सिद्धीकी यांच्या नावावर शिक्कामो.
प्रहारचा शिंदे गटामध्ये विलय?; कडूंच्या एन्ट्रीने समीकरणे बदलणार तर...
प्रहारचा शिंदे गटामध्ये विलय?; कडूंच्या एन्ट्रीने समीकरणे बदलणार तर....
बारामती-राहुरी पोटनिवडणूक एक्झिट पोल; नेमकं कोण जिंकणार?
बारामती-राहुरी पोटनिवडणूक एक्झिट पोल; नेमकं कोण जिंकणार?.
पश्चिम बंगालमध्ये सत्तांतराची चाहूल; ममता बॅनर्जींचा गड धोक्यात.....
पश्चिम बंगालमध्ये सत्तांतराची चाहूल; ममता बॅनर्जींचा गड धोक्यात......
तामिळनाडूत सत्तांतर नाही?; पिपल्स इन्साईटच्या एक्झिट पोलनुसार DMK....
तामिळनाडूत सत्तांतर नाही?; पिपल्स इन्साईटच्या एक्झिट पोलनुसार DMK.....
केरळमध्ये काँग्रेसची सत्ता? बंगालमध्ये ममता दीदींना धक्का!
केरळमध्ये काँग्रेसची सत्ता? बंगालमध्ये ममता दीदींना धक्का!.
ममता बॅनर्जींना जबर धक्का? पश्चिम बंगालमध्ये यंदा भाजपाची सत्ता?
ममता बॅनर्जींना जबर धक्का? पश्चिम बंगालमध्ये यंदा भाजपाची सत्ता?.
पश्चिम बंगालमध्ये विक्रमी मतदान, आता नेमकी कोणाची सत्ता येणार?
पश्चिम बंगालमध्ये विक्रमी मतदान, आता नेमकी कोणाची सत्ता येणार?.