AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईत धरणक्षेत्रात पावसाचा जोर ओसरला, केवळ 16 टक्के पाणीसाठा शिल्लक

गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत हा पाणीसाठा अधिक आहे. मात्र अद्याप मुंबईत धरणक्षेत्रात पावसाने जोर धरलेला नाही. (Mumbai rain only 16 percent water remaining in dam)

मुंबईत धरणक्षेत्रात पावसाचा जोर ओसरला, केवळ 16 टक्के पाणीसाठा शिल्लक
मुंबई धरण (फोटो प्रातनिधिक)
| Edited By: | Updated on: Jun 28, 2021 | 2:13 PM
Share

मुंबई : जून महिन्याच्या सुरुवातीपासून मुंबईत मुसळधार पाऊस कोसळत आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाने ब्रेक घेतला आहे. त्यामुळे सद्यस्थितीत मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सातही तलावात मिळून केवळ 16 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत हा पाणीसाठा अधिक आहे. मात्र अद्याप मुंबईत धरणक्षेत्रात पावसाने जोर धरलेला नाही. त्यामुळे पाण्याची पातळी अतिशय धिम्या गतीने वाढत आहे. यामुळे नागरिकांना पाणी जपून वापरावे असे आवाहन करण्यात आले आहे. (Mumbai rain only 16 percent water remaining in dam)

मुंबईत धरण क्षेत्रात तुरळक पाऊस, पाणीसाठा कमी 

मुंबईत पावसाने विश्रांती घेतलेली असून धरण क्षेत्रातही अगदीच तुरळक पाऊस पडतो आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातील पाणीसाठा कमी झाला आहे. मात्र त्यात दररोज थोडीथोडी वाढ होते आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत पाणीसाठा जास्त आहे ही समाधानाची बाब आहे. सगळ्या तलावांत मिळून 14 लाख 47 हजार दशलक्ष लीटर पाणी साठवण्याची क्षमता आहे. धरणातील पाणीसाठा जुलै अखेरपर्यंत पुरेल या पद्धतीने पाण्याचे नियोजन केले जाते. त्यामुळे येत्या तीन महिन्यांत धरणक्षेत्रात चांगला पाऊस पडला तर मुंबईकरांच्या पाण्याची चिंता मिटणार आहे.

दररोज मुंबईला 3800 दशलक्ष लीटर पाणीपुरवठा

अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार आणि तुळशी या सात धरणांतून मुंबईला दररोज 3800 दशलक्ष लीटर पाणीपुरवठा होत असतो. या सातही धरणांत मिळून रविवारपर्यंत केवळ 2 लाख 41 हजार 97 दशलक्ष लीटर पाणीसाठा शिल्लक आहे. या धरणाच्या साठवण क्षमतेच्या केवळ 16.66 टक्के पाणीसाठा आहे. मुंबईला संपूर्ण वर्षभर सुरळीत पाणीपुरवठा होण्यासाठी सर्व तलाव पूर्ण क्षमतेने भरलेले असावे लागतात.

पाण्याचा व्यावसायिक वापर कमी

मुंबईत सध्या तरण तलाव, उपहारगृहे, कंपन्या, कार्यालये बंद आहेत. त्यामुळे पाण्याचा व्यावसायिक वापर कमी असला तरी घरोघरी स्वच्छतेसाठी पाण्याचा वापर वाढला आहे. पाणी कपात टळण्यासाठी सर्व धरणे 100 टक्के भरणे आवश्यक आहे. शनिवारी धरण क्षेत्रात अगदीत 6 ते 8 मिमी इतका नगण्य पाऊस पडला.

धरण –          पूर्ण पातळी – आजची पातळी – आतापर्यंत पाऊस

उध्र्व वैतरणा – ६०३.५१ मीटर – ५९२.६३ मीटर – ३३७.०० मिमी

मोडकसागर – १६३.१५ मीटर – १५२.५६ मीटर – ५०५.०० मिमी

तानसा –        १२८.६३ मीटर – १२२.५१ मीटर – ५१२.०० मिमी

मध्य वैतरणा – २८५.०० मीटर – २४३.१० मीटर – ३६३.०० मिमी

भातसा – १४२.०७ मीटर – ११२.०९ मीटर – ४२९.०० मिमी

विहार – ८०.१२ मीटर – ७८.०७ मीटर – ९५३.०० मिमी

तुळशी – १३९.१७ मीटर – १३७.५१ मीटर – १४५९.०० मिमी

एकूण पाणीसाठा

२७ जून २०२१- २ लाख ४१ हजार ९७ दशलक्ष लीटर

२७ जून २०२०- १ लाख ३२ हजार ३५७ दशलक्ष लीटर

२७ जून २०१९ – ७१ हजार ५७४ दशलक्ष लीटर

(Mumbai rain only 16 percent water remaining in dam)

संबंधित बातम्या : 

मुंबईतील नामांकित कॉलेजचा ऑनलाईन वर्ग, टवाळखोरांनी पॉर्न व्हिडीओ सुरु केला आणि…

Mumbai Rains : पुढील दीड महिना नो टेन्शन! मुंबईतील पाणीसाठ्यात कमालीची वाढ

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.