AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत उष्णतेची लाट, वाढत्या उन्हाचा माशे विक्रेत्यांना फटका; शासनाकडे मदतीची मागणी

मुंबईसह (Mumbai) राज्यात उष्णतेची लाट (Heat wave) आली आहे, अचानक आलेल्या या उष्णतेच्या लाटेचा जसा भाजीपाल्याला फटका बसला आहे, तेवढाच फटका हा मासेमारीला (Fishing) देखील बसला आहे.

मुंबईत उष्णतेची लाट, वाढत्या उन्हाचा माशे विक्रेत्यांना फटका; शासनाकडे मदतीची मागणी
प्रातिनिधिक छायाचित्र
| Updated on: Apr 12, 2022 | 1:25 PM
Share

मुंबई : मुंबईसह (Mumbai) राज्यात उष्णतेची लाट (Heat wave) आली आहे, अचानक आलेल्या या उष्णतेच्या लाटेचा जसा भाजीपाल्याला फटका बसला आहे, तेवढाच फटका हा मासेमारीला (Fishing) देखील बसला आहे. बाजारातील आवक घटली आहे. बाजारातील माशांची आवक घटल्याने भाव वाढले आहेत. मात्र दुसरीकडे उष्णतेच्या कडाक्यामुळे ग्राहक मार्केटकडे फिरकत नसल्याने मश्चिमार हवालदिल झाले आहेत. गेल्या महिन्याभरापासून मुंबई परिसरात उष्णतेची लाट आहे. गेल्या सात वर्षातील सर्वाधिक तापमानाची नोंद यावर्षी मार्च महिन्यात झाली आहे. उष्णता वाढल्याने त्याचा परिणाम हा माशांच्या विक्रीवर होत आहे, ग्राहक बाजाराकडे फिरकत नसल्याने आता करायचे काय असा प्रश्न माशेविक्रित्यांना पडला आहे. दरम्यान अशा परिस्थितीमध्ये शासनाने आम्हाला काही मदत करावी अशी मागणी देखील विक्रेत्यांनी केली आहे.

माशांचे दर हजारांच्या घरात

गेल्या दोन आठवड्यात माशांच्या सर्वच जातींचे दर वाढले आहेत. काही माशांचे भाव तर प्रति किलो दीड हजारांपर्यंत पोहोचले आहेत. एवढे दराने कोण मासे खरेदी करणार? तसेच उष्णतेमुळे ग्राहक देखील बाजारपेठेकडे फीरकत नाहीत, त्यामुळे आमचे मोठे नुकसान होत असल्याचे माशे विक्रेत्या महिलांनी म्हटले आहे. ज्याप्रमाणे वादळ, अतिवृष्टी अशा नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास सरकार मच्छिमार आणि शेतकऱ्यांना मदत करते त्याचप्रमाणे आता उष्णतेमुळे आमचे नुकसान होत असून, आम्हाला देखील मदत करावी अशी मागणी आता मच्छिमारांकडून होत आहे.

भाजीपाल्याच्या भावात वाढ

सध्या राज्यात उष्णतेची लाट आहे, उष्णतेच्या लाटेचा फटका हा केवळ मच्छिमारांनाच नाही तर भाजीपाल्याला देखील बसला आहे, उष्णतेमुळे भाजीपाल्याची आवक घटली आहे, भाजीपाल्याची आवक घटल्याने दरामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली आहे. लिंबू, बटाटा आणि इतर फळवर्गीय तसेच पालेभाज्यांचे दर वाढले आहेत. भाजी पाल्याचे दर वाढल्याने सर्व सामान्यांचे किटन बजेट कोलमडले आहे.

संबंधित बातम्या

Mahayuva App : ‘महायुवा ॲप’ ची अनोखी संकल्पना ! मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाची आखणी, तरुणांना मिळणार स्वयंरोजगाराचं प्रशिक्षण, इथे करा नोंदणी

Dilip Walse Patil: तुमची सेक्युरिटी असलेले लोक कुठे आहेत हे केंद्राला विचारणार; दिलीप वळसे पाटील यांचं मोठं विधान

मुंबईकरांना मोठा दिलासा! एक मेपासून आता प्रत्येक घरात पाणी

Follow Us
पंजाबचे माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण...
Sukhbir Singh Badal | पंजाबच्या माजी मुख्यमंत्री सुखबीर सिंह यांच्यावर हल्ल्याचं नेमकं कारण काय? याआधीही... मोठी अपडेट समोर
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय...
अगामी सुनावणी मंगळवारी, पण... कोर्टाबाहेर येताच संजय राऊत नेमकं काय म्हणाले?
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे...
शिवसेनेच्या सुनावणीत मोठा ट्विस्ट! हायकोर्टही पक्षाची नोंदणी रद्दचे आदेश आयोगाला देऊ शकत नाही, मग...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल...
अपात्र होणाऱ्या... एकनाथ शिंदेंच्या अडचणी वाढल्या? कपिल सिब्बल यांनी नेमका युक्तिवाद काय लढवला?
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजून झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या...
मोठी बातमी! निकाल कोणाच्या बाजूने झुकतोय? सिब्बल यांचा नेमक्या मुद्यावर युक्तिवाद, कोर्टाचं निदर्शन काय?
कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
शिवसेना पक्षचिन्ह प्रकरण: कपिल सिब्बल यांचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला आव्हान
पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
आदित्य ठाकरे यांच्याकडून त्र्यंबकेश्वरमधील पेगलवाडी रस्त्याची पाहणी. विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
कोर्टातील निकालाच मोठा परिणाम हा... शिंदेंच्या गट नेत्याचं मोठं विधान
कोर्टातील निकालाच मोठा परिणाम हा... एकीकडे कोर्टात सुनावणी सुरू दुसरीकडे शिंदेंच्या गट नेत्याचं मोठं विधान
विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचं 61% कामकाज ठप्प
विनोद तावडे: विरोधकांच्या गोंधळामुळे संसदेचं 61% कामकाज ठप्प
कंगना राणावत यांची टीका: गृह मंत्रालयाबाबत दुहेरी भूमिका
राहुल गांधींच्या भूमिकेवर कंगना राणावत यांची टीका: गृह मंत्रालयाबाबत दुहेरी भूमिका