AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai and Thane Rain | मुंबई, ठाणे, नवी मुंबईत मेघगर्जनेसह पाऊस, उकाड्याने हैराण नागरिकांना मोठा दिलासा

राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना हैराण करुन सोडणाऱ्या अवकाळी पावसाने आता महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत धडक दिली आहे. हा पाऊस मुंबईत धडकण्याआधी ठाणे जिल्ह्यातील बदलापूर, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ या शरहांमध्ये बरसला. त्यानंतर तो पुढे मुंबईत येऊन धडकला.

Mumbai and Thane Rain | मुंबई, ठाणे, नवी मुंबईत मेघगर्जनेसह पाऊस, उकाड्याने हैराण नागरिकांना मोठा दिलासा
मुंबई, ठाणे, नवी मुंबईत मेघगर्जनेसह पाऊस
| Updated on: May 13, 2024 | 6:12 PM
Share

राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना हैराण करुन सोडणाऱ्या अवकाळी पावसाने आता महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत धडक दिली आहे. खरंतर या पावसाला अनेक मुंबईकर पहिला पाऊस मानत असतील. पण हा पहिला पाऊस नाही. या पावसाला ग्रामीण भागात वाळवीचा पाऊस म्हणता. तर मराठी भाषेत सर्वसाधारणपणे अवकाळी पाऊस म्हणतात. या अवकाळी पावसाने राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या तोंडातील घास हिरावला. हा पाऊस एकटा आलेला नाही. सोबत वादळही घेऊन आलाय. 40 ते 50 किमी प्रतीतास अशा वेगाने वाहणारे वारे सोबत घेऊन आलाय. तसेच ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाटासह धुमाकूळ घेऊन आलाय. प्रचंड वारा आणि सोबत पावसाच्या सरी आल्यामुळे अनेक नागरिकांची तारांबळ उडाली आहे. हा पाऊस मुंबईत धडकण्याआधी ठाणे जिल्ह्यातील बदलापूर, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ या शहरांमध्ये बरसला. त्यानंतर तो पुढे मुंबईत येऊन धडकला. हा पाऊस इतक्या वेगाने आला की त्याने अवघ्या अर्ध्या तासात मुंबईसह, पालघर आणि नवी मुंबईच्या परिसराला व्यापून टाकलं. मुंबईत तर चांगलाच पाऊस पडला.

राज्यातील शेतकऱ्यांचंं अवकाळी पावसामुळे नुकसान झालं असलं तरी मुंबईत आणि लगतच्या इतर शहरांमध्ये उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कल्याण, डोंबिवली या शहरांमध्ये दुपारच्या वेळी भयंकर ऊन पडत होतं. सूर्य जणू आगच ओकतोय, अशी परिस्थिती होती. त्यामुळे नागरीक आतुरतेने पावसाची वाट पाहत होते हे सत्य आहे. अखेर पावसाची वाट पाहणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात पावसाने हजेरी लावली आहे. नवी मुंबईत आलेला पाऊस सोबत वेगवाने वाऱ्यासह धुळीचं वातावरणही घेऊन आला.

प्रचंड धुळीचं साम्राज्य

अनेक ठिकाणी पाऊस आणि वारा तर आहेच पण धुळीचं प्रचंड साम्राज्य बघायला मिळत आहे. धुळीमुळे काही ठिकाणी दृष्यमानता कमी झाल्याचं चित्र आहे. मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई या भागात सकाळी चांगलं वातावरण होतं. सूर्यदेखील आग ओकत होता. पण दुपारी तीन वाजेनंतर अचानक वातावरणात बदल झाला. अचानक ढग दाटून आले, वातावरणात काळोत पसरला. वारे वाहू लागले आणि मेघगर्जनेसह अचानक पावसाला सुरुवात झाली. यावेळी अनेक ठिकाणी धुळीचं साम्राज्य बघायला मिळालं. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांना सावरण्यासाठी वेळच मिळाला नाही. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.