AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अशोक चव्हाण यांचा अजित पवार यांना महत्त्वाचा मेसेज? ‘देवगिरी’वर नेमकी खलबतं काय?

महाविकास आघाडीच्या गोटात महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे काँग्रेस नेते अशोक चव्हाण आज राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्या भेटीसाठी त्यांच्या 'देवगिरी' बंगल्यावर दाखल झाले. या दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वाच्या विषयावर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

अशोक चव्हाण यांचा अजित पवार यांना महत्त्वाचा मेसेज? 'देवगिरी'वर नेमकी खलबतं काय?
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Jun 28, 2023 | 7:21 PM
Share

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे अनेक घडामोडी घडत आहेत. या घडामोडींना सध्याच्या घडीला जास्त महत्त्व प्राप्त झालंय. कारण राज्यातील सध्याच्या घडीची राजकीय परिस्थिती तशी आहे. राज्यात वर्षभरापूर्वी सत्तांतर झालंय. मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्प्यातील विस्तार अद्याप झालेला नाही. मुंबई महापालिका निवडणुका काही दिवसांवर येवून ठेपल्या आहेत. त्यामुळे मुंबईत ठाकरे गट विरुद्ध सत्ताधारी शिवसेना आणि भाजप यांच्यात संघर्ष बघायला मिळतोय. मुंबई महापालिका निवडणुकांनंतर पुढच्यावर्षी लोकसभेची निवडणूक असणार आहे. लोकसभेची निवडणूक पार पडल्यानंतर लगेच काही महिन्यांनी राज्यात विधानसभेची निवडणूक पार पडणार आहे. या दरम्यान मुंबईत घडामोडींना वेग आला आहे.

महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. विशेष म्हणजे आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार आणि काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण यांच्यात बंद दाराआड चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार यांच्या ‘देवगिरी’ या बंगल्यावर दोन्ही नेत्यांमध्ये महत्त्वाची बैठक झाली. काँग्रेसच्या कोअर कमिटीची नुकतीच काल महत्त्वाची बैठक पार पडली. त्यानंतर अशोक चव्हाण आणि अजित पवार यांच्यात आज बैठक पार पडली आहे.

अशोक चव्हाण महत्त्वाचा मेसेज घेऊन ‘देवगिरी’वर आले?

काँग्रेसच्या कोअर कमिटीची नुकतीच महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत लोकसभेच्या जागावाटपाबाबत चर्चा झाल्याची माहिती समोर आली होती. आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील तीनही घटक पक्ष एकत्र निवडणूक लढवणार असल्याचं सांगण्यात येत आहे. पण जागावाटपाबाबत अजून निश्चित झालेलं नाही. याचबाबत काँग्रेसच्या गोटात काल हालचाली घडल्या. या बैठकीतला मेसेज घेऊन  अशोक चव्हाण आज अजित पवार यांच्या भेटीसाठी गेले होते का? असा प्रश्न आता उपस्थित होतोय.

बैठकीत नेमकी चर्चा काय?

या बैठकीनंतर अशोक चव्हाण यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. “महाविकास आघाडीची आज बैठक नव्हती. आम्ही दोघांनी आज राज्यातील राजकीय परिस्थितीबाबत चर्चा केली. काँग्रेसमध्ये जी चर्चा झाली त्याविषयी सांगितलं. तीनही पक्षांची महाआघाडी म्हणून एकत्र लढण्याची भूमिका आहे. अधिवेशनाबाबत चर्चा झाली. लोकसभा पूर्व तयारीबाबत आमच्या पक्षात जी चर्चा झाली त्याबाबत चर्चा झाली”, अशी प्रतिक्रिया अशोक चव्हाण यांनी दिली.

राज्यातील राजकीय परिस्थिती बदलली आहे. दरम्यान अजित पवार यांच्यासोबत जागावाटपाबाबत चर्चा झाली नाही. जागानिहाय चर्चा झाली नाही. ज्या ठिकाणी खासदार निवडून आले होते, जे खासदार पक्षात आहेत तिथे प्रश्न येणार नाही. जिथे नेते निघून गेले तिथे चर्चा होईल. तिथली राजकीय परिस्थिती पाहून चर्चा होईल, असं अशोक चव्हाण यांनी सांगितलं.

“विद्यमान परिस्थिती डोळ्यासमोर ठेवून मेरिट समोर ठेवून निर्णय घ्यावा लागेल. लोकसभा निवडणुकीबाबत काँग्रेस पक्षात काय चर्चा झाली याची अनौपचारिक चर्चा आजच्या बैठकीत झाली. ज्या जागेवर सिटींग खासदार आहेत, त्याबाबत प्रश्न येणार नाहीत. ज्या जागेवर नेते निघून गेले त्या जागेवर बदललेल्या राजकीय परिस्थिती नुसार चर्चा होईल”, असा पुनरुच्चार त्यांनी केला.

Follow Us
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह........
शेतकरी मोर्चादरम्यान मोठा गोंधळ, राजू शेट्टी, महादेव जानकरांसह.........
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध......
सरकारच्या नव्या निर्णयाने राज्यात खळबळ; सदावर्तेंचा जोरदार विरोध.......
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं...
मान्सूनबाबत मोठी अपडेट! अंदमानात 16 मेच्या आसपास तर, कोकणात पावसाचं....
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली
कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, मुख्यमंत्र्यांनी मंचावरून केली.
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ...
मराठवाड्यात पाणीटंचाईची भीती, जायकवाडीतील पाणी झपाट्याने घटलं, केवळ....
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य...
पुन्हा निळा ड्रम चर्चेत, नवरा आणि भावासोबत मिळून तरुणीचं अजब कृत्य....
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट..
महागाईचा भडका! गृहिणींचं बजेट कोलमडलं; टोमॅटो, मिरची, बीन्सचे दर थेट...