‘हे फक्त अतिक्रमण नव्हे तर…’, माहीम समुद्रातील अनधिकृत बांधकाम हटवल्यानंतर राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया!

माहिमच्या समुद्रातील अनधिकृत मशिदीचं दृश्य दाखवत खळबळ उडवली होती. अशातच मशिद हटवल्यानंतर राज ठाकरे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

'हे फक्त अतिक्रमण नव्हे तर...', माहीम समुद्रातील अनधिकृत बांधकाम हटवल्यानंतर राज ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया!
Follow us
| Updated on: Mar 24, 2023 | 6:29 PM

मंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या दिवशी मनसे मेळाव्यात शिवतीर्थावर सभा घेतली होती. यामध्ये त्यांनी माहिमच्या समुद्रातील अनधिकृत मजारीचं दृश्य दाखवत खळबळ उडवली होती. तसेच एका महिन्याचा अल्टिमेटम सरकारला दिला होता. मात्र सभा संपताच पोलिसांनी तिथे जाऊन पाहणी केली होती. दुसऱ्या दिवशी सरकारने अनधिकृत मजार हटवली. राज ठाकरे यांच्या या कृतीमुळे राज्य भरातून त्यांचं कौतुक केलं गेलं. त्यासोबतच त्यांच्यावर टीकाही झाली. अशातच मजार हटवल्यानंतर राज ठाकरे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

काय म्हणाले राज ठाकरे-

धर्मांध मुस्लिमांनी मुंबईत माहीमच्या समुद्रात बांधलेल्या अनधिकृत मजारीची, सांगलीत कुपवाडच्या हिंदू वस्तीत परवानगी नसताना अतिक्रमण करून बांधलेल्या अनधिकृत मजारीची दृश्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्यात व्हिडिओद्वारे दाखवली आणि अनेकांना धक्का बसला. तात्काळ दुसऱ्याच दिवशी महाराष्ट्र सरकारने त्या अनधिकृत बांधकामांवर तडक कारवाई केली त्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, मुंबई मनपा आयुक्त इक्बाल चेहेल यांच्यासह सर्वांचे आभार राज ठाकरे यांनी मानले आहेत.

आपल्या डोळ्यादेखत अशी अतिक्रमणं राज्यभर सुरु आहेत, लक्षात घ्या हे फक्त अतिक्रमण नव्हे तर धार्मिक स्थळांच्या आडून केलेलं हे आक्रमणच आहे. त्यावर वेळीच उपाययोजना नाही झाली तर हेच आपल्याला भविष्यात त्रासदायक ठरू शकतं. त्यामुळे शासन-प्रशासनासह प्रत्येक हिंदू बांधवानेही दक्ष राहायलाच हवं, असं आवाहनही राज ठाकरे यांनी केलं आहे.

राज ठाकरे यांच्या दाव्यावरून आरोप प्रत्यारोप

माहिममधील या मजारीचं बांधकाम हे दोन वर्षांआधीचं असल्याचं म्हणत राज ठाकरे यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता. मात्र ठाकरे गटाकडून याबाबतची बातमी 2007 मध्येच प्रसिद्ध केलीये अशी माहिती उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांनी दिली. तसेच या सर्व आरोपानंतर सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. ज्यामध्ये अनेक अनुयायी मजारीपर्यंत जाताना दिसत आहेत. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा व्हिडीओ  2018 सालचा हा व्हिडीओ आहे त्यामुळे राज ठाकरेंनी दोन वर्षांआधीचं मजारीचं बांधकाम असल्याच्या दाव्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. या शंकेला मनसे प्रवक्ते संदीप देशपांडे यांनी उत्तर दिलं आहे

मजारी ही आधीपासूनच आहे मात्रव त्याच्या बाजूचं बांधकाम हे दोन वर्षांपूर्वी झाल्याची प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी दिली आहे. या प्रकरणावरून राज्यातील वातावरण तापण्याची शक्यता आहे कारण याआधी मशिदीवरील भोग्यांचा मुद्दा पेटला होता. त्याप्रमाणेच आता राज्यातील धार्मिक अनधिकृत बांधकामांचा मुद्दा पेटू शकतो.

Non Stop LIVE Update
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.