AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mumbai Children Drown : मालाडमधील मार्वे बीचवर 5 मुले बुडाली; दोघांना वाचवण्यात यश, तीन बेपत्ता

रविवारी सुट्टीचा दिवस असल्याने पाच मुलं मालाडमधील मार्वे बीचवर समुद्रात पोहायला गेली होती. मात्र सुट्टीचा आनंद लुटण्याऐवजी शोककळा पसरली.

Mumbai Children Drown : मालाडमधील मार्वे बीचवर 5 मुले बुडाली; दोघांना वाचवण्यात यश, तीन बेपत्ता
मार्वे समुद्रकिनाऱ्यावर पाच मुलं बुडालीImage Credit source: TV9
| Edited By: | Updated on: Jul 16, 2023 | 4:14 PM
Share

मुंबई : सुट्टी असल्याने मालाडमधील मार्वे समुद्र किनाऱ्यावर अंघोळीसाठी गेलेली पाचही मुलं समुद्रात बुडाली. मुलांना बुडताना पाहून उपस्थित लोकांनी धाव घेत दोघांना वाचवले. मात्र तीन जण बुडाले. बुडालेल्या मुलांचा शोध सुरु आहे. ही सर्व मुलं 12 ते 16 वयोगटातील आहेत. तिघांचा युद्धपातळीवर शोध सुरु आहे. सध्या अग्निशमन दल आणि बीएमसीचे पथक बेपत्ता मुलांचा शोध घेत आहे. सध्या पावसाळ्यामुळे समुद्राच्या पातळीत वाढ झाली आहे. यामुळे पाण्याचा अंदाज न आल्याने मुलं बुडू लागली. मुलांचा पत्ता लागत नसल्याने मार्वे बीचवर बेपत्ता मुलांसाठी हेलिकॉप्टरने शोधमोहीम सुरूच आहे.

युद्धपातळीवर बेपत्ता मुलांचा शोध सुरु

मिळालेल्या माहितीनुसार, मार्वे समुद्राच्या किनाऱ्यापासून सुमारे अर्धा किलोमीटर अंतरावर ही दुर्घटना घडली. बीचवर सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना नाहीत. फायर अँड रेस्क्यू टीम (FRT) शोध मोहिमेचे नेतृत्व करत आहे. बोटी, लाइफ जॅकेट आणि इतर आवश्यक उपकरणांचा वापर करून बेपत्ता मुलांचा शोध सुरु आहे. शोध आणि बचाव कार्यात मदत म्हणून अनेक एजन्सी सहभागी झाल्या आहेत. या एजन्सींमध्ये BMC चे MFB, पोलीस, तटरक्षक दल, नौदल गोताखोर, 108 रुग्णवाहिका आणि वॉर्ड कर्मचारी यांचा समावेश आहे.

जळगावमध्येही खदानीत दोन मुलं बुडाली

मुक्ताईनगर तालुक्यातही खामखेडा खदानीत 10 ते 12 वर्षाची दोन मुलं बुडाली. मात्र गावातील तरुणांना वेळीच ही बाब लक्षात आल्याने त्यांनी तात्काळ खदानीत उडी घेत मुलांना बाहेर काढले. यानंतर मुलांना तात्काळ मुक्ताईनगर शहरातील डॉ. जगदीश पाटील यांच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या अथक प्रयत्नांनंतर मुलांचे प्राण वाचवण्यास यश आले आहे.

Follow Us
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण
नाशिक आयटी कंपनीतील निदा खानचं काय होणार? जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण.
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्...
थरकाप उडवणारी घटना! इतका भयंकर अपघात की तिघांचा जागीच मृत्यू अन्....
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू
मुंबईत धक्कादायक घटना; विषबाधेमुळे एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू.
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र
रायगडच्या नगरपंचायतीत मोठा ट्विस्ट, अपात्र 7 नगरसेवक पुन्हा पात्र.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार
परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांविरोधात त्या जमिनवादावरुन पोलिसात तक्रार.
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?
पारा थेट 46 अंशावर, कडाक्याच्या उन्हामुळे आरोग्यावर काय परिणाम होतोय?.
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना...
...तरच विधानपरिषद निवडणूक बिनविरोध होईल, महाविकास आघाडीत घडामोडींना....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा.....
मराठी सक्तीचा निर्णय लांबणीवर; प्रताप सरनाईकांनी केली मोठी घोषणा......
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?
राघव चड्ढांचा 'आप'ला दे धक्का, पण भाजपामध्ये जाण्याआधी वाद काय झाला?.
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री..
मोठी बातमी ! मराठी सक्तीच्या मुदतवाढीवर सस्पेन्स कायम; परिवहन मंत्री...