AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

तेव्हा दावोसमधील खुर्च्यासुद्धा मध्य प्रदेशातील पॅव्हेलनमधून आणल्या, एकनाथ शिंदे यांनी कोणाला मारला टोला

दावोसमधील वर्ल्ड इकोनॉमिक फोरममध्ये दोन राज्य सरकारांनी करार केले. आधी महाविकास आघाडी सरकार सत्तेवर होते. तेव्हा ८० कोटी रुपये खर्च केले होते.

तेव्हा दावोसमधील खुर्च्यासुद्धा मध्य प्रदेशातील पॅव्हेलनमधून आणल्या, एकनाथ शिंदे यांनी कोणाला मारला टोला
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Mar 03, 2023 | 4:05 PM
Share

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत शुक्रवारी तुफान फटकेबाजी केली. अजित पवार यांनी केलेल्या प्रत्येक आरोपांवर उत्तर देताना महाविकास आघाडी सरकार दरम्यान काय झाले? ते सर्व उघड केले. तसेच विरोधकांच्या प्रत्येक आरोपावर त्यांनी जोरदार प्रतित्तर दिले. महाविकास आघाडी सरकारने दावोसमध्ये झालेल्या जागतिक आर्थिक परिषदेत काय केले, ते एकनाथ शिंदे यांनी सांगितले. त्यावेळी कुटुंबासह जाऊन किती खर्च केला अन् त्यावेळी काय परिस्थिती होती, हे सर्वच सभागृहात उघड केले.

दावोसमधील वर्ल्ड इकोनॉमिक फोरममध्ये दोन राज्य सरकारांनी करार केले. आधी महाविकास आघाडी सरकार सत्तेवर होते. तेव्हा दावोसच्या दौऱ्यावर ८० कोटी रुपये खर्च झाले. परंतु तेव्हा दावोसमध्ये महाराष्ट्राच्या पॅव्हेलियनची परिस्थिती काय होती, त्यांना खुर्च्यासुद्धा मध्य प्रदेशाच्या पॅव्हेलनमधून आणाव्या लागल्या. इतकी बिकट परिस्थिती त्यावेळी होती. आता आम्ही गेलो तेव्हा ३० ते ३५ कोटी खर्च झाला आहे. परंतु गुंतवणूक तब्बल एक लाख ३७ हजार कोटींपेक्षा जास्त झाली आहे. तत्कालीन महाविकास आघाडीने दौऱ्यावर ८० कोटी खर्च करुन १० हजार कोटींची गुंतवणूक आणली नाही, असा आरोप एकनाथ शिंदे यांनी केला

त्या आरोपांवर दिले उत्तर

दावोसमध्ये स्थानिक कंपन्यांसोबत सामंजस्य करार केल्याचा आरोपावर शिंदे यांनी जोरदार उत्तर दिले. स्थानिक कंपन्यांचे करारही आरबीआयच्या निकषानुसार झाले आहेत. या झालेल्या गुंतवणुकीतून मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्मिती होणार आहे. मोठ्या प्रमाणावर राज्यात उद्योग आले पाहिजे. रोजगार निर्मिती झाली पाहिजे. एनर्जी सेक्टरमध्ये गेल्यावेळी एमओयू ५० हजार कोटी रुपयांचा झाला होता.

गुंतवणुकीच्या आरोपावर दिले उत्तर

महाराष्ट्रातील गुंतवणूक इतर राज्यात गेल्याचा आरोपावर एकनाथ शिंदे यांनी उत्तर दिले. राज्यात आता गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर होणार आहे. तसेच महाविकास आघाडी सरकारच्या काळात गुंतवणुकीची काय परिस्थिती होती, त्यावर श्वेतपत्रिका काढण्याचा निर्णय झाला असल्याचे त्यांनी सांगितले. आम्ही सत्तेत येताच मोठ्या प्रमाणावर कामे सुरु केली. परंतु ही कामे विरोधकांना दिसत नाही. कारण सत्तेतून पायउतार झाल्यावर विरोधकांच्या डोळ्यात अंधारी आली आहे, असा हल्लाबोलही एकनाथ शिंदे यांनी केला.

महाविकास आघाडी सरकारच्या काळात ८० हजार कोटी रुपयांचे २४ करार झाले होते. परंतु आता शिंदे सरकारने १.३७ लाख कोटी रुपयांचे १४ करार केले. शिंदे-फडणवीस सरकारने दावोसमध्ये दोन दिवस तळ ठोकून तत्कालीन मविआपेक्षा ५८.३९ टक्के अधिक किंमतीची गुंतवणूक आणली. स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या परिषदेसाठी गेले होते.

‘वर्षा बंगला’ अडीच वर्ष बंद, पण चहापाण्यावर खर्च कसा ? एकनाथ शिंदे यांनी कोणाला घेतला चिमटा

Follow Us
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!
खरात प्रकरणातील त्या आरोपांवर नीलम गोऱ्हे यांनी मांडली भूमिका!.
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!
भोर तालुक्यात वादळी वारा, यात्रेनिमित्त टाकलेला मंडपही कोसळला!.
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं
सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरण पोलीस अधीक्षक यांना भोवलं.
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा
पुण्यात अवकाळी पावसासह गारपीट; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा.
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच
मुंबई पालिकेत महायुतीत नाराजीनाट्य सुरुच.
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन
गॅस तुटवड्यावर छगन भुजबळांचे स्पष्टीकरण; PNG साठी अर्ज करण्याचे आवाहन.
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले....
खरात प्रकरणावरून राजकीय वर्तुळात गदारोळ; मंत्री शिरसाट म्हणाले.....
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात
शिवतीर्थावर पार्थ पवार यांची ठाकरेंसोबत भेट; भेटीचं कारण गुलदस्त्यात.
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत
सरकारने वास्तव स्पष्ट करावे; सिलिंडरच्या तुटवड्यावर सुळेंचे स्पष्ट मत.
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास
आमचे 9 खासदार फुटणार नाहीत, संजय राऊतांनी व्यक्त केला विश्वास.