AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Nagar Panchayat Elections: नगरपंचायतचा निकाल नेमका कुणासाठी धोक्याचा इशारा आहे?; वाचा ‘टीव्ही9 मराठी’चा पोल काय सांगतो!

राज्यातील नगरपंचायत निवडणुकीचा काल निकाल लागला. या निवडणुकीत महाविकास आघाडीने घवघवीत यश मिळवलं आहे. तर भाजपनेही नेत्रदीपक कामगिरी केली आहे. त्यामुळे राज्याचं राजकारणावर टीव्ही9 मराठीने याबाबतचा पोल घेतला होता.

Maharashtra Nagar Panchayat Elections: नगरपंचायतचा निकाल नेमका कुणासाठी धोक्याचा इशारा आहे?; वाचा 'टीव्ही9 मराठी'चा पोल काय सांगतो!
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: | Updated on: Jan 20, 2022 | 4:25 PM
Share

मुंबई: राज्यातील नगरपंचायत निवडणुकीचा काल निकाल लागला. या निवडणुकीत महाविकास आघाडीने घवघवीत यश मिळवलं आहे. तर भाजपनेही नेत्रदीपक कामगिरी केली आहे. त्यामुळे राज्याचं राजकारणावर टीव्ही9 मराठीने याबाबतचा पोल घेतला होता. नगरपंचायत निवडणुकीचा निकाल नेमका कुणासाठी धोक्याचा इशारा आहे? असा सवाल करून आम्ही जनतेचा कौल मागितला होता. त्यावर, 43 टक्के जनतेने भाजपला तर 41 टक्के लोकांनी शिवसेनेला धोका असल्याचं म्हटलं आहे.

नगरपंचायत निवडणुकीचे निकाल आल्यानंतर या निकालावर टीव्ही 9 मराठीने जनमताचा कौल घेतला. नगरपंचायतचा निकाल नेमका कुणासाठी धोक्याचा इशारा आहे? असा सवाल टीव्ही9 ने जनतेला युट्यूबवरून विचारला होता. या प्रश्नावर जनतेची मते मागवली होती. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपचे नाव देऊन होय/नाही असे दोन पर्याय विचारण्यात आले होते.

जनतेचा कौल काय सांगतो?

तब्बल 17 तास जनमताचा कौल घेण्यात आला. त्यात 43 टक्के लोकांनी भाजपला धोक्याचा इशारा असल्याचं म्हटलं आहे. तर 41 टक्के लोकांनी शिवसेनेला धोका असल्याचं म्हटलं आहे. 10 टक्के लोकांनी काँग्रेसला तर 7 टक्के लोकांनी केवळ राष्ट्रवादीला धोका असल्याचं म्हटलं आहे.

election poll

election poll

कुणाला किती जागा

काल झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत भाजपला सर्वाधिक 420 जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादीला 370, काँग्रेसला 355, शिवसेनेला 298 जागा मिळाल्या आहेत. तर 358 अपक्ष निवडून आले आहेत.

काँग्रेसचा दावा काय?

या निवडणूक निकालावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भाष्य केलं आहे. आज जो कल दिसतो आहे हा कल भाजपला पुढचे पाच वर्षे सत्तेपासून दूर नेणारा आहे. या निवडणुका पुढच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचा पाया आहे. आता हा बेस मजबूत होत आहे. काँग्रेस हा जुना पक्ष आहे इतर जे पक्ष आहेत ते काँग्रेसमधून निर्माण झाले आहेत. काँग्रेसच्या मतांचे लोक आहेत ज्यांचं मतभेद झाले आणि त्यातून हे पक्ष निर्माण झाले आहेत, असे वडेट्टीवार यांनी सांगितलं. महाराष्ट्र हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. येणाऱ्या दिवसात काँग्रेस मजबुतीने उभा राहील. या निकालाने पक्षाला ऊर्जा मिळाली आहे. राष्ट्रवादीला पश्चिम महाराष्ट्रात 100 जागा मिळाल्या असतील तर आम्हाला ही 60 जागा मिळाल्या आहेत. ते 60 टक्केच्यावर आम्ही पण आहोतच. येणाऱ्या दिवसात महापालिका निवडणुकीत पार्टी हायकमांडने सांगितलं की एकटं लढा तर एकटं लढू. आघाडीत लढा तर आघाडीत लढू, असं विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं.

संबंधित बातम्या:

Vijay Vadettiwar | विदर्भात सर्वात जास्त जागा काँग्रेसलाच, विजय वडेट्टीवार यांचा दावा; भाजपला सत्तेपासून दूर नेणारा कल?

KDCC Bank Chairman Election : ठरलं..! कोल्हापूर जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी हसन मुश्रीफ, उपाध्यक्षपदी राजीव आवळे यांना संधी

KDCC Bank Chairman Election : कोल्हापूर जिल्हा बँकेच्या अध्यक्ष उपाध्यक्षांची निवड, हसन मुश्रीफ आणि पी एन पाटील यांची नावं आघाडीवर

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.