एस.टी. कर्मचाऱ्यांना दिलेलं अल्टीमेटम, आज संपतंय, काय कारवाई होणार, आतापर्यंत किती जणांवर कारवाई?

परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी एसटी कर्माचाऱ्यांना अखेरची एक संधी म्हणून सोमवार म्हणजेच आजपर्यंत कामावर हजर होण्यास सांगितलं होतं.

एस.टी. कर्मचाऱ्यांना दिलेलं अल्टीमेटम, आज संपतंय, काय कारवाई होणार, आतापर्यंत किती जणांवर कारवाई?
अनिल परब, एसटी कर्मचारी आंदोलन
Follow us
| Updated on: Dec 13, 2021 | 9:44 AM

मुंबई: महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (MSRTC) म्हणजेच एसटीचे कर्मचारी (ST Workers ) विलीनीकरणाच्या मागणीसाठी संपावर (Strike) आहेत. परिवहन मंत्री अनिल परब (Anil Parab) यांनी एसटी कर्माचाऱ्यांना अखेरची एक संधी म्हणून सोमवार म्हणजेच आजपर्यंत कामावर हजर होण्यास सांगितलं होतं. सोमवारी हजर झाल्यास निलंबन रद्द करण्यात येईल, असं परब म्हणाले होते. कर्मचारी हजर न झाल्यास कठोर कारवाईला सामोरं जावं लागेल, असा इशारा देखील अनिल परब यांनी दिला होता. आज एसटी कर्मचारी कामावर हजर न झाल्यास काय कारवाई होणार हे पाहावे लागेल. एसटी महामंडळ एसटी कर्मचाऱ्यांच्या बदल्या करणं हा देखील पर्याय पूर्ण ताकदीनं वापरू शकतं. तर, राज्य सरकार एसटी कर्मचाऱ्यांना मेस्मा लावणार का हे पाहावं लागणार आहे.

राज्य सरकार एसटी कर्मचाऱ्यांना मेस्मा लावणार?

एसटी कर्मचाऱ्यांनी विलीनीकरण आणि इतर मागण्यांसाठी संपाला सुरुवात केली. त्यानंतर राज्य सरकारनं सुरुवातीला एसटी कर्मचाऱ्यांच्या डीए, एचआरए मध्ये वाढ केली. तरी देखील एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन सुरु ठेवल्यानं त्यांच्या पगारात 41 टक्के वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतरही आंदोलन सुरुच असल्यानं एसटी महामंडळाकडून कर्मचाऱ्यांवर निलंबन, बदली आणि रोजदांरी कर्मचाऱ्यांची सेवा समाप्ती करण्याचा निर्णय घेतला. एसटी कर्मचारी पगारवाढ देऊनही कामावर परत नसल्यानं राज्य सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांना मेस्मा लावण्याची चाचपणी सुरु असल्याच्या चर्चा सुरु होत्या. अनिल परब यांनी दिलेली मुदत आज संपत असल्यानं राज्य सरकार कामावर न परतणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांवर काय कारवाई करणार हे पाहावं लागणार आहे.

एसटी महामंडळाकडून बदली, निलंबन सेवासमाप्तीची कारवाई सुरु

एसटी कर्मचारी कामावर परतत नसल्यानं महामंडळानं देखील त्यांच्यावर कारवाई सुरु ठेवली आहे. राज्यात आतापर्यंत 2250 एसटी कर्मचाऱ्यांची बदली करण्यात आली आहे. तर, रोजंदारीवरील दोन हजार कर्मचाऱ्यांची सेवा समाप्त करण्यात आली आहे. तर, 10 हजार 180 जणांचं निलंबन करण्यात आलं आहे.

संप बेकायदा ठरवण्याचा प्रयत्न

एसटी महामंडळानं एसटी कर्मचाऱ्यांना एकीकडे कामावर परतण्याचं आवाहन केलं आहे. तर, दुसरीकडे संप बेकायदा असल्याचं ठरवण्यासाठी कामगार न्यायालयात अर्ज दाखल केले आहेत. महामंडळानं कर्मचाऱ्याविरोधात कामगार न्यायालयात संदर्भ अर्ज दाखल केल्यानं त्यांना उत्तर द्यावी लागणार आहेत.

रविवारी राज्यातील 122 आगार अंशत: सुरु

एसटी महामंडळाला रविवारी 122 आगारातील वाहतूक अंशत: सुरु करण्यात यश आलं होतं. रविवारी सायंकाळच्या आकडेवारीनुसार रविवारी 2119 बसेस धावल्याची माहिती आहे.

इतर बातम्या:

VIDEO | कुटुंब रंगलंय ‘Fighting’मध्ये, मुलगी-मामा आणि आई, औरंगाबादेत भररस्त्यात हातघाई

पेट्रोल, डिझेलचे नवे दर जाहीर; जाणून घ्या आपल्या शहरातील भाव

Maharashtra ST Workers strike update Anil Parab deadline end today what action will take msrtc against workers

Non Stop LIVE Update
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?
धमक्या देणाऱ्यांना माझा नंबर द्या, सुप्रिया सुळेंचा रोख नेमका कुणावर?.
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण
निधीवरून धमकीचा मामला...अजित पवारांचं 'त्या' वक्तव्यावरून स्पष्टीकरण.
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं
लटकवून लटकवून उमेदवारी मिळाली, राणेंना ठाकरे गटाच्या नेत्यानं डिवचलं.
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा
बाई खुणावेल, डोळा मारेल पण... राऊतांचा नाव न घेता राणांवर निशाणा.
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?
अजितदादांवर गुन्हा दाखल होणार? शरद पवार गटाच्या नेत्याची मागणी, पण का?.
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री
'यमराज'नं भरला लोकसभेचा उमेदवारी अर्ज? रेड्यावर बसून घेतली एन्ट्री.
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली
नाची, डान्सर आणि... नवनीत राणांवर बोलताना संजय राऊतांची जीभ घसरली.
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज
सुनेत्रा पवारांनी उमेदावारीचा अर्ज दाखल करताच दादांनी भरला डमी अर्ज.
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?
लोकसभेची निवडणूक म्हणजे अफझलखानाची... अमोल कोल्हे नेमकं काय म्हणाले?.
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर
ठरलं... रत्नागिरी-सिंधुदुर्गातून राणे लढणार, भाजपकडून 13 वी यादी जाहीर.