AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai | मुंबईकरांसाठी अत्यंत आनंदाची बातमी…घाटकोपर स्टेशन होणार हायफाय…!

मुंबई रेल्वे विकास महामंडळाने हे काम हाती घेतले आहे. यामुळे प्रवाश्यांचा प्रवास अधिक सुखकर नक्कीच होणार आहे. मुंबईमध्ये मेट्रो, बेस्ट आणि लोकल ही सार्वजनिक वाहतूकीची मुख्य साधणे आहेत. मात्र, लोकांचा कल हा जास्त करून लोकलसाठीच असतो. कारण आपण इच्छत असलेल्या ठिकाणी लोकलमुळे अगदी कमी वेळेमध्ये पोहचतो.

Mumbai | मुंबईकरांसाठी अत्यंत आनंदाची बातमी...घाटकोपर स्टेशन होणार हायफाय...!
Image Credit source: indiarailinfo.com
| Edited By: | Updated on: May 18, 2022 | 11:14 AM
Share

मुंबई : मुंबईकरांसाठी (Mumbai) सकाळी सकाळी एक आनंदाची बातमी आहे. आता घाटकोपर रेल्वे स्टेशन हायफाय होणार आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या वतीने पुनर्विकास स्टेशनचा करण्यात येणार असून यामुळेच आता घाटकोपर (Ghatkopar) रेल्वे स्टेशन सुसज्ज असे होणार आहे. इतकेच नव्हेतर सरकते जिने तसेच लिफ्ट देखील स्टेशनमध्ये असणार आहे. यामुळे घाटकोपर स्टेशनवरून ये-जा करणाऱ्यांसाठी ही खूप मोठी आणि आनंदाची बातमी असणार आहे. घाटकोपर स्टेशनवरून दररोज लाखांच्या संख्येमध्ये प्रवासी प्रवास (Travel) करतात. घाटकोपर स्टेशन तीन पादचारी पुलांशी जोडणारे तब्बल 12 मीटर रुंदीच्या जिन्यांनी जोडण्यात येणार आहे.

घाटकोपर स्टेशनचे रूपडे पलटणार

अनेक प्रवाश्यांना पायऱ्या चढण्यास आणि उतरण्यास त्रास होतो. मात्र, आता सरकत्या जिन्यांमुळे प्रवाश्यांचा त्रास कमी होणार आहे. मात्र, एलिव्हेटेड डेक बांधण्यासाठी स्टेशनचे तिकीट घर पाडण्यात आले असून प्लॅटफॉर्म 1 वर बांधकाम सुरू करण्यात आले आहे. मधल्या 12 मीटर रुंदीच्या पादचारी पुलाच्या उत्तर दिशेला आणखी 12 मीटर रुंदीचा पादचारी पूल बांधण्यात येईल. यामुळे आता प्रवाश्यांना गर्दीची कटकट निश्चितपणे राहणार नाही. तसेच सीएसएमटी दिशेच्या 4 मीटर रुंदीच्या पादचारी पुलाच्या ऐवजी आता डबल डिस्चार्जचा नवा पादचारी पूल उभारला जाईल.

सरकत्या जिन्याची व्यवस्था

मुंबई रेल्वे विकास महामंडळाने हे काम हाती घेतले आहे. यामुळे प्रवाश्यांचा प्रवास अधिक सुखकर नक्कीच होणार आहे. मुंबईमध्ये मेट्रो, बेस्ट आणि लोकल ही सार्वजनिक वाहतूकीची मुख्य साधणे आहेत. मात्र, लोकांचा कल हा जास्त करून लोकलसाठीच असतो. कारण आपण इच्छत असलेल्या ठिकाणी लोकलमुळे अगदी कमी वेळेमध्ये पोहचतो. शिवाय मुंबईमध्ये वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न आहे. मात्र, ज्यावेळी आपण लोकलने प्रवास करतो, त्यावेळी वाहतूक कोंडीचा प्रश्न अजिबात निर्माण होत नाही.

Follow Us
दिल्लीच्या रस्त्यावर माकडं जशी उड्या मारतात... गांधींवर मस्केंची टीका
Naresh Maske | दिल्लीच्या रस्त्यावर माकडं जशी उड्या मारतात... राहुल गांधींवर नरेश मस्केंची बोचरी टीका!
देवेंद्र फडणवीस यांच्या मागणीनुसार मुंबईसाठी २३८ एसी लोकल मंजूर
मुंबईला मिळणार २३८ एसी लोकल; फडणवीसांनी मानले केंद्र सरकारचे आभार
मुंबईत डोमिनोजच्या तीन आउटलेटचे परवाने निलंबित
मुंबईत डॉमिनोजवर एफडीएची कारवाई: तीन आउटलेटचे परवाने निलंबित
मोठी बातमी! शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी निर्णायक वळणावर, आमदारांच्या...
मोठी बातमी! शिवसेना पक्ष-चिन्ह सुनावणी निर्णायक वळणावर, आज आमदारांच्या अपात्रतेवरुन युक्तीवाद, थेट....
बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त, पाच आरोपींना अटक
नाशिकमध्ये बनावट नोटांचा कारखाना उद्ध्वस्त, पाच आरोपींना अटक
माझ्या कार्यक्रमानंतर भाजपकडून स्टेजचं शुद्धीकरण - खर्गे
Mallikarjun Kharge | माझ्या कार्यक्रमानंतर भाजपकडून स्टेजचं शुद्धीकरण - खर्गे
राजकीय समीकरणे आणि १३ ऑगस्टच्या प्रमुख बातम्या
महाराष्ट्र आणि राष्ट्रीय घडामोडी: राजकीय समीकरणे आणि १३ ऑगस्टच्या प्रमुख बातम्या
शिवसेना कुणाची? आज ठाकरे गटाचा युक्तिवाद संपणार; शिंदे गट....
शिवसेना कुणाची? आज ठाकरे गटाचा युक्तिवाद संपणार; शिंदे गट सुप्रीम कोर्टात बाजू मांडणार!
धनुष्यबाण गोठणार? शिवसेना ठाकरेंना परत मिळणार? सरोदेंचा खळबळजनक दावा!
धनुष्यबाण गोठणार? शिवसेना ठाकरेंना परत मिळणार? असीम सरोदेंचा खळबळजनक दावा!
टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?
मोठी घडामोड! टेकऑफ घेणार इतक्यात... उदय सामंतांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय झालं?