AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईची लाईफलाईन बदलणार, 12 रेल्वे प्रकल्पांची घोषणा, जाणून घ्या कोणकोणते आहेत प्रकल्प

mumbai railway projects: मुंबई लोकलची गर्दी कमी होऊन गाड्यांची संख्या वाढणार आहे. मुंबईकरांचा वेळ वाचणार आहे. मुंबईसाठी सुरु असणाऱ्या 12 रेल्वे प्रकल्पांची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक्सवरुन दिली आहे.

मुंबईची लाईफलाईन बदलणार, 12 रेल्वे प्रकल्पांची घोषणा, जाणून घ्या कोणकोणते आहेत प्रकल्प
mumbai local
Jitendra Zavar
Jitendra Zavar | Updated on: Sep 01, 2024 | 10:14 AM
Share

मुंबईकरांसाठी मोठी बातमी रेल्वे मंत्रालयाने दिली आहे. यामुळे मुंबईकरांची लाईफलाईन समजली जाणाऱ्या लोकल सेवेत मोठ्या प्रमाणावर सुधारणा होणार आहे. मुंबईकरांचा प्रवास सुखद होणार आहे. मुंबई लोकलची गर्दी कमी होऊन गाड्यांची संख्या वाढणार आहे. मुंबईकरांचा वेळ वाचणार आहे. मुंबईसाठी सुरु असणाऱ्या 12 रेल्वे प्रकल्पांची माहिती केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी एक्सवरुन दिली आहे. एकूण 16 हजार 240 कोटी रुपयांचे हे प्रकल्प आहेत. मुंबईला दिलेल्या या प्रकल्पांबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांचे आभार मानले आहे.

कोणते आहेत 12 प्रकल्प

  1. सीएसटीएम ते कुर्ला पाचवी आणि सहावी रेल्वे लाईन करण्यात येणार आहे.
  2. मुंबई सेंट्रल ते बोरीवली सहावी रेल्व लाईन होणार आहे. ३० किलोमीटरचा हा प्रकल्प आहे.
  3. हर्बल लाईन गोरेगाव ते बोरीवलीपर्यंत वाढवण्यात येणार आहे. या प्रकल्पासाठी जमीन अधिग्रहण केले जात आहे.
  4. बोरवली ते विरार पाचवी आणि सहावी लाईन करण्यात येणार आहे.
  5. विरार ते डाहून रोड तिसरी आणि चौथी लाईन करण्यात येणार आहे. ६४ किलोमीटरचा हा प्रकल्प आहे.
  6. पनवेलपासून कर्जतरपर्यंत उपनगरीय रेल्वे कॉरिडॉर करण्यात येणार आहे. यामुळे मुंबई लोकल रायगड जिल्ह्यास जोडली जाणार आहे.
  7. ऐरोली-कळवा एलिव्हेटेड लिंकचा प्रकल्प आहे. ३.३ किमी लांबीचा प्रकल्प आहे. वाशी-बेलापूर आणि कल्याण दरम्यान अखंड रेल्वे कनेक्शन यामुळे होणार आहे.
  8. कल्याण आणि आसनगाव रेल्वे स्थानकांदरम्यानचा चौथा रेल्वे मार्ग होणार आहे. ३२ किलोमीटरचा हा प्रकल्प आहे.
  9. कल्याण-बदलापूर दरम्यान तिसरा आणि चौथा रेल्वे मार्ग होणार आहे. १४ किलोमीटरचा हा प्रकल्प आहे.
  10. कल्याण-कसारा तिसरी रेल्वे लाईन होणार आहे. यामुळे कल्याण-कसारा उपनगरी आणि मेल एक्सप्रेस मार्गावरील गर्दी कमी होईल.
  11. वसई येथे इंजिन बदलावे लागते. त्यामुळे नायगाव-जुई डबल कॉर्ड लाईन बांधण्यात येत आहे. त्याचा फायदा कोकण रेल्वे, दक्षिण रेल्वे होणार आहे.
  12. निळजे ते कोपर दरम्यानच्या 5 किमीची कॉर्ड लाइन होणार आहे. वसई ते पनवेल दरम्यानचा रेल्वे प्रवास सुमारे 15 ते 20 मिनिटांनी कमी होईल.

Follow Us
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या भागात पवासाची हजेरी!
प्रतीक्षा संपली! मुंबईत पावसाच्या सरी, या  भागात पवासाची हजेरी!
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले
पुण्यातील रेव्ह पार्टीच्या अंधारात खूप काही घडलं, 150 पैकी 72 जण गेले तरी कुठे? वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप!
विरोधीपक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड
विरोधी पक्ष मोठ्या तयारीत? ममता बॅनर्जींची सोनिया गांधींसोबत बंद दाराआड चर्चा; 45 मिनीटे... काय घडलं?
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला..
यूट्यूब टिचर खान सरांच्या अटकेविषयी सर्वात मोठी अपडेट, कोर्टाने दिला महत्त्वाचा आदेश, आता...
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना पवरांनी दिली मोठी..
राष्ट्रवादीत मोठं घडतंय? राजीनाम्याऐवजी नायकवडींना दिली मोठी जबाबदारी, स्वतःच म्हणाले...
पुणेकरांनो सावधान! पाणी वाचवा, नाहीतर नळ कोरडे पडतील
Pune Water Cut | पुणेकरांनो सावधान! पाणी वाचवा, नाहीतर नळ कोरडे पडतील; महापालिकेची मोठी घोषणा काय?
4 सिलेंडरनंतर महिलांनी काय करायचं? उरलेले 8 महिने धूरच घ्यायचा का?
Sachin Sawant | 4 सिलेंडरनंतर महिलांनी काय करायचं? उरलेले 8 महिने धूरच घ्यायचा का?; उज्ज्वला योजनेवरून काँग्रेसचा संताप
लक्ष्मण हाकेंच्या व्हिडीओने खळबळ, बड्या नेत्याबद्दल सांगताना...थेट केल
Video | लक्ष्मण हाकेंच्या व्हिडीओने खळबळ, बड्या नेत्याबद्दल सांगताना...थेट केलेल्या विधानाची राज्यात मोठी चर्चा!
धरण भरलं, आश्वासनं भरली; पण गावकऱ्यांच्या घागरी मात्र रिकाम्याच!
Dahanu | धरण भरलं, आश्वासनं भरली; पण गावकऱ्यांच्या घागरी मात्र रिकाम्याच! साखरे गावाचा पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष
Video | बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावर शिंदेची प्रतिक्रिया, हावभावानेच
Video | बच्चू कडूंच्या त्या वक्तव्यावर शिंदेची प्रतिक्रिया, हावभावानेच वेधलं लक्ष