AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत कोरोना फोफावतोय, लॉकडाऊनबाबत पालकमंत्र्यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

लोकांनी ऐकलं नाही तर जगाने स्वीकारलेला लॉकडाऊनचा पर्याय आपल्यालासुद्धा स्वीकारावा लागेल, असे अस्लम शेख म्हणाले. (mumbai aslam shaikh corona lockdown)

मुंबईत कोरोना फोफावतोय, लॉकडाऊनबाबत पालकमंत्र्यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले...
अस्लम शेख आणि कोरोना विषाणूचा सांकेतिक फोटो
| Updated on: Apr 06, 2021 | 6:09 PM
Share

मुंबई : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. राजधानी मुंबईत तर ही परिस्थिती जास्तच गंभीर आहे. मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या अशीच वाढत राहिली तर येथे आगामी काळात परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आगामी काळात मुंबईत लॉकडाऊन लागू होणार असल्याचेही सांगितले जात आहे. याचे संकेत मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिले आहेत. “लोकांचा जीव वाचवणं ही आपली पहिली प्राथमिकता आहे. आपण अजूनही लॉकडाऊन लागू केलेला नाही. मात्र, लोकांनी ऐकलं नाही तर जगाने स्वीकारलेला लॉकडाऊनचा पर्याय आपल्यालासुद्धा स्वीकारावा लागेल, असे अस्लम शेख म्हणाले. (Mumbai guardian minister Aslam Shaikh said if people not following corona rule will implement lockdown)

“जगात जिथे जिथे लॉकडाउन लावण्यात आला आहे या सर्व ठिकाणी लोकांनी लॉकडाऊनला विरोध केला. मात्र लोकांचा जीव वाचवणं ही आपली पहिली प्राथमिकता आहे. आपण अजूनही लॉकडाऊन लागू केलेला नाही. सध्या सर्व बसेस, ट्रेन सुरु आहेत. मात्र, लोकांनी ऐकलं नाही तर जगाने जो लॉकडाऊनचा पर्याय स्वीकारला आहे; तो स्वीकारावा लागेल,” असे शेख म्हणाले.

सध्यातरी नियम समजाऊन सांगत आहोत

राज्यात दिवसा जमावबंदी आणि रात्री संचारबंदी लागू असल्यामुळे नागरिकांमध्ये राज्य सरकारने लागू केलेल्या काही नियमांबाबत संदिग्धता आहे. त्यामुळे अजूनही काही ठिकाणी लोकांची गर्दी दिसत आहे. याच विषयावर बोलताना सध्याचे नियम नवे असल्यामुळे लोकांना समजत नसावेत असे शेख म्हणाले. “कोरोनाला थोपवण्यासाठी आपण नियमावली केली आहे. ती लोकांना कदाचित समजली नसेल. पहिला दिवस होता त्यामुळे लोकांना नियम समजले नसतील. आजचा दुसरा दिवस आहे. पोलीस आणि पालिका प्रशासन लोकांना सध्या राज्य सरकारने लागू केलेले नियम समजाऊन सांगत आहेत. सध्यातरी पोलीस आणि पालिका लोकांना नियम पाळण्याचे फक्त आवाहन करत आहेत,” असे अस्लम शेख म्हणाले.

हा अंतिम प्रयोग, नंतर लॉकडाऊन

राज्य सरकारने कोरोनाला थोपवण्यासाठी अनेक प्रतिबंधात्मक नियम लावले. मात्र, नागरिकांकडून या नियमांचे पालन केले जात नाही. परिमाणी मुंबईत अनेक ठिकाणी कोरोनाचा उद्रेक पाहायला मिळत आहे. याच मुद्द्यावर नाराजी व्यक्त करत अस्लम शेख यांनी मुंबईतील नागरिकांना निर्वाणीचा इशारा दिला आहे. “सध्या लागू असलेले नियम हा अंतिम प्रयोग आहे. त्यानंतरही जर कोरोनाच्या स्थितीत बदल झाला नाही झाला तर जगात ज्या पद्धतीने लॉकडाऊन लावण्यात आला तशाच प्रकारे लॉकडाऊन लावावा लागेल. सध्यातरी फक्त लोकांना समजाऊन सांगायचं आणि लॉकडाऊन न करणे यावर आमचा भर आहे. सध्या आम्ही आरोग्यसेवा जास्तीत जास्त सुधारण्यावर भर देत आहोत,” असाही अस्लम शेख म्हणाले

इतर बातम्या :

Corona Vaccine: महाराष्ट्रात सुपरफास्ट लसीकरण; दिवसाला चार लाख लोकांना लस

सध्याचा काळ चॅलेंजिंग, प्रशासकिय कामात राजकीय हस्तक्षेप होणार नाही; गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांची ग्वाही

अंबानींच्या घराखाली बॉम्बची गाडी ठेवली कुणी हे महत्त्वाचं, विषयाला फाटा नको : राज ठाकरे

(Mumbai guardian minister Aslam Shaikh said if people not following corona rule will implement lockdown)

INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न
ड्रग्जचे कारखाने गुंतवणूक आहे का? राऊतांचा खोचक प्रश्न.
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी
.. म्हणून एकनाथ शिंदेंचा राजीनामा घ्या! सुषमा अंधारेंची मोठी मागणी.
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण
थंडीचा कडाका वाढला; रब्बी हंगामासाठी पोषक वातावरण.
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर
अजितदादांकडून फडणवीसांची भेट; मोठं कारण आलं समोर.
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी
मुंबईतलं 2017चं सूत्र आता नको; शिंदेंच्या नेत्यांची मागणी.
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान
जोपर्यंत देवाभाऊ मुख्यमंत्री, तोपर्यंत...; फडणवीसांचं मोठं विधान.
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप
नाना पटोलेंमुळं काँग्रेस डबघाईला आली! अशोक चव्हाणांचा गंभीर आरोप.