AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शेवटच्या क्षणी तिकीट, केवळ 13 दिवस प्रचार, 48 मतांनी शिंदे सेनेचा उमेदवार विजयी

Mumbai North West Lok Sabha seat Result: मुंबई उत्तर पश्चिम मतदार संघातून त्यांची उमेदवारी ऐनवेळी घोषित करण्यात आली. मुंबई उत्तर पश्चिम सारख्या मतदार संघात त्यांना प्रचारासाठी केवळ 13 दिवस मिळाले. मतमोजणी सुरु असताना चित्र वारंवार बदलत होते.

शेवटच्या क्षणी तिकीट, केवळ 13 दिवस प्रचार, 48 मतांनी शिंदे सेनेचा उमेदवार विजयी
ravindra waikar eknath shinde udhav thackeray
| Updated on: Jun 05, 2024 | 7:51 AM
Share

लोकसभा निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट झाले आहे. भारतीय जनता पक्षाला बहुमत मिळाले नाही. परंतु भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार सत्तेवर येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार आहेत. या निवडणुकीत महाराष्ट्रातून सर्वात जास्त धक्का भारतीय जनता पक्षाला बसला आहे. भाजप केवळ 9 जागाच मिळवू शकला आहे. मुंबई, विदर्भ, मराठवाड्यात भाजपचा जवळपास पराभव झाला. या सर्वांमध्ये मुंबई उत्तर पश्चिममधील निवडणुकीची चर्चा रंगली आहे. या ठिकाणी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर केवळ 48 मतांनी विजयी झाले आहे. महाराष्ट्रात 48 मतदार संघात हा सर्वात कमी फरकाचा विजय आहे.

अशी राहिली लढत

निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, वायकर यांना मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा लोकसभा मतदार संघातून 4,52,644 लाख मते मिळाली. तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे उमेदवार अमोल कीर्तिकर यांना 4,52,596 मते मिळाली. म्हणेज दोघांमधील मतांचे अंतर केवळ 48 राहिले आहे.

केवळ 13 दिवस प्रचार

मुंबई जोगेश्वरी ईस्टमधील आमदार रवींद्र वायकर यावर्षाच्या सुरुवातीला उद्धव ठाकरे यांची साथ सोडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आले. मुंबई उत्तर पश्चिम मतदार संघातून त्यांची उमेदवारी ऐनवेळी घोषित करण्यात आली. मुंबई उत्तर पश्चिम सारख्या मतदार संघात त्यांना प्रचारासाठी केवळ 13 दिवस मिळाले. मतमोजणी सुरु असताना चित्र वारंवार बदलत होते. कधी अमोल कीर्तिकर पुढे तर कधी रवींद्र वायकर पुढे असे चुरस सुरु होती. एक प्रसंग आला की, जेव्हा कीर्तिकर फक्त एका मताने पुढे होते. परंतु शेवटी अमोल कीर्तिकर यांचा 48 मतांनी पराभव झाला. आता उद्धव ठाकरे यांनी या निकालात गोंधळ झाल्याचा आरोप केला आहे. या निकालाविरोधात न्यायालयात दाद मागण्याचा विचार ते करत आहेत.

प्रत्येक मताला महत्व

लोकशाहीमध्ये प्रत्येक मताला महत्त्व आहे. माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे सरकार एका मताने पडले होते. मग 48 तर भरपूर आहेत. मी देवाला सांगितले होतं की, माझ्याकडून चांगले काम होईल तरच मला जिंकून आणा. आता मला देशासाठी, महाराष्ट्रासाठी अन् मुंबईसाठी काम करायचे आहे, अशी प्रतिक्रिया रवीद्र वायकर यांनी विजयानंतर दिली.

Follow Us
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका
पुण्यात गॅस सिलेंडर तुटवड्यामुळे लग्नसराई हॉल व्यवसायिकांना फटका.
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती
गॅस सिलेंडरसाठी रांगा फक्त घबराटीमुळे – मंत्री शिरसाट यांची माहिती.
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी
शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण कुणाचा? उद्या कोर्टात सुनावणी.
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची...
इराण-इस्त्रायल-अमेरिका संघर्षाचा भारतावर परिणाम; सर्वपक्षीय बैठकीची....
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार
उल्हास खोऱ्यातून 78 टीएमसी पाणी मराठवाड्याकडे वळवणार.
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर
GDP, FDI आणि स्टार्टअपमध्ये महाराष्ट्र आघाडीवर.
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश
लोकसभेत राहुल गांधींच्या भाषणादरम्यान गोंधळ; अध्यक्षाने दिले आदेश.
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ....
वडापावची किंमत वाढणार? युद्धाच्या कचाट्यात अस्सल मराठमोळा पदार्थ.....
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक
राज ठाकरे अ‍ॅक्शन मोडमध्ये, पदाधिकाऱ्यांची बोलावली तातडीने बैठक.
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली
पिस्ता, काजू, खजूर खाणं आवाक्या बाहेर... युद्धामुळे महागाई वाढली.