AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

7 आमदारांचा शपथविधी घटनाबाह्य; संजय राऊतांचा महायुतीवर हल्लाबोल

Sanjay Raut on Vidhan Parishad MLA Oath : ठाकररे गटाचे खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी महायुतीवर जोरदार निशाणा साधला आहे. तसंच विधानसभा निवडणुकीवरही संजय राऊत यांनी भाष्य केलं आहे. वाचा सविस्तर बातमी...

7 आमदारांचा शपथविधी घटनाबाह्य; संजय राऊतांचा महायुतीवर हल्लाबोल
संजय राऊत, खासदारImage Credit source: tv9
आयेशा सय्यद
आयेशा सय्यद | Updated on: Oct 16, 2024 | 11:40 AM
Share

केंद्रीय निवडणूक आयोगाने काल महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीची घोषणा केली आहे. येत्या 20 नोव्हेंबरला मतदान होईल आणि 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. काल निवडणूक जाहीर झाल्यानंतर आता आज सकाळी संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली. यात त्यांनी विधानसभेसोबतच राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या जागांवरही भाष्य केलं आहे. 7 आमदारांचा शपथविधी घटनाबाह्य असल्याचं संजय राऊत म्हणालेत. तर राज्यात पुढचं सरकार महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे. एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचा खेळ भाजपच संपवणार आहे, असं संजय राऊत म्हणालेत.

विधान परिषद निवडणुकीवर राऊत काय म्हणाले?

काल सात जणांनी घेतलेली शपथ हे बेकायदेशीर आणि घटनाबाह्य आहे. हायकोर्टामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये याचिका असताना आचारसंहिता जाहीर व्हायच्या. पाच- सहा तास आधी घेतलेल्या निर्णय घटनाबाह्य आहे. ज्या करण्यासाठी तुम्ही आमचे यादीत थांबविली या सात आमदारांच्या बाबतीत शपथ घेतली त्या संदर्भात राज्यपालांनी कुठली माहिती घेतली. त्यातील राजकीय कार्यकर्ते आहेत धर्मगुरू आहेत, असं संजय राऊत म्हणाले.

सांगलीमध्ये वंदे मातरम् ला विरोध केलेल्या इद्रीस नाईकवाडी या व्यक्तीला तुम्ही विधानपरिषद आमदार बनवतात. याच माणसाने हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यालयावर हल्ला केला होता. त्याचं नाव देवेंद्र फडणवीस राज्यपाल नियुक्त आमदारांच्या यादीत यांचे नाव पाठवतात याची काही नियत आहे. हिंदुत्ववाद आणि राष्ट्रभक्तीवर पिपाणी वाजवण्याची गरज तुम्हाला नाही, असं म्हणत संजय राऊतांनी महायुतीवर निशाणा साधला आहे.

राज्यात मविआ सरकार येणार- संजय राऊत

महाविकास आघाडीच नवीन सरकार स्थापन होईल, याबद्दल कोणतीही शंका नाही. सरकार आम्हीच स्थापन करणार आहोत. अमित शाह, भाजपने कोणताही त्याग केला नाही. अमित शाहांना महाराष्ट्रावर सूड घ्यायचा होता. भाजपच्या नेत्यांना त्याग, बलिदान शब्द शोभत नाही. भाजपच्या लोकांना महाराष्ट्र कमजोर करायचा आहे. प्रादेशीक अस्मितेचे पक्ष यांना तोडायचे आहेत. महाराष्ट्राची लूट करून त्याला त्याग म्हणणार का?, अशा शब्दात संजय राऊतांनी भाजपवर टीका केली आहे.

Follow Us
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार...
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार....
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल.
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत.
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल.
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात..
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात...
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार
राष्ट्रवादीमधील बड्या नेत्याकडून पवारांकडे पार्थ पवार यांची तक्रार.
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत
पडद्यामागे नेमकं काय घडतंय? राष्ट्र्वादी (SP) च्या पुण्यातील बैठकीबाबत.
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात...
राष्ट्रवादीत मोठं काहीतरी घडणार? निवडणूक आयोगाला दिलेल्या या पत्रात....
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च...
ही मशीद नाही मंदिरच! 800 वर्षांपासून सुरु असलेल्या वादावर, उच्च....