AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Corona : मुंबई लोकल प्रवासावर निर्बंध, केवळ अत्यावश्यक प्रवास करता येणार

आज सकाळी 6 वाजेपासून ते 31 मार्चपर्यंत मुंबईची रक्तवाहिनी समजली जाणारी मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात आली आहे

Corona : मुंबई लोकल प्रवासावर निर्बंध, केवळ अत्यावश्यक प्रवास करता येणार
| Updated on: Mar 22, 2020 | 9:50 AM
Share

मुंबई : सध्या संपूर्ण जगभरात कोरोना विषाणूने (Mumbai Local Train Services Closed) थैमान घातला आहे. भारतातही हा विषाणूने आपले पाय पसरवण्याच्या प्रयत्नात आहे. मात्र, केंद्र आणि राज्य सरकार या विषाणूशी लढा देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. या विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी आता एक मोठा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबईची लाईफलाईन असलेली लोकल सेवा आजपासून सर्वसामान्य नागरिकांसाठी बंद करण्यात आली आहे. आज सकाळी 6 वाजेपासून ते 31 मार्चपर्यंत मुंबईची रक्तवाहिनी समजली जाणारी मुंबई (Mumbai Local Train Services Closed) लोकल सर्वसामान्यांसाठी बंद करण्यात आली आहे.

अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी आणि वैद्यकीय इमर्जन्सी असल्याशिवाय लोकल प्रवास करण्यास बंदी घालण्यात आली आहे. कोकण विभागीय आयुक्त शिवाजी दौंड यांनी हे निर्देश जारी केले आहेत.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गर्दी कमी करणे हे सर्वात मोठं शस्त्र आहे. त्या पार्श्वभूमीवर आता लोकल प्रवाशांवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सर्व लोकल स्थानकांवर विशेष पथक तैनात करण्यात आले आहेत. ही पथकं आयकार्ड पाहून लोकल (Mumbai Local Train Services Closed) स्थानकांवर प्रवेशासाठी देणार परवानगी दोणार, अन्यथा प्रवास करण्यास बंदी असेल. प्रत्येक रेल्वे स्थानकाच्या पूर्व आणि पश्चिम मुख्य प्रवेश द्वारावर या पथकांची नियुक्ती करण्यात येईल, असंही आयुक्त शिवाजी दौंड यांनी सांगितलं.

पथकामध्ये कोण असणार?

रेल्वे पोलीस -1 राज्य पोलीस – 1 महसूल विभागाचा – 1 प्रतिनिधी वैद्यकीय कर्मचारी – 1

आज जनता कर्फ्यू

कोरोना विषाणूचा वाढता प्रसार पाहता देशात आज सकाळी सात वाजेपासून रात्री नऊ वाजेपर्यंत जनता कर्फ्यू पाळण्यात येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी (PM narendra modi) देशातील नागरिकांना एक दिवस जनता कर्फ्यू पाळण्याचं आवाहन केलं आहे. जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर आज दिवसभर अन्नधान्य, दूध, औषधे यांसारख्या अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकानं आणि कार्यालयांना (Mumbai Local Train Services Closed) टाळं असणार आहे.

संबंधित बातम्या :

कोरोनामुळे जगात पहिल्यांदाच घडत आहेत ‘या’ दहा गोष्टी

जगभरात कोरोनाचं थैमान, चीन, इटलीनंतर स्पेन आणि इराणमध्येही हाहाकार, कोणत्या देशात किती मृत्यू?

Janta Curfew : जनता कर्फ्यू; कोरोना विरुद्ध आज सर्वात मोठी लढाई

औरंगाबादची कोरोनावर मात, बाधित महिला सात दिवसानंतर ठणठणीत

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.