AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईकरांनो, बिनधास्त राहा प्रशासन तुमची काळजी घेण्यासाठी सज्ज; मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलं आश्वस्त

Mangalprabhat Lodha on Mumbai Rains Update : पहिल्याच पावसात मुंबईकरांची दाणादाण; पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलं आश्वस्त

मुंबईकरांनो, बिनधास्त राहा प्रशासन तुमची काळजी घेण्यासाठी सज्ज; मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलं आश्वस्त
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Jun 25, 2023 | 12:46 PM
Share

मुंबई : कालपासून मुंबईमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. ठिकठिकाणी पाणी साचायला सुरुवात झाली आहे. पहिल्याच पावसात अंधेरीमधील सबवे पाण्याखाली गेला. पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबईचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुंबईकरांना आश्वस्त केलं आहे. महापालिका, प्रशासन सज्ज आहे, असं त्यांनी सांगितलं. शिवाय पालिका यंत्रणा कशी काम करते, यावरही त्यांनी भाष्य केलंय.

मुंबईचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा मुंबईतील पावसाच्या बीएमसी मुख्यालयाच्या वॉर रूममधून आढावा घेतला. महानगरपालिकेने चोख बंदोबस्त केली आहे. या ठिकाणी साडेनऊशे कॉल आलेले आहे आणि त्याचा आढावा पण चालू आहे, असं लोढा म्हणाले आहेत.

घाटकोपरमध्ये स्लॅप कोसळला त्यानंतर तिथे डिजास्टर टीम पोहोचली आहे आणि त्या ठिकाणी मदत केली जात आहे. सखल भागात त्या ठिकाणी पंप लावण्यात आलेले आहे. राजकारणात मी काही बोलू इश्चित नाही पण त्या ठिकाणी पाणी साचल्यावर काढण्यात आलं. 1916 हा नंबर आहे हेल्प डेस्कचा आणि त्या ठिकाणी ही मदत पोहचवली जाईल, असं मंगलप्रभात लोढा यांनी सांगितलं आहे.

शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर चांगल्या प्रकारे नाले सफाई आणि झाडांच्या फांद्या ह्या तोडल्या गेल्या आहेत. स्वच्छतेची कामं केली जात आहेत. नाले सफाई झालेली आहे त्यासाठी सुधारणा केली आहे, असं लोढा म्हणालेत.

मोठे पाण्याचे रिझर्व टॅंक बनवलेले आहेत. त्या ठिकाणी पाणी साचणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे. अंधेरी-सायन बागात वॉटर टॅंकरचं काम करण्यात आलं आहे. विशिष्ट टीमची अजून गरज नाही पण त्या ठिकाणी काही गरज लागल्यास आपत्ती व्यवस्थापन कक्ष अशा टीम बनवणार आहे, असंही लोढा यांनी सांगितलं आहे.

लोकांना हेच आवाहन आहे की जास्त पाऊस असल्यावर घरा बाहेर पडू नका. स्वत:ची तसंच आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या. गरज पडल्यासच बाहेर जा. पण काही अडचण आल्यास कंट्रोल रूमला फोन करा, असं मंगलप्रभात लोढा म्हणालेत.

सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही ठिकाणी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्यावरही लोढा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री शिंदे फिल्ड आहे ते चांगलं आहे. अधिकाऱ्यांना घेऊन त्या ठिकाणी ते जात आहेत, असंही ते म्हणालेत.

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...