AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आरक्षण देतो म्हणून शड्डू ठोकणारे गावाला पळाले का?; उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता एकनाथ शिंदे यांना डिवचले

मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सुरू केलेल्या उपोषणाबाबत उद्धव ठाकरे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी सरकारवर मराठा समाजाकडून होणाऱ्या उपेक्षेचा आरोप केला. सरकारने मराठा समाजाला न्याय द्यावा अशी मागणी करत, उद्धव ठाकरे यांनी सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे आणि मराठा समाजाला नेहमीच दुर्लक्ष केल्याचा आरोपही केला आहे.

आरक्षण देतो म्हणून शड्डू ठोकणारे गावाला पळाले का?; उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता एकनाथ शिंदे यांना डिवचले
| Updated on: Aug 29, 2025 | 2:15 PM
Share

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषणाचे हत्यार उपसले आहे. मनोज जरांगे पाटील ४८ तासांचा प्रवास करून, लाखो मराठा आंदोलकांसह आज सकाळी मुंबईतील आझाद मैदानावर दाखल झाले. आझाद मैदानात पोहोचताच त्यांनी मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनाला परवानगी दिल्याबद्दल मनोज जरांगे पाटील यांनी सरकारचे आभार मानले असले तरी त्यांनी थेट उपोषणाचा पवित्रा घेतलेला आहे. आता यावर शिवसेना ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्घव ठाकरेंनी टीका केली आहे. मराठी माणूस मुंबईत नाही येणार तर मग सुरत आणि गुवाहाटीला जाणार का, असा सवाल उद्धव ठाकरेंनी केला आहे.

उद्धव ठाकरे यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले. या दरम्यान उद्धव ठाकरेंना मराठा आंदोलनाबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सविस्तर भाष्य केले. आतापर्यंत या लोकांना वापरुन फेकून देण्यात आलं. पण मग आता त्यांचे सरकार आहे, त्यामुळे त्यांनी आरक्षण द्यायला हवे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

मग आमचं सरकार पाडलात कशासाठी?

नाईलाजाने त्यांना न्याय हक्कासाठी मुंबईत यावं लागलं आहे. त्यावेळी फडणवीसांनी सांगितलं होतं की जर त्यांचं सरकार असतं तर त्यांनी यांना न्याय दिला असता. दुसरे एक आहेत त्यांनी तर शिवाजी महाराजांची शपथ घेतली होती. आतापर्यंत या लोकांना वापरुन फेकून देण्यात आलं. पण मग आता त्यांचे सरकार आहे, त्यामुळे त्यांनी आरक्षण द्यायला हवे. आमचं सरकार पाडून तुमचं सरकार तुम्ही आणलात मग आमचं सरकार पाडलात कशासाठी, असा सवालही उद्धव ठाकरेंनी केला.

मुंबई मराठी माणसाची राजधानी

मराठी माणूस मुंबईत नाही येणार तर मग सुरत आणि गुवाहाटीला जाणार का. कारण मुंबई ही मराठी माणसाची राजधानी आहे. ज्यांनी आरक्षण देऊ हे शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं होतं, तेच आज सत्तेत आहेत, हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारायला हवा. पुन्हा पुन्हा मुख्यमंत्री होऊनही प्रश्न का सुटत नाही. आतापर्यंत मराठ्यांना फसवण्यात आले. ही सर्व जबाबदारी सरकारची आहे. गणेशोत्सव सुरु आहे. जी काही मराठी माणसं मुंबईत आलेली आहेत, ती इथे दंगल करायला आलेली नाही. न्यायहक्कासाठी आली आहेत, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

फक्त टोलावाटोलवी सुरु

ज्यांनी आरक्षण देऊ म्हणून शड्डू ठोकले होते ते लोक आता गावी पळालेत. का फक्त दर्शन घेतात. गेले अडीच वर्ष ते मुख्यमंत्री होते, आता अडीच वर्ष ते उपमुख्यमंत्री आहेत मग ते जरांगेंना न्याय का देऊ शकत नाहीत. फक्त टोलावाटोलवी सुरु आहे. त्यावर जो काही तोडगा आहे तो त्यांनी काढायला हवा, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.