AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

मुंबईकरांना अजून किती दिवस पाऊस भिजवणार? हवामान विभागाचा अंदाज समोर!

दिवाळीतही पाऊस धुमाकूळ घालणार का? ऐन सणासुदीच्या दिवसांतही मुंबईत पावसाच्या सरी बरसणार? हवामान विभागाचा अंदाज काय?

मुंबईकरांना अजून किती दिवस पाऊस भिजवणार? हवामान विभागाचा अंदाज समोर!
मुंबई अजून किती दिवस पाऊस?Image Credit source: Social Media
सिद्धेश सावंत
सिद्धेश सावंत | Updated on: Oct 15, 2022 | 11:14 AM
Share

ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी, मुंबई : शुक्रवारपासून सुरु झालेल्या मान्सूनच्या (Monsoon Rain Update) परतीच्या प्रवासाला आणखी विलंब होण्याची शक्यताय. हवामान विभागाने (IMD) वर्तवलेल्या पुढच्या पाच दिवसांच्या अंदाजात, मुंबईत पुन्हा मुसळधार पाऊस (Mumbai Rain Alert) होण्याची आशंका व्यक्त करण्यात आलीय. विजांच्या कडकडाटात ढगांच्या गडगडासह मुंबईत आजपासून पुढचे 3 दिवस पावसाची शक्यताय. त्यामुळे येणारा आठवडाही पावसाच्या सरींसोबत मुंबईकरांना घालवावा लागण्याची शक्यता वर्तवली जातेय. मुंबईसोबत ठाणे, पालघरमध्येही पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय.

गेल्या वर्षी 14 ऑक्टोबरपर्यंत मान्सूनचा पाऊस मुंबईतून परतला होता. मात्र यंदा पावसाचा मुक्काम लांबलाय. सरासरी 8 ऑक्टोबरपर्यंत मुंबईतून मान्सूनचा पाऊस नाहीसा होतो. पण यंदा चित्र काहीसं वेगळं पाहायला मिळालंय. ऑक्टोबर महिन्यात 18 ऑक्टोबरपर्यंत मुंबई पावसाची शक्यता आहे, असं हवामान विभागाने म्हटलंय.

मध्य महाराष्ट्राच्या जळगाव, धुळे नंदुरबारमधून मान्सूनचा परतीचा प्रवास सुरु झाल्याचं हवामान तज्ज्ञांनी म्हटलंय. दक्षिण आणि पश्चिम महाराष्ट्रातूनही परतीच्या पावसाला पुढील तीन दिवसांत सुरुवात होईल, अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पाहा लाईव घडामोडी : Video

ऑक्टोबरमधील विक्रमी पाऊस

शुक्रवारी मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत संध्याकाळी साडे चार नंतर दमदार पावसाला सुरुवात झाली होती. विजांच्या कडकडाटासह ढगांच्या कडकडाटात जोरदार पाऊस झाला होता. तर दुसरीकडे या वर्षी ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंतच्या सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे.

2022 या वर्षी ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत तब्बल 167 मिमी पावसाची नोंद झालीय. गेल्या दहा वर्षातला ऑक्टोबर महिन्यातील हा सर्वाधिक पाऊस असल्याची आकडेवारी समोर आलीय.

विमान वाहतुकीवर परिणाम

लांबलेल्या परतीच्या पावसाचा परिणाम मुंबईच्या विमान वाहतुकीरवही झालाय. मुंबईत विमानांचं लॅन्डिंग पावसामुळे विलंबाने झालं. 8 विमानांच्या लॅन्डिंगवर विजांच्या कडकडाटासोबत ढगांच्या गडगडाटाने परिणाम झाला. काही विमानं मुंबईऐवजी दुसरीकडे वळवण्या आली होती.

एअर इंडियाचं गोवा आणि चेन्नईहून येणार विमान, दिल्ली आणि बँकाँकहून येणारं विस्तारा कंपनीचं विमान, सोबतच इंडिगो आणि कतार एअरलाईन्सची दोन विमानांच्या वेळापत्रकावर पावसामुळे परिणाम झाला. त्यामुळे प्रवाशांनाही मनस्तापाला सामोरं जावं लागलं.

Follow Us
अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं
Andheri Accident | अंधेरीत भरधाव BEST बसच्या अपघाताचा थरार, अनेक वाहनांना उडवलं, रिक्षांचा चुराडा
अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
Devendra Fadnavis on Ajit Pawar Accident | अजित पवार विमान दुर्घटना : CBI चौकशीवर CM फडणवीसांनी दिली सविस्तर माहिती
कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... फडणवीस नेमकं काय म्हणाले?
Devendra Fadnavis | कर्जमाफीने शेतकरी श्रीमंत होत नाही, पण... मुख्यमंत्री फडणवीस नेमकं काय म्हणाले?
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून शिंदेंचा ठाकरे गटावर...
किती पोटदुखी... किती जळजळ... शरद पवार भेटीवरून उपमुख्यमंत्री शिंदेंचा ठाकरे गटावर जोरदार हल्लाबोल
रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही..
Ramesh Mhatre | डॉक्टर मारहाण प्रकरणात रमेश म्हात्रेंना मोठा झटका! कोर्टाने सुनावली पोलीस कोठडी; पक्षातूनही कारवाईचे संकेत?
सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
Sudhir Mungantiwar | सत्ता आली की वचन विसरलात?; सावरकरांना भारतरत्न देण्यावरून मुनगंटीवार संतापले, सरकारला घरचा आहेर
खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू...
Pandharpur Wari Chori News | पालखी सोहळ्यात चोरट्यांचा सुळसुळाट! खाजेची पावडर टाकून वारकऱ्यांचे मोबाईल, पैसे लंपास; वारकऱ्याला अश्रू अनावर
सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
Beed kej Morcha | विलास घुले हत्या प्रकरण पेटलं! सौरव सोनवणेला अटक करा, MCOCA लावा... म्हणत जनसागर रस्त्यावर
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात काय घडतंय?
5 कोटींचं आमिष अन् पक्षांतराची चर्चा! नाशिकच्या राजकारणात मोठं काय घडतंय? चर्चांना वेग
नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील... ठाकरे गटाची मोठी पोलखोल
Nashik Thackeray Nagarsevak | नगरसेवक कुठेही जाणार नाही, जे जातील त्यांना... ठाकरे गटाची पत्रकार परिषदेत मोठी पोलखोल