AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईकरांनो, बिनधास्त राहा प्रशासन तुमची काळजी घेण्यासाठी सज्ज; मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलं आश्वस्त

Mangalprabhat Lodha on Mumbai Rains Update : पहिल्याच पावसात मुंबईकरांची दाणादाण; पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलं आश्वस्त

मुंबईकरांनो, बिनधास्त राहा प्रशासन तुमची काळजी घेण्यासाठी सज्ज; मुंबईचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी केलं आश्वस्त
| Updated on: Jun 25, 2023 | 12:46 PM
Share

मुंबई : कालपासून मुंबईमध्ये पावसाला सुरुवात झाली आहे. ठिकठिकाणी पाणी साचायला सुरुवात झाली आहे. पहिल्याच पावसात अंधेरीमधील सबवे पाण्याखाली गेला. पावसाच्या पार्श्वभूमीवर मुंबईचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुंबईकरांना आश्वस्त केलं आहे. महापालिका, प्रशासन सज्ज आहे, असं त्यांनी सांगितलं. शिवाय पालिका यंत्रणा कशी काम करते, यावरही त्यांनी भाष्य केलंय.

मुंबईचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा मुंबईतील पावसाच्या बीएमसी मुख्यालयाच्या वॉर रूममधून आढावा घेतला. महानगरपालिकेने चोख बंदोबस्त केली आहे. या ठिकाणी साडेनऊशे कॉल आलेले आहे आणि त्याचा आढावा पण चालू आहे, असं लोढा म्हणाले आहेत.

घाटकोपरमध्ये स्लॅप कोसळला त्यानंतर तिथे डिजास्टर टीम पोहोचली आहे आणि त्या ठिकाणी मदत केली जात आहे. सखल भागात त्या ठिकाणी पंप लावण्यात आलेले आहे. राजकारणात मी काही बोलू इश्चित नाही पण त्या ठिकाणी पाणी साचल्यावर काढण्यात आलं. 1916 हा नंबर आहे हेल्प डेस्कचा आणि त्या ठिकाणी ही मदत पोहचवली जाईल, असं मंगलप्रभात लोढा यांनी सांगितलं आहे.

शिंदे-फडणवीस सरकार आल्यानंतर चांगल्या प्रकारे नाले सफाई आणि झाडांच्या फांद्या ह्या तोडल्या गेल्या आहेत. स्वच्छतेची कामं केली जात आहेत. नाले सफाई झालेली आहे त्यासाठी सुधारणा केली आहे, असं लोढा म्हणालेत.

मोठे पाण्याचे रिझर्व टॅंक बनवलेले आहेत. त्या ठिकाणी पाणी साचणार नाही याची काळजी घेण्यात येत आहे. अंधेरी-सायन बागात वॉटर टॅंकरचं काम करण्यात आलं आहे. विशिष्ट टीमची अजून गरज नाही पण त्या ठिकाणी काही गरज लागल्यास आपत्ती व्यवस्थापन कक्ष अशा टीम बनवणार आहे, असंही लोढा यांनी सांगितलं आहे.

लोकांना हेच आवाहन आहे की जास्त पाऊस असल्यावर घरा बाहेर पडू नका. स्वत:ची तसंच आपल्या कुटुंबियांची काळजी घ्या. गरज पडल्यासच बाहेर जा. पण काही अडचण आल्यास कंट्रोल रूमला फोन करा, असं मंगलप्रभात लोढा म्हणालेत.

सकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही ठिकाणी पावसामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. त्यावरही लोढा यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मुख्यमंत्री शिंदे फिल्ड आहे ते चांगलं आहे. अधिकाऱ्यांना घेऊन त्या ठिकाणी ते जात आहेत, असंही ते म्हणालेत.

गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल..
गडचिरोलीत शेतकरी खुश, लाल मिरचीला चांगला दर; एक क्विंटलचा भाव तब्बल...
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास
विलिनीकरणावर सुनेत्रा पवारच योग्य निर्णय घेतील; भरणेंचा ठाम विश्वास.
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ
अजितदादांना ते कॉन्ट्रक्ट नको होते, रोहित पवार यांच्या दाव्याने खळबळ.
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर
कोश्यारींना खूप चोपला असता... नाव बदलावे; मनसेचं आक्रमक प्रत्युत्तर.
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल
तुम करो तो रासलीला, हम करे तो... मनसेचा ठाकरे सेनेवर हल्लाबोल.
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले
नाशिकमध्ये घाटांचे सुशोभीकरणाचे काम सुरु करताच पर्यावरणप्रेमी संतापले.
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक
एका डोळ्यात आनंद, एका डोळ्यात अश्रू; सुळे दादांच्या आठवणींनी भावूक.
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही
पैशाचा महापूर येऊन सुद्धा निष्ठेची भिंत तोडता आली नाही.
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात...
मुंबई महापालिकेत 40 वर्षांनंतर भाजपचा महापौर; शपथविधी सोहळ्यात....
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल
तपास यंत्रणांवरून संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल.