AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्र होरपळला, उष्माघाताचा पहिला बळी, धरणातील जलसाठा झाला कमी

Maharashtra Heats Waves : राज्यात तापमान वाढलं आहे. महाराष्ट्र होरपळला आहे. उन्हामुळे अंगाची लाही लाही होत आहे. तर दुसरीकडे धरणांतील जलसाठा कमी व्हायला लागला आहे. राज्यातल्या धरणात ४९ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. उष्माघाताचा पहिला बळी सोयगावमध्ये गेला आहे.

महाराष्ट्र होरपळला, उष्माघाताचा पहिला बळी, धरणातील जलसाठा झाला कमी
महाराष्ट्रात उष्माघाताचा पहिला बळीImage Credit source: टीव्ही ९ मराठी
| Updated on: Mar 26, 2025 | 1:51 PM
Share

होळी संपल्यानंतर उन्हाचा पारा वाढला आहे. महाराष्ट्र होरपळला आहे. उन्हामुळे अंगाची लाही लाही होत आहे. जणू राज्यावर सूर्य देव कोपला आहे.छत्रपती संभाजीनगरमधील सोयगाव तालुक्यात उष्माघाताचा पहिला बळी गेला आहे. तर दुसरीकडे धरणांतील जलसाठा कमी व्हायला लागला आहे. राज्यातल्या धरणात ४९ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. तापमान 40 अंशाच्या पुढे सरकल्याने हवामान खात्याने बाहेर फिरताना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

सोयगाव तालुक्यात उष्माघाताचा पहिला बळी

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढत आहे. सोयगाव तालुक्यात काल 39 अंश सेल्सिअस तापमान नोंदवण्यात आले होते. या तापमानामुळे सोयगाव तालुक्यात पहिला बळी गेला आहे. निमखेडी बस थांब्यावरील ही घटना घडली. उन्हात बस थांब्यात विसावा घेणार्‍या एका प्रवाशाचा उष्मघातामुळे मृत्यू झाला. अमोल दामोदर बावस्कर असे उष्मघातामुळे मृत्यू झालेल्या 25 वर्षीय तरुणाचे नाव आहे. सोयगाव पोलीस ठाण्यात आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मुंबईकरांनो, काळजी घ्या

शनिवारपासून मुंबईत तापमान वाढण्याची शक्यता, एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान खात्याने (IMD) या आठवड्याच्या शेवटपासून कमाल तापमान ३६°C पर्यंत जाण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. सध्या मुंबईत तापमान साधारण ३३°C च्या आसपास आहे.

हवामान विभागानुसार, शनिवारपासून तापमान वाढू लागेल आणि ३१ मार्चपर्यंत ३५°C पर्यंत घसरेल. या कालावधीत आकाश मुख्यतः स्वच्छ राहील. एप्रिल १ ते ६ दरम्यान मुंबई महानगर प्रदेशातील (MMR) काही भागांत प्री-मान्सूनच्या हलक्या पावसाची शक्यता आहे. मंगळवारी IMDच्या कुलाबा वेधशाळेत कमाल तापमान ३२.५°C आणि सांताक्रूझ वेधशाळेत ३३.५°C नोंदवले गेले. IMDच्या नोंदीनुसार, मुंबईत मार्च महिन्यातील आतापर्यंतचे सर्वाधिक तापमान २८ मार्च १९५६ रोजी ४१.७°C नोंदवले गेले होते.

गोंदियात तापमान वाढले

मार्च महिना शेवटच्या टप्प्यावर असतानाच उन्हाचे चटके वाढले आहेत. अशात हवामान विभागाने एप्रिल महिन्यापासून उन्हाच्या झळा तीव्र होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. गोंदिया जिल्ह्याचा पारा 36 अंशावर आहे. येत्या काही दिवसांत पारा आणखी वाढणार असून तापमान 40 अंशावर जाणार, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

जळगावमध्ये पारा 40 अंशावर

जळगाव जिल्ह्यात मार्च महिन्यातच तापमानाचा पारा 40 अंशावर पोहोचला आहे. तापमान 40 अंशावर पोहोचल्याने जळगाव जिल्ह्यात सर्वत्र उकाड्याचा त्रास वाढला आहे. मार्च महिन्यातच कडाकाचा उन्हाळा सहन करावा लागत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. उन्हापासून बचावण्यासाठी नागरिक मठ्ठा तसेच शीतपेयांच्या दुकानांवर गर्दी करत असल्याचे पाहायला मिळत आहे. सकाळी 9 वाजेपासून उन्हाचे चटके बसायला लागल्याने उन्हापासून बचावापासून नागरिक दुपारी बाहेर पडणे टाळत असल्याचे पाहायला मिळत आहे. आगामी काळात जिल्ह्यात उष्णतेचे लाट येणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज असल्याने जळगाव जिल्हा प्रशासन अलर्ट झाले आहे

उष्णतेपासून बचावासाठी जिल्हा प्रशासनाकडून जनजागृती केली जात असून उघड्यावर काम करणाऱ्या कामगारांनी साठी सुरक्षिततेच्या उपाय योजना करण्यात आले आहेत. उष्णतेचा धोका लक्षात घेता जिल्ह्यातील सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये स्वतंत्र कक्ष तसेच बेड ची व्यवस्था सुद्धा करण्यात आली आहे.

उन्हाळ्याच्या तोंडावरच टँकर

उन्हाची तीव्रता दिवसागणिक वाढत आहे. पाणी पातळीत घट होत आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विहिरींनी देखील आता तळ गाठायला सुरुवात केली आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी टंचाईच्या झळा बसायला आता सुरुवात झाली.छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात मागील 8 दिवसापूर्वी 16 गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होता मात्र त्यामध्ये आता भर पडून सद्यस्थितीत 36 गावांना 38 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. दरम्यान तापमानाचा पारा 39 अंशाच्या वर गेल्याने पाण्याचे बाष्पीभवन देखील होत आहे.

धरणाच्या घशाला हळूहळू कोरड

राज्यात एकीकडे तापमानात मोठी वाढ होत आहे, अनेक भागात पारा ४२ अंशाच्या पुढे गेला आहे. त्यामुळे पाण्याची गरज वाढलीय. तापमान वाढल्याने दुसरीकडे राज्यातील लघु, मध्यम आणि मोठ्या धरणांमधील पाणीसाठा कमी होतोय. सध्या राज्यातील सर्व धरणांमध्ये मिळून ४९ टक्केच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.

राज्यातील अनेक गावांमध्ये सध्या टॅंकरने पाणीपुरवठा सुरु आहे. तर दुसरीकडे धरणातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत आहे. नागपूर विभागातील सहा जिल्ह्यातील धरणांमध्ये ४६ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. तर अमरावती विभागात ५५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. पुणे विभागात ४७ टक्के, नाशिक विभागात ४९ टक्के आणि कोकण विभागात ५५ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. तर मराठवाड्यातील धरणांमध्ये सध्या ४७ टक्केच पाणीसाठा शिल्लक आहे. यंदाही पावसाळा लांबला, तर राज्यातील अनेक भागात पाणीटंचाईचं भीषण संकट निर्माण होऊ शकते.

विभागवार धरणातील पाणीसाठा काय

विभाग              सध्याचा पाणीसाठा

मराठवाडा         ४७ टक्के

नागपूर              ४६ टक्के

अमरावती         ५५ टक्के

नाशिक             ४९ टक्के

पुणे                   ४७ टक्के

कोकण             ५५ टक्के

राज्यातला एकूण ४९ टक्के पाणीसाठा

Follow Us
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवानाच रद्द केला
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवाना रद्द केला, नेमकं कारण काय?
काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात
Eknath shinde | काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात, 45 सरकारांचा दाखला देत म्हणाले...
शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल
Nagpur Farmer | शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! नागपूरच्या शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल चर्चेत, व्हिडिओ होतोय व्हायरल
राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे...
Rahul Gandhi | राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे परराष्ट्र धोरण नाही म्हणत मोदींवर निशाणा
शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
तू तेव्हा वाचला आहेस, आता वाचणार नाहीस! शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल
MNS Protest | केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल; आंदोलन पेटलं
हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Ramp Walk | हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! आत्मसमर्पित महिला नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन....
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन; रेशीम उद्योगाला मिळणार नवी झेप
राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
Supriya Sule | राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाल्या...
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश