AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

“…तेव्हापासून पातळी सोडून हीन दर्जाचे राजकारण”; राऊतांनी टीका करताच शिवसेनेने राजकाणाची संस्कृती सांगितली

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उदाहरण देत त्यांनी सांगितले की, एकनाथ शिंदे नेहमी सांगतात की, की मला तुम्ही कितीही शिवा शाप द्या,किती पण टीका करा पण माझं उत्तर हे कामातून असेल आम्ही पातळी कधी सोडली नाही सोडणारदेखील नाही

...तेव्हापासून पातळी सोडून हीन दर्जाचे राजकारण; राऊतांनी टीका करताच शिवसेनेने राजकाणाची संस्कृती सांगितली
| Updated on: Jun 03, 2023 | 10:27 PM
Share

मुंबई : राज्यातील राजकारण वेगवेगळ्या राजकीय घडामोडींनी आणि आरोप-प्रत्यारोपांनी घडत असतानाच मविआतील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर आला आहे. त्याचवेळी खासदार संजय राऊत यांनी श्रीकांत शिंदे यांच्यासह अजित पवार यांच्यावर टीका केली होती. त्यांच्या त्या टीकेला खासदार श्रीकांत शिंदे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. यावेळी बोलताना श्रीकांत शिंदे यांनी सांगितले की, ज्या प्रमाणे मला वाटतं जसं सुसंस्कृत महाराष्ट्र आहे, त्या महाराष्ट्राला एक वेगळा इतिहास आहे आणि एक वेगळी संस्कृती आहे, मात्र गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण गढूळ झाले आहे. जिथे विरोधकदेखील एकमेकांचे नाव आदराने घेत असतात. मात्र आज त्या सगळ्या पातळ्या सोडून दिल्या जात असल्याची टीकाही खासदार श्रीकांत शिंदे यांनी केली आहे.

श्रीकांत शिंदे यांनी टीका करताना विरोधकांचा जोरदार समाचार घेतला आहे. विरोधक सकाळपासूनच शिव्या शाप देण्याचे काम सुरू करतात ते रात्रीपर्यंत त्यांची टीका करणे सुरूच असतं. त्यामुळे महाराष्ट्राची संस्कृती ही दूषित करण्याचे हे काम केले जाते आहे अशी टीकाही त्यांनी यावेळी केली आहे.

यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की, मला वाटतं बाकीचे राज्य आपल्याकडे कोणत्या नजरेने पाहतात, ती राज्य आपल्याकडे ज्या भावनेने पाहतात, जे युवक आपल्याकडे कसे बघतात त्यावर विचार करुन आपण आपले काम केले पाहिजे आणि टीका टिप्पणी केली पाहिजे असंही त्यांनी यावेळी सांगितले.

सत्ता येते, सत्ता जाते तसेच राज्यात या अगोदरदेखील सत्ता आल्या होत्या आणि सत्ता उलटवल्या गेल्या होत्या. पुन्हा लोक सत्तेत आले पण गेल्या दहा महिन्यांपासून महाविकास आघाडीचे सरकार उलथवून लावले आहे, त्यावेळे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेने सरकार उलथवून लावले आहे तेव्हापासून पातळी सोडून हीन दर्जाचे राजकारण केलं जातं आहे.

त्यामुळे त्यांनी म्हटले आहे की, मला लोकांना हे सांगायचं आहे की, आपण व्यक्त झालं पाहिजे मात्र चुकीच्या पद्धतीने व्यक्त होणे आणि सध्याच्या राजकारणात जे चालले आहे तसे मात्र व्यक्त होऊ नकास असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला आहे.

त्यामुळे आता कामाचे उत्तर कामाने दिले पाहिजे शिव्या शाप किंवा थुंकून या सगळ्या गोष्टी होणार नाहीत असा टोलाही त्यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.

तसेच यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे उदाहरण देत त्यांनी सांगितले की, एकनाथ शिंदे नेहमी सांगतात की, की मला तुम्ही कितीही शिवा शाप द्या,किती पण टीका करा पण माझं उत्तर हे कामातून असेल आम्ही पातळी कधी सोडली नाही सोडणारदेखील नाही असा विश्वासही त्यांनी यावेळी दिला आहे.

अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण
अजितदादांचा अंत्यविधी सुरु असताना... तटकरेंच्या विधानाने चर्चांना उधाण.
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान
सुनेत्रा पवारांच्या पाठीशी केंद्राची ताकद; तटकरे यांचे मोठे विधान.
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!
राज ठाकरेंनी घाबरू नये, भगतसिंह कोश्यारींच्या विधानाची चर्चा!.
रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक...
रोहित पवारांच्या घातपाताच्या दाव्यानंतर मोठ्या घडामोडी, DGCA चे पथक....
अजितदादांचा मृतदेह...रोहित पवारांचा खळबळजनक दावा, दिल्लीत मोठं विधान!
अजितदादांचा मृतदेह...रोहित पवारांचा खळबळजनक दावा, दिल्लीत मोठं विधान!.
बाळासाहेबांना अपेक्षित प्रशासन चालवू, भाजपचा महापौर होताच....
बाळासाहेबांना अपेक्षित प्रशासन चालवू, भाजपचा महापौर होताच.....
तो पूर्व विदर्भातील नेता कोण? नाव जाहीर करा... संजय राऊत यांचं आवाहन
तो पूर्व विदर्भातील नेता कोण? नाव जाहीर करा... संजय राऊत यांचं आवाहन.
मुंबई महापालिकेत महापौर राज सुरू; रितू तावडे महापौर तर...
मुंबई महापालिकेत महापौर राज सुरू; रितू तावडे महापौर तर....
रितू तावडे यांनी सांगितला मास्टर प्लान, मुंबईतून या लोकांना...
रितू तावडे यांनी सांगितला मास्टर प्लान, मुंबईतून या लोकांना....
तो फोन, विदर्भातील नेता आणि... रोहित पवारांनी मांडल्या तीन मोठ्या शंका
तो फोन, विदर्भातील नेता आणि... रोहित पवारांनी मांडल्या तीन मोठ्या शंका.