AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

78 वर्षांपूर्वी मुंबई समुद्रात अशीच दूर्घटना; 40 फुटांची लाट अन् 600 प्रवाशांसह बोट बुडाली  

मुंबईत गेटवे ऑफ इंडियाजवळ नीलकमल बोटीची दुर्घटना घडल्यानंतर 78 वर्षांपूर्वी घडलेल्या अशाच एका दुर्घटनेची आठवण येते. ती म्हणजे रामदास बोटीची. कारण ही बोट मुंबई समुद्रात बुडून 600 पेक्षा जास्त जणांना जलसमाधी मिळाली होती. आतापर्यंतची ही सर्वात भयानक घटना मानली जाते.

78 वर्षांपूर्वी मुंबई समुद्रात अशीच दूर्घटना; 40 फुटांची लाट अन् 600 प्रवाशांसह बोट बुडाली  
Mayuri Sajerao
Mayuri Sajerao | Updated on: Dec 19, 2024 | 5:51 PM
Share

मुंबई येथील गेटवे ऑफ इंडिया येथून एलिफंटाकडे जाणारी नीलकमल बोट बुडाल्याची दुर्घटना घडली. या दुर्घटनेत आत्तापर्यंत 13 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेसाठी सर्वांनीच हळहळ व्यक्त केली आहे. पण नीलकमल बोट बुडाल्याची ही पहिलीच घटना नाही. 78 वर्षांपूर्वीदेखील मुंबईत यापेक्षाही भयानक दुर्घटना घडली होती.

78 वर्षांपूर्वी मुंबईच्या समुद्रात अशीच दूर्घटना

78 वर्षांपूर्वी मुंबईच्या समुद्रात अशीच एक दूर्घटना घडली होती. या घटनेट चक्क तब्बल 600 पेक्षा जास्त प्रवाशांना जलसमाधी मिळाली होती. ही घटना घडली होती भाऊच्या धक्क्यावर. भाऊच्या धक्क्याकडून रेवस येथे जाण्यासाठी निघालेल्या ‘एमएस रामदास’ ही बोट बुडाली होती. या दुर्घटनेत 600 पेक्षा जास्त जणांचा बुडून मृत्यू झाला होता.

1947 साली भारत स्वातंत्र्य होण्याआधीच महाराष्ट्रावर मोठा आघात झाला होता. 17 जुलै 1947 साली सकाळी 8 वाजता मुंबईच्या भाऊच्या धक्क्याकडून रेवस येथे जाण्यासाठी एमएस रामदास निघाली खरी मात्र त्याआधीच बोटीला जलसमाधी मिळाली. मुंबई बंदरापासून 7.5 किमी अंतर बोटीने कापले होते त्याचवेळी मुसळधार पाऊस सुरू झाला. बोट वेगाने पुढे जात होती त्याचवेळी सोसाट्याचा वारा आणि उसळलेल्या लाटांमुळे बोट काशाच्या खडकांजवळ कलली.

महाकाय लाटेने जहाज पाण्यात कलंडलं

बोट खडकाजवळ उलटल्यानंतर हळूहळू बोटीत पाणी भरू लागलं. बोटीत पाणी शिरत असल्याचे पाहून प्रवासी घाबरले. जीव वाचवण्यासाठी प्रत्येकजण धडपडू लागला. यावेळी बोटीमध्ये लाइफ जॅकेटची संख्याही कमी होती. त्याचवेळी रामदास जहाज गल्स दीपजवळ पोहोचले आणि नेमकं त्याचवेळी आलेल्या महाकाय लाटेने जहाज पाण्यात कलंडलं, त्यामुळे पाणी जहाजात पूर्णपणे शिरले. ज्या प्रवाशांना पोहता येत होतं त्यांनी पटापट समुद्रात उडी घेत जीव वाचवला तर काही जण अडकून पडले. सकाळी 9च्या सुमारास पूर्ण जहाजच समुद्रात बुडालं.

10 वर्षाच्या मुलामुळे दुर्घटनेची माहिती 

साधारणतः मुंबईहून रेवासला पोहोचण्यासाठी 1.30 तासांचा अवधी लागतो. मात्र, जहाज बुडाल्याची माहिती संध्याकाळी 5पर्यंत कोणालाही नव्हती. बारक्या मुकादम या 10 वर्षांच्या मुलाने मोठ्या हिंमतीनं कसाबसा मुंबईचा किनारा गाठला तेव्हा मुंबईतील या सर्वात मोठ्या दुर्घटनेची माहिती सर्वांना मिळू शकली. त्यानंतर कंपनीने दोन बोटी प्रवाशांच्या मदतीसाठी पाठवल्या होत्या. मात्र तोपर्यंत सर्व संपलं होतं. 630 जणांना या घटनेत जलसमाधी मिळाली होती तर 60 ते 70 जणांचा जीव वाचला होता.

रेवस येथील कोळीबांधवानी काही जणांना वाचवून किनाऱ्यावर आणले होते. कोळीबांधवानी हजारो रुपयांची मासळी समुद्रात फेकून बुडणाऱ्या प्रवाशांना वाचवून रेवस बंदरावर पोहोचवलं. बोटीचा कॅप्टन यासह बरेच खलाशी यांचाही जीव वाचला होता. बुडालेल्या रामदास बोटीचे काही अवशेष अपघातानंतर सुमारे दहा वर्षांनी म्हणजे 1957 मध्ये मुंबईतील बेलॉर्ड पिअरच्या समुद्रकिनार्‍यावर वाहात आले होते.

Follow Us
तुमची 'डेंटल एज' जाणा, सेन्सोडाईन-टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम
तुमची 'डेंटल एज' जाणा, सेन्सोडाईन-टीव्ही 9 नेटवर्कचा उपक्रम.
लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; नेमकं..
लवांडे यांना खरंच पोलिसांनी अटक केलं? सर्वात मोठी माहिती समोर; नेमकं...
'कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील' 6 दिवसांपूर्वी...
'कॉक्रोच जनता पार्टीचे 10-15 आमदार निवडून येतील' 6 दिवसांपूर्वी....
कर्जमाफी, क्रॉपलोन आणि AI; शेतकऱ्यांसाठी सरकारचा मास्टर प्लॅन
कर्जमाफी, क्रॉपलोन आणि AI; शेतकऱ्यांसाठी सरकारचा मास्टर प्लॅन.
मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीला सर्वात मोठा दणका, ट्वीटर अकाऊंट थेट..
मोठी बातमी! कॉकरोच जनता पार्टीला सर्वात मोठा दणका, ट्वीटर अकाऊंट थेट...
काळीज पिळवटून टाकणारी घटना! आईनंच 22 दिवसांच्या तान्ह्या बाळाला आपटलं
काळीज पिळवटून टाकणारी घटना! आईनंच 22 दिवसांच्या तान्ह्या बाळाला आपटलं.
विकास लवांडे यांना अटक, कारवाईनंतर फोटो समोर; पुढं नेमकं काय होणार?
विकास लवांडे यांना अटक, कारवाईनंतर फोटो समोर; पुढं नेमकं काय होणार?.
नाशिक पुन्हा हादरलं! सुनेचा 8 वेळा गर्भपात, नंतर बळजबरीनं... सासु-सासर
नाशिक पुन्हा हादरलं! सुनेचा 8 वेळा गर्भपात, नंतर बळजबरीनं... सासु-सासर.
महागाईविरोधातील आंदोलन पेटलं; नागपुरात घोषणाबाजी अन् मोठा गोंधळ
महागाईविरोधातील आंदोलन पेटलं; नागपुरात घोषणाबाजी अन् मोठा गोंधळ.
रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात राज ठाकरे निर्दोष, 18 वर्षांनी कोर्टाचा नि
रेल्वे भरती आंदोलन प्रकरणात राज ठाकरे निर्दोष, 18 वर्षांनी कोर्टाचा नि.