AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत भीक मागून घेतली तीन एकर जमीन, मुलीचे थाटात केले लग्न, पण शेवटी…

Mumbai Crime News: शांताबाई यांचे पती गावात शेती करत होते. पतीच्या निधनानंतर दोन वर्षांनी त्यांच्याकडे कोणताही व्यवसाय उरला नाही. त्यामुळे 38 वर्षांपूर्वी त्या मुंबईत आल्या. त्यांनी मुंबईत येऊन भीक मागण्याचे काम सुरु केले.

मुंबईत भीक मागून घेतली तीन एकर जमीन, मुलीचे थाटात केले लग्न, पण शेवटी...
शांताबाई
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: May 23, 2024 | 5:40 PM
Share

मुंबई मायानगरी. अनेक जण आपले नशिब अजमवण्याासाठी मुंबईत येतात. गेल्या 38 वर्षांपूर्वी कराडमधून शांताबाई मुंबईत आली होती. काहीच कामधंदा नसल्यामुळे तिने भीक मागण्याचे काम सुरु केले. या भीक मागण्याच्या उद्योग सुरु केला. यामधून त्यांना महिन्याला 25 ते 35 हजार रुपये मिळत होते. त्यातील 25 हजार रुपये त्या कराडला राहणाऱ्या मुलीकडे पाठवत होत्या. त्यानंतर उरलेले पैसे स्वत:साठी खर्च करत होत्या. शांताबाईच्या मुलीने आणि नातवाने या पैशांमधून सुमारे 3 एकर जमीन खरेदी केली. त्यावर शेती सुरु केली. आज त्यांच्या शेतात कापूस, सोयाबीन आहे. तसेच उर्वरित जमिनीवर घरे बांधून त्यातून दरमहा लाखो रुपये भाडे मिळत आहेत. त्या शांताबाईंचे मुंबईत शुक्रवारी संशयास्पद निधन झाले. त्यांच्या मृत्यूची पोलीस चौकशी करत आहेत.

मुंबईत आल्या आणि भीक मागणे सुरु केले

शांताबाई यांचे पती गावात शेती करत होते. पतीच्या निधनानंतर दोन वर्षांनी त्यांच्याकडे कोणताही व्यवसाय उरला नाही. त्यामुळे 38 वर्षांपूर्वी त्या मुंबईत आल्या. त्यांनी मुंबईत येऊन भीक मागण्याचे काम सुरु केले. म्हणजेच गेल्या जवळपास 35-36 वर्षांपासून त्या मुंबईत भीक मागत होत्या. भीक मागूनच त्याने आपल्या एकुलत्या एक मुलीचे लग्न मोठ्या थाटामाटात केले होते.

चिंचोली बंदरमध्ये भाड्याच्या घरात वास्तव्य

विशेष म्हणजे, शांताबाई स्वत: शेवटच्या दिवसांपर्यंत मालाडच्या विठ्ठल नगर, चिंचोली बंदर येथे भाड्याच्या घरात राहत होत्या. या घरासाठी त्या दरमहा चार हजार रुपये घरमालकाला देत होत्या. याच घरात गेल्या आठवड्यात शुक्रवारी शांताबाई यांचा मृतदेह संशयास्पद स्थितीत सापडला. त्यानंतर मलाड पोलिसांनी हत्या आणि चोरीचा खटला दाखल केला आहे. या प्रकरणात तपास करुन 45 वर्षीय बैजू महादेव मुखिया याला अटक केली आहे.

बैजू शांताबाईच्या पूर्वी त्या घरात राहत होता. त्याची चौकशी पोलीस करत आहेत. या प्रकरणात बैजू याला सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अटक केली आहे.

Follow Us
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांनी घेतली वित्तमंत्र्यांची भेट, बैठकीत...
मोठी बातमी! मुख्यमंत्र्यांनी घेतली वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांची भेट; बैठकीत बड्या प्रकल्पांवर चर्चा
तरुणांसाठी शासनाची खास योजना! 1 कोटीच्या गुंतवणुकीवर 50 लाखांची...
तरुणांसाठी शासनाची खास योजना! उद्योगातील 1 कोटीच्या गुंतवणुकीवर 50 लाखांची सबसिडी, तब्बल...
मानेवाडीच्या मैदानावर रंगली भन्नाट बैलगाडा शर्यत; गावातीला आणवणींना...
मानेवाडीच्या मैदानावर रंगली भन्नाट बैलगाडा शर्यत; गावातील आठणवणींना उजाळा देणारा जबरदस्त व्हिडीओ
नुसती धावपळ...धुराचा कल्लोळ...आयकर विभागाच्या कार्यालयाला भीषण आग!
नुसती धावपळ... धुराचा लोट...आयकर विभागाच्या कार्यालयाला आग! अग्निशमनच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल
उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात मोठा गोंधळ! त्या अफवेने भाविकांमध्ये
उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात मोठा गोंधळ! त्या अफवेने भाविकांमध्ये धवपळ, 13 हुन अधिक...
गोल्डन नेस्टजवळ मेट्रोचा स्लॅब कोसळल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
गोल्डन नेस्टजवळ मेट्रोचा स्लॅब कोसळल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; मोठी दुर्घटना टळली
मनोज जरांगे पाटील यांची २९ ऑगस्टपासून पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा
मनोज जरांगे पाटील यांची २९ ऑगस्टपासून पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा
तर तुमच्या मागे रेडा लावणार', गिरीश महाजनांबाबत राऊतांचं विधान...
तर तुमच्या मागे रेडा लावणार', गिरीश महाजनांबाबत राऊतांचं अगदी जिव्हारी लागणारं वक्तव्य
राज्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली पंतप्रधानांची भेट
मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली पंतप्रधानांची भेट: राज्याच्या विकासासाठी मागितले सहकार्य
रायगडला नवा पालकमंत्री, गोगावलेंच्या निवडीने माणगावात आनंदोत्सव...
रायगडला नवा पालकमंत्री, गोगावलेंच्या निवडीने माणगावात आनंदोत्सव