AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai | मुंबईकरांसाठी अत्यंत आनंदाची बातमी…घाटकोपर स्टेशन होणार हायफाय…!

मुंबई रेल्वे विकास महामंडळाने हे काम हाती घेतले आहे. यामुळे प्रवाश्यांचा प्रवास अधिक सुखकर नक्कीच होणार आहे. मुंबईमध्ये मेट्रो, बेस्ट आणि लोकल ही सार्वजनिक वाहतूकीची मुख्य साधणे आहेत. मात्र, लोकांचा कल हा जास्त करून लोकलसाठीच असतो. कारण आपण इच्छत असलेल्या ठिकाणी लोकलमुळे अगदी कमी वेळेमध्ये पोहचतो.

Mumbai | मुंबईकरांसाठी अत्यंत आनंदाची बातमी...घाटकोपर स्टेशन होणार हायफाय...!
Image Credit source: indiarailinfo.com
| Edited By: | Updated on: May 18, 2022 | 11:14 AM
Share

मुंबई : मुंबईकरांसाठी (Mumbai) सकाळी सकाळी एक आनंदाची बातमी आहे. आता घाटकोपर रेल्वे स्टेशन हायफाय होणार आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या वतीने पुनर्विकास स्टेशनचा करण्यात येणार असून यामुळेच आता घाटकोपर (Ghatkopar) रेल्वे स्टेशन सुसज्ज असे होणार आहे. इतकेच नव्हेतर सरकते जिने तसेच लिफ्ट देखील स्टेशनमध्ये असणार आहे. यामुळे घाटकोपर स्टेशनवरून ये-जा करणाऱ्यांसाठी ही खूप मोठी आणि आनंदाची बातमी असणार आहे. घाटकोपर स्टेशनवरून दररोज लाखांच्या संख्येमध्ये प्रवासी प्रवास (Travel) करतात. घाटकोपर स्टेशन तीन पादचारी पुलांशी जोडणारे तब्बल 12 मीटर रुंदीच्या जिन्यांनी जोडण्यात येणार आहे.

घाटकोपर स्टेशनचे रूपडे पलटणार

अनेक प्रवाश्यांना पायऱ्या चढण्यास आणि उतरण्यास त्रास होतो. मात्र, आता सरकत्या जिन्यांमुळे प्रवाश्यांचा त्रास कमी होणार आहे. मात्र, एलिव्हेटेड डेक बांधण्यासाठी स्टेशनचे तिकीट घर पाडण्यात आले असून प्लॅटफॉर्म 1 वर बांधकाम सुरू करण्यात आले आहे. मधल्या 12 मीटर रुंदीच्या पादचारी पुलाच्या उत्तर दिशेला आणखी 12 मीटर रुंदीचा पादचारी पूल बांधण्यात येईल. यामुळे आता प्रवाश्यांना गर्दीची कटकट निश्चितपणे राहणार नाही. तसेच सीएसएमटी दिशेच्या 4 मीटर रुंदीच्या पादचारी पुलाच्या ऐवजी आता डबल डिस्चार्जचा नवा पादचारी पूल उभारला जाईल.

सरकत्या जिन्याची व्यवस्था

मुंबई रेल्वे विकास महामंडळाने हे काम हाती घेतले आहे. यामुळे प्रवाश्यांचा प्रवास अधिक सुखकर नक्कीच होणार आहे. मुंबईमध्ये मेट्रो, बेस्ट आणि लोकल ही सार्वजनिक वाहतूकीची मुख्य साधणे आहेत. मात्र, लोकांचा कल हा जास्त करून लोकलसाठीच असतो. कारण आपण इच्छत असलेल्या ठिकाणी लोकलमुळे अगदी कमी वेळेमध्ये पोहचतो. शिवाय मुंबईमध्ये वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न आहे. मात्र, ज्यावेळी आपण लोकलने प्रवास करतो, त्यावेळी वाहतूक कोंडीचा प्रश्न अजिबात निर्माण होत नाही.

Follow Us
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे
समन्स म्हणजे अंतिम निर्णय नाही, तपासानंतर पुढील कारवाई ठरते- बावनकुळे.
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश
डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का; प्रकाश तेलगोटे यांचा भाजपमध्ये पक्षप्रवेश.
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब...
इंदापुरात राष्ट्रवादीच्या बॅनवरून सुनेत्रा पवार यांचाच फोटो गायब....
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा
राज्यात गॅस तुटवडा; रिक्षाचालकांच्या शिरसाट यांच्या घराबाहेर रांगा.
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स
अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकर SIT कडून चौकशीसाठी समन्स.
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून....
भोंदू खरात प्रकरणाची विशेष कोर्टात सुनावणी; SIT अधिकाऱ्यांकडून.....
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन...
भोंदूबाबा खरात प्रकरणात 11 गुन्हे दाखल, कोर्टात SIT कडून पुन्हा दोन....
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?
अशोक खरातला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यापर्यंत कोण घेऊन गेले?.
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले
खरातच्या संपर्कात अनेक बडे नेते, राऊतांच्या आरोपांनंतर राजकारण तापले.
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात
जैन समाजासाठी सिलेंडरची सोय, भाजपचा सर्वात मोठा नेता वादाच्या भोवऱ्यात.