AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मेट्रोतून प्रवास करताना तिकीट काढण्यापासून सुटका, आता आली नवीन पद्धत

Mumbai Metro: मुंबईतील मेट्रो स्थानकावर मिळणाऱ्या या बँडसाठी बॅटरीची गरज नाही. तो जलरोधक आणि टिकाऊ आहे. त्यामुळे कोणत्याही ऋतूमध्ये म्हणजे उन्हाळा, हिवाळा, पावसाळ्यात तो वापरता येणार आहे. हा पट्टा धुता येणार आहे. तसेच तो स्वच्छही करता येणार आहे.

मेट्रोतून प्रवास करताना तिकीट काढण्यापासून सुटका, आता आली नवीन पद्धत
Metro
| Updated on: Apr 11, 2024 | 9:33 AM
Share

राज्यात मुंबई, नागपूर अन् पुणे शहरात मेट्रो सुरु झाली आहे. मेट्रोमुळे नागरिकांना एक चांगला वाहतुकीचा पर्याय मिळाला आहे. या शहरांमध्ये मेट्रो सेवा लोकप्रिय झाली आहे. मेट्रोकडून लोकांना अधिक चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. आता मुंबईतील मेट्रोने नवीन तिकीट प्रणाली आणली आहे. कागदी तिकीट किंवा ई-तिकीटाला हा पर्याय निर्माण केला आहे. आता फक्त मनगटी पट्टा (रिस्ट बॅन्ड) स्कॅन करून मेट्रो १ मधून प्रवास करता येणार आहे.

काय नवीन पर्याय

मुंबईतील घाटकोपर, अंधेरी वर्सोवा मेट्रो १ मार्गिकेवरून प्रवास करण्यासाठी नवीन पर्याय आला आहे. या मेट्रोत प्रवास करताना आता कागदी तिकीट किंवा ई तिकीट घेण्याची गरज पडणार नाही. तसेच मोबाइलवरून क्यूआर कोड स्कॅनची सुद्धा गरज नाही. त्याऐवजी मनगटी पट्टा (रिस्ट बॅन्ड) हा पर्याय आणला आहे. हा पट्टा स्कॅन करून मेट्रोमधून प्रवास करता येणार आहे. मुंबई मेट्रो वन प्रायव्हेट लिमिटेडने (एमएमओपीएल) ही सुविधा दिली आहे.

बँड २०० रुपयांना मिळणार

मेट्रोचे कागदी तिकीट खूपच लहान आहे. यामुळे ते हरवून जाते. त्याला पर्याय म्हणून अनेक जण मोबाईल ई तिकीट काढतात. परंतु त्यापेक्षा आणखी एक चांगला पर्याय आणला गेला आहे. ई तिकीट, व्हॉट्सअप तिकिट, पासेस यांना निर्माण केलेला हा चौथा पर्याय आहे. या पर्यायामुळे प्रवाशांना रांगेत उभे राहण्याची झंझट होणार नाही. तसेच रांगेत उभे न राहावे लागत असल्याने वेळ वाचणार आहे. मनगटावरील बँड २०० रुपयांना उपलब्ध करुन दिला आहे.

सर्व स्थानकावर बँडची विक्री

मेट्रो १ च्या सर्व स्थानकावर हा बँड विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे. मनगटावरील बँड हा घड्याळाप्रमाणे आहे. मेट्रोमध्ये प्रवास करताना हा बँड स्कॅन करून आता प्रवास करता येणार आहे. या बँडची किंमत २०० रुपये आहे. तसेच त्यात टॉकअप करण्याची सुविधा असणार आहे. सोयीनुसार हा बँड रिचार्ज करून त्याचा वापर करता येणार आहे.

बॅटरीची गरज नाही, जलरोधक आणि टिकाऊ

मुंबईतील मेट्रो स्थानकावर मिळणाऱ्या या बँडसाठी बॅटरीची गरज नाही. तो जलरोधक आणि टिकाऊ आहे. त्यामुळे कोणत्याही ऋतूमध्ये म्हणजे उन्हाळा, हिवाळा, पावसाळ्यात तो वापरता येणार आहे. हा पट्टा धुता येणार आहे. तसेच तो स्वच्छही करता येणार आहे. यामुळे त्वचेला कोणती इजा होणार नाही. हा बँड एमएमओपीएलने बिलबॉक्स प्युररिस्ट टेक सोल्युशन्स या कंपनीने तयार केला आहे. त्यामध्ये सिलिकॉनचा वापर करून केला आहे. प्रवाशांच्या पसंतीला हा पर्याय उतरणार आहे, असा विश्वास एमएमओपीएलकडून व्यक्त केला जात आहे.

Follow Us
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठा दिलासा; 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा
अर्थसंकल्पात शेतकऱ्यांना मोठा दिलासा; 2 लाखांपर्यंत कर्जमाफीची घोषणा.
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका
कर्ज काढून फटाके वाजवणारा अर्थसंकल्प; ठाकरेंची सरकारवर जोरदार टीका.
कर्जमाफीची फडणवीसांकडून घोषणा, कृषीमंत्र्यांनी मानले सरकारचे आभार
कर्जमाफीची फडणवीसांकडून घोषणा, कृषीमंत्र्यांनी मानले सरकारचे आभार.
अर्थसंकल्पात खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा; 12 खेळांसाठी....
अर्थसंकल्पात खेळाडूंना जागतिक दर्जाच्या सुविधा; 12 खेळांसाठी.....
अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनाबाबत मोठी घोषणा, फडणवीस नेमकं काय म्हणाले
अर्थसंकल्पात लाडकी बहीण योजनाबाबत मोठी घोषणा, फडणवीस नेमकं काय म्हणाले.
नियमित कर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना काय मिळणार?
नियमित कर्जाची फेड करणाऱ्या शेतकऱ्यांना काय मिळणार?.
वडाळा ते गेट-वे ऑफ इंडिया भूमिगत मेट्रो होणार! मुख्यमंत्र्यांची घोषणा
वडाळा ते गेट-वे ऑफ इंडिया भूमिगत मेट्रो होणार! मुख्यमंत्र्यांची घोषणा.
प्रतीक्षा संपली! अखेर शेतकरी कर्जमाफीची घोषणा; काय म्हणाले फडणवीस?
प्रतीक्षा संपली! अखेर शेतकरी कर्जमाफीची घोषणा; काय म्हणाले फडणवीस?.
राज्याच्या बजेटमध्ये 10 महत्वाच्या घोषणा कोणत्या? पाहा व्हिडीओ
राज्याच्या बजेटमध्ये 10 महत्वाच्या घोषणा कोणत्या? पाहा व्हिडीओ.
जब इरादा बना लिया है...; बजेट मांडत असताना फडणवीसांकडून शेरो शायरी
जब इरादा बना लिया है...; बजेट मांडत असताना फडणवीसांकडून शेरो शायरी.