AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोकांना अंधारात ढकलणाऱ्या सरकारला गाडून टाका, वीज बिल मुद्यावर मनसे आक्रमक

मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी वीज बिल प्रश्नावरुन राज्य सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे. Bala Nandgaonkar Thackeray Government

लोकांना अंधारात ढकलणाऱ्या सरकारला गाडून टाका, वीज बिल मुद्यावर मनसे आक्रमक
बाळा नांदगावकर, मनसे नेते
| Updated on: Jan 20, 2021 | 2:14 PM
Share

मुंबई: मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी वीज बिल, मराठा आरक्षणाच्या मुद्यावरुन राज्य सरकार आणि शिवसेनेवर निशाणा साधला आहे. महावितरणनं वीज ग्राहकांना वीज बिल भरलं नाहीतर वीज कापण्याचा इशारा देण्यात आला आहे. सरकारकडून एका बाजूला वीज बील माफ करण्याबाबत वेगवेगळ्या गोष्टी सांगितल्या जातात. ऊर्जा मंत्री गोड बातमी देऊ असं सांगतात. 100 यूनिटपर्यंत वीज मोफत देऊ असं सागतात. हे सरकार लोकांच्या भल्यासाठी आलेले नाही. हे लोकांचे दुश्मन आहेत हे जनेतला कळलं पाहिजे, असं नांदगावकर म्हणाले. ( MNS leader Bala Nandgaonkar criticize Thackeray Government over electricity bill issue)

लोकांना अंधारात ढकलणाऱ्या सरकारला गाडून टाका

वीज बिल भरलं नाहीत तर वीज तोडण्याचा निर्णय हा तुघलकी स्वरुपाचा आहे. या सरकाला लोकांना निश्चितपणे अंधारात ढकलायचं आहे. हे सरकार लोकांच्या भल्यासाठी आल्याचं दाखवतं आहे मात्र ते तीन पक्षांच्या भल्यासाठी आलेले आहे. जनतेने सरकारला गाडून टाकावं, आवाहन बाळा नांदगावकर यांनी केले. मनसे वीज बीलप्रश्नी रस्त्यावर उतरली, आंदोलन केले, निवेदन दिले हात जोडले, मनसेने वीज बिल प्रश्नी काय आणखी काय करायला पाहिजे, असा सवाल नांदगावकरांनी केला. हे सरकार लोकांना अंधारात ढकलणार असेल तर लोकांनीही राज्य सरकारला अंधारात ढकलायला तयार राहिलं पाहिजे, असं बाळा नांदगावकर म्हणाले.

मराठा समाजावर अन्याय का?

मराठा आरक्षणाची सुनावणी 5 फेब्रुवारीला होणार आहे याविषयी बोलताना बाळा नांदगावकरांनी सरकार चालढकल करत असल्याचं म्हटलं. राज्य सरकार मराठा आरक्षणाबाबत चालढकल का करत आहे. वारंवार वेळ वा का मागितली जात आहे. जर आरक्षण द्यायचंच आहे तर देऊन टाका उगा टांगती तलवार ठेऊ नका. मराठा समाजावर अन्याय का केला जात आहे, असा सवाल बाळा नांदगावकरांनी राज्य सरकारला केला आहे.

शिवसेनेचं हिंदुत्व बदललं

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना आता राहिली नाही. शिवसेना बदलली असल्याचं राज्यात महाविकास आघाडी सरकार बनवतात सिद्ध झालं आहे, अशी टीकाही बाळा नांदगावकरांनी केली. शिवसेनेचे हिंदुत्त्व आता बदललं आहे, असंही नांदगावकर म्हणाले.

संबंधित बातम्या:

राजू शेट्टींचा मुद्द्याला हात, महाविकास आघाडीवर पुन्हा घणाघात

Maratha Reservation|भाजप नेत्यांचं समाधान करण्यापेक्षा मराठा समाजाला न्याय द्या : देवेंद्र फडणवीस

( MNS leader Bala Nandgaonkar criticize Thackeray Government over electricity bill issue)

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.