AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत नोकरीसाठी फक्त गुजराती-मारवाडी उमेदवारांना प्राधान्य! वादग्रस्त जाहिरात व्हायरल

सध्या सोशल मीडियावर नोकरीची एक जाहिरात व्हायरल होत आहे. या जाहिरातीमध्ये केवळ मारवाडी आणि गुजराती लोकांना प्राधान्य देण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.

मुंबईत नोकरीसाठी फक्त गुजराती-मारवाडी उमेदवारांना प्राधान्य! वादग्रस्त जाहिरात व्हायरल
| Updated on: Jun 10, 2026 | 12:11 PM
Share

मुंबई ही स्वप्नांची नगरी म्हणून ओळखली जाते. मुंबईत अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध असतात. मुंबईतील नोकऱ्यांमध्ये स्थानिक मराठी उमेदवारांना पहिले स्थान मिळावे असा आग्रह स्थानिकांचा असतो. मात्र, सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका जाहिरातीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. या जाहिरातीमध्ये मुंबईतील नोकऱ्यांमध्ये स्थानिक मराठी उमेदवारांना डावलून केवळ गुजराती आणि मारवाडी समाजातील लोकांना प्राधान्य देण्याची स्पष्ट सूचना देण्यात आली आहे. या जाहिरातीमुळे मोठा वाद निर्माण झाला असून, मराठी तरुणांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

नेमकं प्रकरण काय?

अहमदाबाद येथील एका भरती एजन्सीने नोकरी डॉट कॉम (Naukri.com) आणि लिंक्डइन या प्लॅटफॉर्मवर ही जाहिरात प्रसिद्ध केली आहे. जाहिरातीत मुंबईतील एका पदासाठी “Only Gujarati and Marwari candidates preferred” असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. यामुळे स्थानिक मराठी उमेदवारांना जाणीवपूर्वक दुय्यम स्थान दिल्याचा आरोप करण्यात येत आहे.

मराठी एकीकरण समितीचा संताप

मराठी एकीकरण समितीचे गोवर्धन देशमुख यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. नोकरी डॉट कॉम आणि लिंक्डइन या नोकरी शोधक संकेत स्थळावरती एक जाहिरात पाहिली. खरंतर ही जाहिरात आहे एजीएम आणि अकाऊंट, फायनान्सशी संबंधीत. त्यांना एक सीए हवा आहे. एक अहमदाबाद एजंसी आहे तिने ही जाहिरात टाकली आहे. 5 जून रोजी ही जाहिरात टाकण्यात आली आहे. नोकरी आहे मुंबईमध्ये आणि वेतन बघा तुम्ही 20 ते 25 लाख रुपये आहे. त्यांना हे मराठी माणसाला नाही द्यायचे. जाहिरातीवर काय लिहिले आहे “Only Gujarati and Marwari.” मराठी माणसाने कुठे जायचं? यावर शासन कडक भूमिका घेणार आहे की नाही? दरवेळी आम्ही कायदा हातात घेतला पाहिजे का? असा सवाल देशमुख यांनी केला आहे.

परप्रांतीयांना सतत संधीचा आरोप

मुंबई हे महाराष्ट्राची राजधानी असतानाही येथील बहुसंख्य नोकऱ्यांमध्ये बाहेरच्या राज्यातील लोकांना प्राधान्य दिले जाते, असा सातत्याने आरोप होत असतो. या पार्श्वभूमीवर ही जाहिरात समोर आल्याने मराठी तरुणांमध्ये असंतोष वाढला आहे.

Follow Us
शेतकऱ्यांसाठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट
शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळसदृश स्थितीचा सरकार घेणार ग्राऊंड रिपोर्ट; पालकमंत्री जिल्ह्याजिल्ह्यात दौरा करणार
पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं
BRICS Summit 2026 | पहाटे 4 वाजेपर्यंत खलबतं अन् अखेर BRICSमध्ये सहमती! सर्व सदस्य देशांचं संयुक्त निवेदन मंजूर
माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Amruta Fadnavis on Manoj Jarange | माझा भाऊ शांततेनेच काम करेल अशी अपेक्षा! मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनावर अमृता फडणवीसांचं मोठं वक्तव्य, पुढे म्हणाल्या...
हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर
Shweta Mahale on Sanjay Gaikwad | हुकूमशाही आणि दडपशाहीने बुलढाणा चालणार नाही! संजय गायकवाडांच्या टीकेवर श्वेता महालेंचा जोरदार पलटवार
ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही!
Navnath Ban | ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे मराठा आरक्षण टिकले नाही! जरांगे आंदोलनावरून महायुतीचा ठाकरे गटावर घणाघात
पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-कापूस पिकं उद्ध्वस्त
Washim | वाशिममध्ये पावसाने शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं! सोयाबीन-तूर-कापूस पिकं उद्ध्वस्त, महिला शेतकरी व्यथा मांडताना ढसाढसा रडली
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व...
ब्रिक्स परिषदेत मोदींचे मोठे विधान; जागतिक निर्णय प्रक्रियेत सर्व देशांना सहभाग घेण्याचं आवाहन
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद...
पुण्यात गणेशोत्सवातील ध्वनी प्रदूषणावरून कायदेशीर दणका; विद्यानंद बापट यांची मोठी मोहीम
मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! अखेर तारीख ठरली
Maratha Reservation | मुंबई दौऱ्यासाठी मनोज जरांगे पाटील सज्ज! 15 सप्टेंबर तारीख जाहीर; आझाद मैदानावर आमरण उपोषण करणार
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारला मोठी
विनायक राऊतांची मनोज जरांगे पाटलांच्या प्रकृतीबाबत चिंता, सरकारकडे मोठी मागणी