AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लिटफेस्टच्या माध्यमातून भारतीय भाषांमधील साहित्य जगापुढे यावे; राज्यापालांच्या उपस्थितीत ग्लोबल लिटररी फेस्टिवलचे उद्घाटन

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या दूरस्थ उपस्थितीत मंगळवारी (14 सप्टेंबर) 7 व्या जागतिक साहित्य महोत्सवाचे (7th Global Literary Festival) उद्घाटन संपन्न झाले.

लिटफेस्टच्या माध्यमातून भारतीय भाषांमधील साहित्य जगापुढे यावे; राज्यापालांच्या उपस्थितीत ग्लोबल लिटररी फेस्टिवलचे उद्घाटन
| Edited By: | Updated on: Sep 14, 2021 | 4:42 PM
Share

मुंबई : देशात होत असलेले बहुचर्चित साहित्य महोत्सव (लिटफेस्ट) अधिकांश इंग्रजी भाषेतून होतात. इंग्रजी भाषेत उत्तम साहित्य आहे आणि साहित्यिक आहेत, याबाबत दुमत नाही. परंतु हिंदी, बंगाली, मराठी यांसह भारतीय भाषांमध्ये अतिशय समृद्ध साहित्य आहे. महाराष्ट्रात आल्यावर येथील साहित्य किती संपन्न आहे हे समजले. त्यामुळे साहित्य महोत्सवांच्या माध्यमातून भारतीय भाषांमधील साहित्य जगापुढे आणण्यासाठी कसोशीने प्रयत्न झाले पाहिजेत असे आग्रही प्रतिपादन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या दूरस्थ उपस्थितीत मंगळवारी (14 सप्टेंबर) 7 व्या जागतिक साहित्य महोत्सवाचे (7th Global Literary Festival) उद्घाटन संपन्न झाले त्यावेळी ते बोलत होते. (Maharashtra Governor Koshyari inaugurates 7th Global Literary Festival)

या तीन दिवसीय साहित्य महोत्सवाचे आयोजन एशियन अकादमी ऑफ आर्ट व इंटरनॅशनल चेंबर ऑफ मिडिया अँड एंटरटेनमेंट इंडस्ट्रीने केले आहे. चित्रपटांच्या माध्यमातून हिंदी भाषा मॉरिशस, त्रिनिदाद, अरबी देश व भारताच्या शेजारील देशात उत्तमपणे समजली जाते. हिंदी भाषा माहिती असल्यामुळे आपल्याला मराठी भाषा समजणे अतिशय सोपे गेले. भारतीय भाषांमध्ये बंकिमचंद्र, मुन्शी प्रेमचंद, सुब्रमण्य भारती असे एकापेक्षा एक सरस साहित्यिक आहेत. त्यामुळे साहित्य महोत्सव केवळ इंग्रजी साहित्य महोत्सव न होता सर्वसमावेशक भारतीय साहित्य महोत्सव व्हावे, अशी अपेक्षा कोश्यारी यांनी व्यक्त केली.

उद्घाटन सोहळ्याला उझबेकीस्तान, त्रिनिदाद टोबॅगो, बुर्कीना फासो यांसह विविध देशांचे भारतातील राजदूत व उच्चायुक्त, संमेलनाध्यक्ष संदीप मारवाह, इंद्रजीत घोष, चित्रपट निर्माते अनिल जैन, लायन्स क्लबचे गौरव गुप्ता, डॉ. शिखा वर्मा, सुशील भारती तसेच साहित्यिक ऑनलाईन पध्दतीने उपस्थित होते.

(Maharashtra Governor Koshyari inaugurates 7th Global Literary Festival)

बारामतीत राष्ट्रवादीच्या कार्यालयातला बर्थ- डे वादात! नेमकं काय घडलं?
बारामतीत राष्ट्रवादीच्या कार्यालयातला बर्थ- डे वादात! नेमकं काय घडलं?.
अमरावतीत 15 मिनिटांत 3 घरे फोडली; पोलिसांवर प्रश्नचिन्ह
अमरावतीत 15 मिनिटांत 3 घरे फोडली; पोलिसांवर प्रश्नचिन्ह.
फरार आरोपी कृष्णा आंधळे बाबत धनंजय देशमुखांचा धक्कादायक खुलासा
फरार आरोपी कृष्णा आंधळे बाबत धनंजय देशमुखांचा धक्कादायक खुलासा.
ज्ञानेश्वरी मुंडेंकडून कराड बंधूंवर गंभीर आरोप!
ज्ञानेश्वरी मुंडेंकडून कराड बंधूंवर गंभीर आरोप!.
राम मोहन नायडूंनी राजीमाना द्यावा; पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी
राम मोहन नायडूंनी राजीमाना द्यावा; पृथ्वीराज चव्हाण यांची मागणी.
परळीत मृत महादेव मुंडे यांच्या दोन्ही मुलांना मारहाण! गुन्हा दाखल
परळीत मृत महादेव मुंडे यांच्या दोन्ही मुलांना मारहाण! गुन्हा दाखल.
सुनेत्रा पवार यांच्या शासकीय वाहनप्रकरणी वाद; अनिकेत तटकरेंवर टीका
सुनेत्रा पवार यांच्या शासकीय वाहनप्रकरणी वाद; अनिकेत तटकरेंवर टीका.
विलीनीकरणानंतर पवार राजकारणापासून होणार होते दूर,नेमकं काय घडणार होतं?
विलीनीकरणानंतर पवार राजकारणापासून होणार होते दूर,नेमकं काय घडणार होतं?.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून वाद; महिलेला कपडे फाडत मारहाण
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून वाद; महिलेला कपडे फाडत मारहाण.
राज ठाकरे यांना आम्ही विकासासाठी सोबत घेणार, शिरसाटांचं विधान
राज ठाकरे यांना आम्ही विकासासाठी सोबत घेणार, शिरसाटांचं विधान.