AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Video : अरबी समुद्रात चक्राकार वारे, अति मुसळधार पावसाचा इशारा, 22 जिल्ह्यांना अलर्ट; हवामान खात्याचा अंदाज काय?

अरबी समुद्रात चक्राकार वारे सक्रिय झाल्याने महाराष्ट्रात मान्सून पुन्हा सक्रिय झाला आहे. हवामान खात्याने राज्यातील 22 जिल्ह्यांना अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे, ज्यात रत्नागिरीला ऑरेंज, तर मुंबईला यलो अलर्ट देण्यात आला आहे. जून-जुलैमध्ये पावसाने दगा दिल्यानंतर आता कोकण किनारपट्टीवर जोर धरेल.

Video : अरबी समुद्रात चक्राकार वारे, अति मुसळधार पावसाचा इशारा, 22 जिल्ह्यांना अलर्ट; हवामान खात्याचा अंदाज काय?
mumbai monsoonImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Jul 28, 2026 | 10:15 AM
Share

जून आणि जुलैमध्ये पावसाने म्हणावा तसा जोर धरला नाही. राज्याच्या अनेक भागात पुरेसा पाऊस पडला नाही. त्यामुळे बळीराजाची चिंता वाढली आहे. काही भागात ढगफुटी सदृश्य पाऊस पडल्याने त्याचा शेतीला काही फायदा झालेला नाही. तर राज्यातील अनेक भाग अजूनही कोरडे ठाक आहेत. मात्र आता मान्सूनची परिस्थिती बदलत आहे. येत्या काही दिवसात राज्यात चांगला पाऊस होण्याचा अंदाज आहे. रत्नागिरीत तर पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे रत्नागिरीत पाऊस जोर धरेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

रत्नागिरी जिल्ह्यासाठी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. अरबी समुद्रात कोकण किनारपट्टीवर चक्राकार वारे निर्माण झाले आहेत. त्यामुळे किनारपट्टी भागात ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत. कोकणात सकाळपासूनच सरीवर सरी कोसळत आहेत. पुढील काही तासात कोकण किनारपट्टी भागात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. कोकणात आज पासून पुढचे चार दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

समुद्र खवळलेला राहणार

या चार दिवसात समुद्र देखील खवळलेला राहिल. समुद्रात चार मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. त्यामुळे मच्छिमारांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जूनपासून आजपर्यंत सरासरीच्या 50% पाऊस पूर्ण झाला आहे. अजूनही 50 टक्के पाऊस होण्याचा बाकी आहे.

मुंबईसह 22 जिल्हे अलर्टवर

दरम्यान, महाराष्ट्रात अतिमुसळधार पाऊस होणार आहे. हवामान खात्याकडून 22 जिह्यांना अलर्ट देण्यात आला आहे. त्याच बरोबर मुंबईला ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. राज्यात पाऊस परतला असताना पुढील काही दिवस मुंबईसह संपूर्ण राज्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे.

मुंबईतील वातावरण काय?

गेल्या चार दिवसापासून मुंबईत रिपरिप पडणारा पाऊस आज थांबला आहे. पावसाची रिपरिप बंद झाली आहे. मुंबईत चांगलं कडकडीत ऊन पडलं आहे. मुंबईची रस्ते वाहतूक सुरळीत आहे. ट्रेनही व्यवस्थित चालू आहे. कुठेही पाणी तुंबलेले नाही. मात्र, मुंबईलाही ऑरेंज अलर्ट देण्यात आल्याने मुंबईतील हवामान कधीही बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे. संध्याकाळपर्यंत पुन्हा मुंबईत पावसाची रिपरिप सुरू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पालघर जिल्ह्यात अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर बैठक

दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून पालघर जिल्ह्यात झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महत्त्वाची बैठक होणार आहे. या बैठकीत नुकसानग्रस्त भागातील मदत व पुनर्वसन, पंचनामे, शेती आणि पायाभूत सुविधांचे झालेले नुकसान तसेच नागरिकांना तातडीने दिल्या जाणाऱ्या मदतीबाबत चर्चा होणार आहे.

Follow Us
नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर!
Chandrashekhar Bawankule | नागपुरातील OYO हॉटेल्सवर आता पोलिसांची करडी नजर! चंद्रशेखर बावनकुळेंनी जाहीर केले कठोर नियम, संपूर्ण व्हिडिओ पहा
मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; सदावर्तेंचा इशारा
Gunaratna Sadavarte on Manoj Jarange | मागण्या कोणत्याही परिस्थितीत मान्य होणार नाहीत; गुणरत्न सदावर्तेंचा जरांगे पाटलांना थेट इशारा
भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच...
Pune | भरधाव कारने घेतला सॉफ्टवेअर इंजिनियरचा जीव! अपघातग्रस्त कारमधूनच रुग्णालयात नेलं, पण...
जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन्...
Ajay Baraskar | जरांगेंचं उपोषण ढोंगीपणाचं! अजय बारस्करांचा घणाघात; सगेसोयरे अन् हैदराबाद गॅझेटच्या नावाखाली समाजाची दिशाभूल
आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून...
Nashik Protest | आदिवासी विद्यार्थ्यांचा सरकारविरोधात एल्गार! 28 सप्टेंबरला नाशिकहून मुंबईकडे लॉंग मार्च; 5 ऑक्टोबरला मुंबईत धडक
माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद
Madhuri Elephant | माधुरी हत्तीणीने स्विमिंग टँकमध्ये उतरताच मनसोक्त लुटला पोहण्याचा आनंद; दृश्यांनी जिंकली सर्वांची मनं
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार