AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विलिनीकरण तर राहिलं, पण एसटीचे पगार होत नाहीत, त्यामागचे खरे व्हिलन कोण?

एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येवरुन ज्या अनेक नेत्यांसहीत पडळकरांनी रान उठवलं होतं. त्याच पडळकरांच्या सांगलीत काल एसटी ड्रायव्हरनं आत्महत्या केली.

विलिनीकरण तर राहिलं, पण एसटीचे पगार होत नाहीत, त्यामागचे खरे व्हिलन कोण?
| Updated on: Feb 16, 2023 | 11:59 PM
Share

मुंबई : एसटीच्या रखडलेल्या पगाराचे पैसे अखेर मंजूर झाले आहेत. मात्र त्याच विंवचनेतून काल सांगलीत एका एसटी चालकानं आत्महत्या केल्याचा आरोप होऊ लागलाय. यावरुन विरोधक सरकारकडे बोट दाखवतायत., तसं गुणरत्न सदावर्ते यांनीआत्महत्येसाठी अधिकाऱ्यांना जबाबदार धरलंय. एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्येवरुन ज्या अनेक नेत्यांसहीत पडळकरांनी रान उठवलं होतं. त्याच पडळकरांच्या सांगलीत काल एसटी ड्रायव्हरनं आत्महत्या केली.

आत्महत्येमागे आर्थिक अडचणी, अनियमित पगार आणि परिस्थितीचं कारण सांगितलं जातंय. मात्र आज गोपीचंद पडळकरांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्यावर प्रतिक्रिया देण्यास स्पष्टपणे नकार दिलाय.

रखडलेल्या पगाराबद्दल काल राज्यातून अनेक एसटी कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला. त्यानंतर सरकारनं कोर्टात दिलेल्या हमीनुसार साडे तीन कोटी रुपये महामंडळाला दिले आहेत. त्यामुळे लवकरच एसटी कर्मचाऱ्यांना पगार होण्याची आशा आहे.

मात्र ऐतिहासिक संपानंतरही एसटी कर्मचाऱ्यांच्या समस्या थांबत नाहीयत. संपावेळी एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्यांना सरकारला जबाबदार धरणारे वकील सदावर्ते काल सांगलीत झालेल्या एसटी कर्मचाऱ्याच्या हत्येमागे आता अधिकाऱ्यांना दोषी ठरवतयात.

सरकारनं साडे तीनशे कोटी दिले असले तरी सहा महिन्यांचा बॅकलॉग भरण्यासाठी एक हजार कोटी गरज असल्याची मागणी होतेय. एसटी संपादरम्यान सरकारकडून महामंडळाला पगारापोटी दरमहा साडे तीनशे कोटी देण्याची हमी कोर्टात देण्यात आली होती. मात्र मागच्या दोन ते तीन महिन्यांपासून फक्त शंभर कोटी मिळत असल्याचा आरोप होतोय. त्यात सरकारच्या अधिकाऱ्यांनी 7 तारखेच्या बैठकीत दिलेल्या सूचनांनी खळबळ माजलीय.

महाराष्ट्र एसटी महामंडळानं यापुढे शासनावर अवलंबून न राहता स्वतःचं उत्पन्न वाढवून स्वयंपूर्ण होण्याकडे प्रयत्न करावेत. मात्र एसटी कोणत्याच सरकारच्या काळात नफ्यात राहिली नाही. एसटीचं ऑडिट काय सांगतंय ते पाहूयात.

ऑक्टोबर महिन्यात एसटीचं उत्पन्न होतं 659 कोटी, याच महिन्यात पगार आणि इतर एकूण खर्च 861 कोटी., म्हणजे तोटा झाला 351 कोटी नोव्हेंबरचं उत्पन्न 617 कोटी, खर्च 847 कोटी, तोटा 402 कोटी डिसेंबरचं उतप्न्न 648 कोटी, खर्च 854 कोटी, तोटा झाला 429 कोटी.

भ्रष्टाचाराच्या दलदलीतून एसटी बाहेर निघाल्यास एसटी नफ्यात येऊन वेळेत पगार होऊ शकतात, असं म्हणणारे तत्कालीन विरोधक आता सत्ताधारी होऊनही पुन्हा भ्रष्टाचाराचंच कारण देत पैशांची अडचण सांगू लागले आहेत.

Follow Us
लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर
Buldhana | लाखो भाविकांची आवडती शेगाव कचोरी FDAच्या रडारवर; कच्च्या मालाचे नमुने तपासणीसाठी जप्त
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार
NEET विद्यार्थ्यांना NTA कडून मोठी भेट! परीक्षेत 15 मिनिटे जास्त मिळणार, नवे नियम लागू
कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
Devendra Fadnavis On Shetkari Karjmafi | कर्जमाफीवर फडणवीसांचा मोठा खुलासा; ती अट का ठेवली? अखेर सांगितलं कारण!
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में.....
काँग्रेस म्हणजे बुडतं जहाज ! फडणवीसांचा घणाघात; बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना म्हणत संजय राऊतांनाही खोचक टोला
भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
Devendra Fadnavis UNCUT | मोदींच्या 12 वर्षांचा महाअहवाल! भारत चौथ्या क्रमांकावर; फडणवीसांनी उघड केली विकासाची आकडेवारी
भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले....
Devendra Fadnavis | भारताची आर्थिक महासत्ता बनण्याकडे झेप! फडणवीसांनी मांडले मोदी सरकारच्या 12 वर्षांचे रिपोर्ट कार्ड
पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
Rohit Pawar | रोहित पवारांचा एल्गार! पोलिसांनी परवानगी नाकारली तरी अन्नत्याग आंदोलनावर ठाम
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले.....
इकडे शरद पवार गटाच्या विलिनीकरणाच्या चर्चा, तिकडे राऊत म्हणाले, पश्चात्ताप झाला असेल तर या... रोख कुणाकडे?
काँग्रेसच्या झेंड्याखाली या...राऊतांच्या एका वक्तव्याने चर्चांना उधाण
Sanjay Raut UNCUT | काँग्रेसच्या झेंड्याखाली या... संजय राऊतांच्या त्या एका वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ....
मुंबईकरांनो सावधान! फक्त महिनाभराचं पाणी उरलं; तलावांमध्ये केवळ एवढे टक्के साठा...