AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुसळधार पाऊस, मुंबई-पुणे- ठाण्यात शाळांना सुट्टी जाहीर; मुंबईमध्ये पावसाचा रेड अलर्ट

Maharashtra Rain Update : राज्यात कालपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. मुंबईतही जोरदार पाऊस बरसला. मुंबईमध्ये पावसाचा रेड अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई- पुणे ठाण्यात शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. आज दिवसभर पावसाची काय स्थिती असणार आहे? वाचा सविस्तर...

मुसळधार पाऊस, मुंबई-पुणे- ठाण्यात शाळांना सुट्टी जाहीर; मुंबईमध्ये पावसाचा रेड अलर्ट
जालना, परभणी, हिंगोलीत देखील काही प्रमाणात पाऊस होत आहे. पण रविवारपर्यंत तो वाढण्याची शक्यता आहे. 18 आणि 19 ऑक्टोबर रोजी हवामान विभागाने हा पावसाचा इशारा दिला आहे. जुलै आणि ऑगस्ट महिन्यात चांगला पाऊस झाला. आता परतीचा पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
| Updated on: Sep 26, 2024 | 10:51 AM
Share

महाराष्ट्रात सध्या सर्वच भागात मुसळधार पाऊस होत आहे. काल रात्री ठिकठिकाणी जोरदार पाऊस झाला. अति मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक भागात पाणी साचलं होतं. रस्त्यांवर पाणीच पाणी झालं होतं. त्यामुळे रेल्वे उशीराने धावत होत्या. प्रवाशांचे हाल झाले. आता आज मुंबईत रेड अलर्ट देण्यात आला आहे. मुंबई, पालघर आणि ठाण्यात शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तर पुण्यातही पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक कोंडी झाली. पुणे- पिंपरी चिंचवडमधील शाळांनाही सुट्टी देण्यात आली आहे.

महिलेचा चेंबरमध्ये पडून मृत्यू

मुंबई शहरात रात्री मुसळधार पावसामुळे रस्त्यावरील चेंबरमध्ये पडून महिलेचा मृत्यू झाला आहे. जोगेश्वरी- विक्रोळी लिंक रोड सीप्सजवळ मॅनहोलमध्ये पडून महिलेचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी पोहोचले असून महिलेचा शोधायला सुरुवात केली. विमल अप्पाशा गायकवाड महिलेचं नाव आहे. कामावरून घरी येताना मुंबईतील मुसळधार पावसामुळे रस्त्यावरील चेंबरमध्ये पडून महिलेचा मृत्यू झाला आहे.

कोकणात दोन दिवस पावसाचे

रत्नागिरी- पुढचे दोन दिवस कोकणात पावसाचे असणार आहेत. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र जमिनीवर उतरले आहे. त्या क्षेत्राचे ट्रफ उत्तर कोकण किनारपट्टीवर आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. शुक्रवारनंतर पावसाचा जोर कमी होण्याची शक्यता आहे. तळकोकणापासून रत्नागिरी जिल्ह्यापर्यत सर्वत्र पाऊसधारा सुरु आहेत. रात्रीपासून पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. रत्नागिरी जिल्ह्यात आजपर्यंत सरासरीच्या 104 टक्के पाऊस झाला आहे. 3488 मिलिमिटर पावसाची आजपर्यंत नोंद झाली आहे. पुढचे दोन दिवस पावसाचे असणार आहेत.

मोदींच्या दौऱ्यानप परिणाम होण्याची शक्यता

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यात असणार आहेत. त्यांच्या दौऱ्यावर पावसाचं सावट आहे. काल मैदानात मोठ्या प्रमाणावर चिखल झाला होता. त्यामुळे सभेसाठी पर्यायी व्यवस्था म्हणून स्वारगेटच्या गणेश कला क्रीडा मंचाचा पर्याय आहे. पावसाने व्यत्यय आला तर पर्यायी व्यवस्था होणार आहे. जिल्हा प्रशासनाने तशी व्यवस्था केली आहे.

रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत
रानडुकरांसमुळे तुरीच्या पिकाचे नुकसान, शेतकरी अडचणीत.
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त
वानखेडे स्टेडियमवर मेस्सीला पाहण्यासाठी गर्दी; कडक पोलीस बंदोबस्त.
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!
बिबट्याने डोळ्यासमोरून 4 वर्षांच्या चिमूकल्याला उचलून नेलं!.
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान
महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे बदल? अर्जुन खोतकरांचे महत्त्वाचे विधान.
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर
मुंबईत महायुतीत शिवसेना 125 जागांसाठी आग्रही? मोठी अपडेट आली समोर.
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य
मुख्यमंत्री भाजपशिवाय दुसऱ्या पक्षाचा शक्य नाही!मुनगंटीवारांचं वक्तव्य.
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका
सरकार फार काही करेल असं वाटत नाही! अंबादास दानवेंची खोचक टीका.
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
अधिवेशनात विदर्भावर चर्चा नाही! विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल.
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?
तरुणांना सरकारकडून 6 लाख मिळणार! काय आहे योजना?.
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती
कृषी संजीवनी योजना गेमचेंजर ठरली! मुख्यमंत्र्यांची अधिवेशनात माहिती.