AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Metro 3 : अन्यथा आम्ही आत कबुतर सोडू, आम्ही गिरगावकर संस्थेचा इशारा, मागणी काय?

पंतप्रधान मोदींच्या हस्ते मुंबई मेट्रो एक्वा लाईन ३ च्या अंतिम टप्प्याचे आज लोकार्पण झाले. यामुळे आरे ते कफ परेड प्रवास ५६ मिनिटांत होणार असून, वाहतूक कोंडीवर उपाय मिळेल. मात्र, आम्ही गिरगावकर संस्थेने एक मागणी केली आहे.

Mumbai Metro 3 : अन्यथा आम्ही आत कबुतर सोडू, आम्ही गिरगावकर संस्थेचा इशारा, मागणी काय?
| Updated on: Oct 08, 2025 | 11:21 AM
Share

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज मुंबईतील बहुप्रतिक्षित मेट्रो एक्वा लाईन ३ च्या अंतिम टप्प्याचे लोकार्पण करण्यात येणार आहे. यामुळे आता मुंबईकरांना आरे ते कफ परेड हा प्रवास करता येणार आहे. आज पंतप्रधान मोदींच्या हस्ते भूमिगत मेट्रो मार्गाचा आचार्य अत्रे चौक ते कफ परेड हा अंतिम टप्पा मुंबईकरांसाठी खुला करण्यात येणार आहे. गोरेगाव आरे ते कफ परेड असा संपूर्ण ३३.५ किलोमीटरचा प्रवास केवळ ५६ मिनिटात करता येणं शक्य होणार आहे. मुंबईतील वाहतूक कोंडीवर प्रभावी उपाय म्हणून या मेट्रोकडे पाहिले जात आहे. त्यातच आता आम्ही गिरगावकर या स्थानिक संस्थेने मेट्रो प्रशासनाला एक महत्त्वाचा इशारा दिला आहे.

आम्ही गिरगावकर या स्थानिक संस्थेने गिरगाव मेट्रो स्टेशन संदर्भात एक आक्षेप नोंदवला आहे. आजपासून सुरु होणाऱ्या मेट्रोमध्ये अधिकारी स्टाफ आणि कर्मचारी स्टाफ 80 टक्के मराठी असावा. तसेच मराठी भाषा असावी. अन्यथा मेट्रो स्थानकात कबुतर सोडू, असा इशारा आम्ही गिरगावकर या संस्थेने दिला आहे.

नेमकी मागणी काय?

आज गिरगाव मेट्रो स्टेशन याचा शुभारंभ होत आहे. तसेच हे मेट्रो स्टेशन झाल्याने गिरगावकरांचा प्रवास सुखाचा व सोयीस्कर होणार आहे. त्यासाठी गिरगावकर जनता संबंधित कंत्राटदार आणि ज्यांनी त्यासाठी मेहनत घेतली त्यांचे आभारी आहे. आम्ही गिरगावकर टीम तर्फे शुभेच्छा तर आहेतच. पण त्यासोबतच प्रशासनाला एक प्रेमाचा सल्ला देत आहोत. या मेट्रो स्टेशनवर कार्यरत असलेल्या ८० टक्के अधिकारी तसेच इतर स्टाफमध्ये मराठी लोक असावेत. तसेच उर्वरित २० टक्के कर्मचाऱ्यांनाही मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, अन्यथा त्याच मेट्रो मध्ये कबुतर सोडू, असा गंभीर इशारा आम्ही गिरगांवकर या संस्थेने दिला आहे.

स्थानिकांना रोजगार मिळण्यास प्राधान्य

आम्ही गिरगावकर या संस्थेने मराठी भाषेच्या वापरास आणि स्थानिकांना रोजगार मिळण्यास प्राधान्य देण्याच्या दृष्टीने ही मागणी केली आहे. मुंबई शहराच्या विकासात महत्त्वाकांक्षी प्रकल्प जोडला जात असताना स्थानिक संस्कृती, भाषा आणि रोजगाराचे प्रश्न दुर्लक्षित होऊ नयेत, यामुळे ही मागणी करण्यात आली आहे.

Follow Us
राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला
Dharmendra Pradhan | राजीनाम्याच्या मागणीदरम्यान धर्मेंद्र प्रधान थेट ओम बिर्लांच्या भेटीला; भेटीकडे सर्वांचं लक्ष
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर...
मनोज जरांगेंनी अभिजीत दीपकेला दिला कानमंत्र! वेळ आली तर... त्या विधानाची सर्वत्र चर्चा
आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू
Aasam Flood | आसाममध्ये महापुराचा हाहाकार! 24 तासांत 21 जणांचा मृत्यू, लाखो नागरिक संकटात
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने
PM मोदी आणि शरद पवरांच्या भेटीची इनसाइड स्टोरी! NCP तील बड्या नेत्याने दिली थेट अपडेट
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक..
मुदत संपली की थेट... डोनाल्ड ट्रम्प यांचा निर्णय महागात पडणार, अचानक काय घडलं?
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू...
दुपारी 12 वाजता मोठं घडणार? केंद्रात.... लोकसभा अध्यक्ष आणि मंत्री किरेन रिजिजू यांच्या बैठीत नेमकं काय ठरलं?
शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
मोठी बातमी! शरद पवारांची पंतप्रधान मोदी यांच्या सोबत बंद दाराआड बैठक; चर्चा काय?
लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल
Manoj Jarange Patil | लेकरांपेक्षा पक्षावर प्रेम? दिल्लीला रवाना होताच मनोज जरांगेंचा सत्ताधाऱ्यांवर कडाडून हल्लाबोल
लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
Uddhav Thackeray | लोक म्हणतायत इंग्रज बरे होते! ही लोकशाही नाही, हुकूमशाही... सरकारवर उद्धव ठाकरेंचा घणाघात
कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची...
Kalyan | कल्याण-सीएसएमटी एसी लोकलमध्ये बिघाड; दरवाजे बंद पडल्याने प्रवाशांची एकाच गेटवर झुंबड
उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?.

उद्धव ठाकरे करणार राहुल गांधींना फोन? जंतरमंतरवरील आंदोलनावर चर्चा?

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा...

तर महाराष्ट्रात फिरू देणार नाही… मनोज जरांगे पाटील यांचा मोठा इशारा..

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा.

Manoj jaragne patil : जंतर मंतर सोडू नका, वेळ पडली तर मराठा बांधव दिल्लीत येणार, मनोज जरांगेंची घोषणा

भारताच्या दिशेने येणारे जहाज अचानक माघारी फिरले, समुद्रात मोठी खळबळ, चीनचेही...

भारताच्या दिशेने येणारे जहाज अचानक माघारी फिरले, समुद्रात मोठी खळबळ, चीनचेही..

मी काय सहन केलं, काय गमावलं..; आणखी एका मराठी अभिनेत्रीला कॅन्सर, पोस्ट लिहित खुलासा.

मी काय सहन केलं, काय गमावलं..; आणखी एका मराठी अभिनेत्रीला कॅन्सर, पोस्ट लिहित खुलासा

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस.

मोठी बातमी! ठाकरेंच्या 6 बंडखोर खासदारांना झटका, थेट सुप्रीम कोर्टाची नोटीस