Mumbai | मुंबईकरांसाठी अत्यंत आनंदाची बातमी…घाटकोपर स्टेशन होणार हायफाय…!

मुंबई रेल्वे विकास महामंडळाने हे काम हाती घेतले आहे. यामुळे प्रवाश्यांचा प्रवास अधिक सुखकर नक्कीच होणार आहे. मुंबईमध्ये मेट्रो, बेस्ट आणि लोकल ही सार्वजनिक वाहतूकीची मुख्य साधणे आहेत. मात्र, लोकांचा कल हा जास्त करून लोकलसाठीच असतो. कारण आपण इच्छत असलेल्या ठिकाणी लोकलमुळे अगदी कमी वेळेमध्ये पोहचतो.

Mumbai | मुंबईकरांसाठी अत्यंत आनंदाची बातमी...घाटकोपर स्टेशन होणार हायफाय...!
Image Credit source: indiarailinfo.com
Follow us
| Updated on: May 18, 2022 | 11:14 AM

मुंबई : मुंबईकरांसाठी (Mumbai) सकाळी सकाळी एक आनंदाची बातमी आहे. आता घाटकोपर रेल्वे स्टेशन हायफाय होणार आहे. मुंबई रेल्वे विकास महामंडळाच्या वतीने पुनर्विकास स्टेशनचा करण्यात येणार असून यामुळेच आता घाटकोपर (Ghatkopar) रेल्वे स्टेशन सुसज्ज असे होणार आहे. इतकेच नव्हेतर सरकते जिने तसेच लिफ्ट देखील स्टेशनमध्ये असणार आहे. यामुळे घाटकोपर स्टेशनवरून ये-जा करणाऱ्यांसाठी ही खूप मोठी आणि आनंदाची बातमी असणार आहे. घाटकोपर स्टेशनवरून दररोज लाखांच्या संख्येमध्ये प्रवासी प्रवास (Travel) करतात. घाटकोपर स्टेशन तीन पादचारी पुलांशी जोडणारे तब्बल 12 मीटर रुंदीच्या जिन्यांनी जोडण्यात येणार आहे.

घाटकोपर स्टेशनचे रूपडे पलटणार

अनेक प्रवाश्यांना पायऱ्या चढण्यास आणि उतरण्यास त्रास होतो. मात्र, आता सरकत्या जिन्यांमुळे प्रवाश्यांचा त्रास कमी होणार आहे. मात्र, एलिव्हेटेड डेक बांधण्यासाठी स्टेशनचे तिकीट घर पाडण्यात आले असून प्लॅटफॉर्म 1 वर बांधकाम सुरू करण्यात आले आहे. मधल्या 12 मीटर रुंदीच्या पादचारी पुलाच्या उत्तर दिशेला आणखी 12 मीटर रुंदीचा पादचारी पूल बांधण्यात येईल. यामुळे आता प्रवाश्यांना गर्दीची कटकट निश्चितपणे राहणार नाही. तसेच सीएसएमटी दिशेच्या 4 मीटर रुंदीच्या पादचारी पुलाच्या ऐवजी आता डबल डिस्चार्जचा नवा पादचारी पूल उभारला जाईल.

हे सुद्धा वाचा

सरकत्या जिन्याची व्यवस्था

मुंबई रेल्वे विकास महामंडळाने हे काम हाती घेतले आहे. यामुळे प्रवाश्यांचा प्रवास अधिक सुखकर नक्कीच होणार आहे. मुंबईमध्ये मेट्रो, बेस्ट आणि लोकल ही सार्वजनिक वाहतूकीची मुख्य साधणे आहेत. मात्र, लोकांचा कल हा जास्त करून लोकलसाठीच असतो. कारण आपण इच्छत असलेल्या ठिकाणी लोकलमुळे अगदी कमी वेळेमध्ये पोहचतो. शिवाय मुंबईमध्ये वाहतूक कोंडीचा मोठा प्रश्न आहे. मात्र, ज्यावेळी आपण लोकलने प्रवास करतो, त्यावेळी वाहतूक कोंडीचा प्रश्न अजिबात निर्माण होत नाही.

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.