AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai and Thane Rain | मुंबई, ठाणे, नवी मुंबईत मेघगर्जनेसह पाऊस, उकाड्याने हैराण नागरिकांना मोठा दिलासा

राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना हैराण करुन सोडणाऱ्या अवकाळी पावसाने आता महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत धडक दिली आहे. हा पाऊस मुंबईत धडकण्याआधी ठाणे जिल्ह्यातील बदलापूर, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ या शरहांमध्ये बरसला. त्यानंतर तो पुढे मुंबईत येऊन धडकला.

Mumbai and Thane Rain | मुंबई, ठाणे, नवी मुंबईत मेघगर्जनेसह पाऊस, उकाड्याने हैराण नागरिकांना मोठा दिलासा
मुंबई, ठाणे, नवी मुंबईत मेघगर्जनेसह पाऊस
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: May 13, 2024 | 6:12 PM
Share

राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना हैराण करुन सोडणाऱ्या अवकाळी पावसाने आता महाराष्ट्राची राजधानी असलेल्या मुंबईत धडक दिली आहे. खरंतर या पावसाला अनेक मुंबईकर पहिला पाऊस मानत असतील. पण हा पहिला पाऊस नाही. या पावसाला ग्रामीण भागात वाळवीचा पाऊस म्हणता. तर मराठी भाषेत सर्वसाधारणपणे अवकाळी पाऊस म्हणतात. या अवकाळी पावसाने राज्यातील अनेक शेतकऱ्यांच्या तोंडातील घास हिरावला. हा पाऊस एकटा आलेला नाही. सोबत वादळही घेऊन आलाय. 40 ते 50 किमी प्रतीतास अशा वेगाने वाहणारे वारे सोबत घेऊन आलाय. तसेच ढगांचा गडगडाट, विजांचा कडकडाटासह धुमाकूळ घेऊन आलाय. प्रचंड वारा आणि सोबत पावसाच्या सरी आल्यामुळे अनेक नागरिकांची तारांबळ उडाली आहे. हा पाऊस मुंबईत धडकण्याआधी ठाणे जिल्ह्यातील बदलापूर, कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ या शहरांमध्ये बरसला. त्यानंतर तो पुढे मुंबईत येऊन धडकला. हा पाऊस इतक्या वेगाने आला की त्याने अवघ्या अर्ध्या तासात मुंबईसह, पालघर आणि नवी मुंबईच्या परिसराला व्यापून टाकलं. मुंबईत तर चांगलाच पाऊस पडला.

राज्यातील शेतकऱ्यांचंं अवकाळी पावसामुळे नुकसान झालं असलं तरी मुंबईत आणि लगतच्या इतर शहरांमध्ये उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कल्याण, डोंबिवली या शहरांमध्ये दुपारच्या वेळी भयंकर ऊन पडत होतं. सूर्य जणू आगच ओकतोय, अशी परिस्थिती होती. त्यामुळे नागरीक आतुरतेने पावसाची वाट पाहत होते हे सत्य आहे. अखेर पावसाची वाट पाहणाऱ्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. कारण मुंबई आणि आजूबाजूच्या परिसरात पावसाने हजेरी लावली आहे. नवी मुंबईत आलेला पाऊस सोबत वेगवाने वाऱ्यासह धुळीचं वातावरणही घेऊन आला.

प्रचंड धुळीचं साम्राज्य

अनेक ठिकाणी पाऊस आणि वारा तर आहेच पण धुळीचं प्रचंड साम्राज्य बघायला मिळत आहे. धुळीमुळे काही ठिकाणी दृष्यमानता कमी झाल्याचं चित्र आहे. मुंबई, ठाणे, पालघर, नवी मुंबई या भागात सकाळी चांगलं वातावरण होतं. सूर्यदेखील आग ओकत होता. पण दुपारी तीन वाजेनंतर अचानक वातावरणात बदल झाला. अचानक ढग दाटून आले, वातावरणात काळोत पसरला. वारे वाहू लागले आणि मेघगर्जनेसह अचानक पावसाला सुरुवात झाली. यावेळी अनेक ठिकाणी धुळीचं साम्राज्य बघायला मिळालं. अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांना सावरण्यासाठी वेळच मिळाला नाही. त्यामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी