AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दहिसरच्या विद्यामंदिर शाळेत ‘मराठी भाषा गौरव दिन’ दिमाखात साजरा

Marathi Bhasha Gaurav Diwas : मराठी भाषा गौरव दिन राज्यभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जात आहे. राज्यातील विविध शाळांमध्ये मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन केलं आहे. दहिसरच्या विद्यामंदिर शाळेतही असाच एक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाला अभिनेत्री ऋतुजा बागवे यांनी उपस्थिती लावली होती.

दहिसरच्या विद्यामंदिर शाळेत 'मराठी भाषा गौरव दिन' दिमाखात साजरा
दहिसरच्या विद्यामंदीर शाळेत 'मराठी राजभाषा दिन' दिमाखात साजराImage Credit source: TV9 Network
| Updated on: Feb 27, 2026 | 3:58 PM
Share

मराठी भाषा गौरव दिन 27 फेब्रुवारीला राज्यभर उत्साहात साजरा केला जातो. प्रत्येक मराठी माणसाला आपल्या मराठी संस्कृतीचा आणि साहित्याचा अभिमान वाटावा असा हा दिवस… मराठी भाषा फक्त महाराष्ट्रापुरतीच नाही तर सर्व सीमा ओलांडून सातासमुद्रापारही गेली आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जाही मिळाला आहे. तसेच मराठी जगातील दहाव्या क्रमांकाची सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. या दिवसाचं औचित्य साधून  दहिसरच्या ‘विद्या प्रसारक मंडळा’च्या ‘विद्या मंदिर’ शाळेत शुक्रवारी मराठी राजभाषा दिन मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी शाळेत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात विद्यार्थांनी मोठ्या उत्साहाने भाग घेतला होता. या कार्यक्रमासाठी विद्या प्रसारक मंडळाचे पदाधिकारी सर्व विभागांचे मुख्याध्यापक शिक्षक वर्ग तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी सभागृहात उपस्थित होते.

या प्रसंगी सुप्रसिद्ध अभिनेत्री ऋतुजा बागवे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या. विद्यार्थीभिमुख उपक्रम राबविण्यात अग्रेसर असणारी विद्या मंदिर शाळा अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम राबवीत असते. कवी कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनानिमित्त साजरा होणाऱ्या ‘मराठी राजभाषा दिना’चे औचित्य साधत शब्दशिल्प (खंड तीन) या मराठी हस्तलिखिताचे अनावरण अभिनेत्री बागवे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी विद्या मंदिर इंग्रजी माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी मराठी कविता, नाटिका आदी विविध कलागुणांचे सादरीकरण केले.

अभिनेत्री ऋतुजा बागवे या प्रसंगी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितलं की, पुस्तकांशी मैत्री करा. वाचनाने आत्मविश्वास वाढतो आणि व्यक्तिमत्त्व विकास घडतो. पु. ल. देशपांडे, द .मा. मिरासदार यांच्या पुस्तकाने वाचनाची गोडी निर्माण होते. तसेच नाटक सिनेमा मराठी साहित्य यांचा आस्वाद घ्या. त्याने आयुष्याला दिशा मिळते, याचे उदाहरण आपण स्वतः आहे, असे सांगत विद्यार्थ्यांना वाचनासाठी प्रवृत्त केले.

Follow Us
जयंत पाटील यांच्याकडून कृत्रिम फुलांवर बंदीची मागणी
जयंत पाटील यांच्याकडून कृत्रिम फुलांवर बंदीची मागणी.
रोहित पवारांनी घेतली संजय शिरसाटांची भेट; एकनाथ शिंदेंनाही भेटणार
रोहित पवारांनी घेतली संजय शिरसाटांची भेट; एकनाथ शिंदेंनाही भेटणार.
लाडकी बहीण योजनेमुळे इतर खात्यावर अन्याय होतोय! गणेश नाईकांचा आरोप
लाडकी बहीण योजनेमुळे इतर खात्यावर अन्याय होतोय! गणेश नाईकांचा आरोप.
कुंभमेळ्यात बिबटे घुसले तर? विधानसभेत अनिल परब यांचा प्रश्न
कुंभमेळ्यात बिबटे घुसले तर? विधानसभेत अनिल परब यांचा प्रश्न.
अजित पवारांचा मृत्यू धुक्याने झाला की धोक्याने? राज ठाकरेंचा प्रश्न
अजित पवारांचा मृत्यू धुक्याने झाला की धोक्याने? राज ठाकरेंचा प्रश्न.
यावर सुनेत्रा पवारांनी बोललं पाहिजे! राज ठाकरेंची स्पष्टोक्ती
यावर सुनेत्रा पवारांनी बोललं पाहिजे! राज ठाकरेंची स्पष्टोक्ती.
सरकारकडून अडथळे का आणले जाताय? राज ठाकरेंचा संतप्त सवाल
सरकारकडून अडथळे का आणले जाताय? राज ठाकरेंचा संतप्त सवाल.
आमच्यावर आणि भाजपवर आता बोलू नये! बावनकुळेंचा रोहित पवारांना सल्ला
आमच्यावर आणि भाजपवर आता बोलू नये! बावनकुळेंचा रोहित पवारांना सल्ला.
तुमच्याही आयफोनवर व्हॉट्सॲप चालत नाहीय का? असेल हे कारण
तुमच्याही आयफोनवर व्हॉट्सॲप चालत नाहीय का? असेल हे कारण.
दादांना कंट्रोल करता येत नव्हतं, काकींना..;रोहित पवारांचं मोठं वक्तव्य
दादांना कंट्रोल करता येत नव्हतं, काकींना..;रोहित पवारांचं मोठं वक्तव्य.