AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

#MumbaiRains | अरे हा तर ‘हिवसाळा’! मुंबईत रिमझिम, उद्या छत्री, रेनकोट सोबत ठेवावा लागणार?

मुंबईत सर्वदूर पावसानं दुपारी अचानक हजेरी लावली. सकाळपासून मु्ंबईत ढगाळ वातावरण होतं. अशातच ऐन भंडीच्या दिवसात पाऊस झाल्यानं पुन्हा एकदा साथीच्या रोगांना आमंत्रण मिळेल, अशीही भीती व्यक्त केली जातेय.

#MumbaiRains | अरे हा तर 'हिवसाळा'! मुंबईत रिमझिम, उद्या छत्री, रेनकोट सोबत ठेवावा लागणार?
Photo Source - Twitter
| Edited By: सिद्धेश सावंत | Updated on: Jan 08, 2022 | 5:46 PM
Share

मुंबई : मुंबई (Mumbai) ठिकठिकाणी पावसाच्या सरी बरसल्यात. मुंबईतील पश्चिम उपनगरासह मध्य उपनगरातही पावसानं (Rain) अनेक ठिकाणी हजेरी लावली आहे. पाऊस मुसळधार झारा नसला, तरी रिमझिम सरी बरसल्यानं मुंबईकरांची एकच तारांबळ उडाली आहे. आज सकाळपासूनच मुंबई आणि आसपासच्या परिसरात ढगाळ वातावरण पाहायला मिळालं होतं. त्यामुळे पाऊस पडेल, असा अंदाज वर्तवला जात होता. अशातच दुपारच्या सुमारास मुंबईत पावसानं हजेरी लावली. त्यामुळे अनेकांची तारांबळ उडाली.

मुंबईत सर्वदूर पावसानं दुपारी अचानक हजेरी लावली. सकाळपासून मुंबईत ढगाळ वातावरण होतं. अशातच ऐन भंडीच्या दिवसात पाऊस झाल्यानं पुन्हा एकदा साथीच्या रोगांना आमंत्रण मिळेल, अशीही भीती व्यक्त केली जातेय. आधीच मुंबईत कोरोना रुग्णवाढीचा धोका वाढलेला असताचा अवकाळी पावसानं वातावरणातही बदल झाल्याचंच बघायला मिळालंय.

कांदिवली चारकोप या भागात पावसानं हजेरी लावली असून अनेकांनी या पावसाबाबत ट्वीट करत माहिती दिली आहे. काहींनी तर कधीही आणि अचानक होणाऱ्या पावसाच्या घटना वाढल्यानं मुंबईचं लंडन झालंय की काय, असाही प्रश्न उपस्थित केलाय.

गोरेगावमध्येही पाऊस झाला असून रस्ते पावसाच्या पाण्यानं भिजल्याचं पाहायला मिळालं. दुपारच्या वेळेला फारशी रहदारी नसल्यामुळे या पावसाचा फटका फारसा कुणाला बसला नाही. मात्र फेरीवाल्यांचा या पावसानं तारांबळ उडवली होती.

जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवरही पावसामुळे तारांबळ उडाल्याचं पाहायला मिळालं. अनेक दुचाकीस्वारांची अचानक आलेल्या पावसानं भंबेरी उडवली होती.

उद्या छत्री सोबत ठेवावी लागणार?

अचानक आज पावसानं हजेरी लावल्यामुळे आता पुन्हा एकदा छत्री सोबतच ठेवावी लागणार का, असा प्रश्न मुंबईकरांना पडलाय. दरम्यान, स्कायमेटनं वर्तवलेल्या अंदाजानुसार मुंबईत फार काळ पाऊस पडेल, अशी शक्यता नाकारली आहे. उद्या ढगाळ वातावरण नसेल, असाही अंदाज स्कायमेटनं वर्तवला आहे. रविवारी मुंबई स्वच्छ वातावरण असेल, असाही अंदाज स्कायमेटनं वर्तवला आहे.

इतर बातम्या –

औरंगाबादचा पॉझिटिव्हिटी रेट वाढला, 8 दिवसात शून्यावरून 6 पर्यंत, शुक्रवारचा संसर्गाचा आकडा काय सांगतो?

Helmet Compulsory|विनाहेल्मेट प्रवेश दिल्याने प्राचार्य, मालमत्ता अधिकाऱ्यांवर गुन्हा; नाशिकमध्ये धडक कारवाई!

Gold Price|ओ मेरे सोना रे, सोना रे, सोना…भावात चक्क 600 रुपयांची घसरण, चांदीही 60 हजारांखाली!

Follow Us
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
पावसाने पाठ फिरवली, सोयाबीन करपले; बीडमध्ये शेतकरी संकटात
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया
हात जोडून सांगते आता अजित पवारांच्या अपघाताबाबत बोलणार नाही; सुप्रिया सुळे असं का म्हणाल्या?
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती...
विनोद तावडे यांचे भेटीगाठींचे सत्र सुरुच; प्रभारी म्हणून नियुक्ती होताच उत्तर प्रदेशमध्ये....
दिल्ली सत्यनिकेतनमध्ये पाच मजली इमारत अचानक कोसळली, अनेकजण अडकल्याची..
दिल्ली अचानक कोसळली मोठी इमारत; अनेकजण अडकल्याची भीती, काय घडलं?
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल,
संजय शिरसाट यांना दहीहंडी उत्सवादरम्यान अचानकच मराठा आंदोलकांचा सवाल, काय घडलं?
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट...
शिंदे गटातील नेत्यावर गंभीर आरोप; आक्षेपार्ह शिवगाळ प्रकरणी थेट... अडचणी वाढणार?
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने..
महाराष्ट्रातील 2 कोटी मतदारांची नावे गाळली? राजू पाटलांच्या दाव्याने खळबळ
गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक
Vishva Hindu Parishad | गरबा खेळण्यासाठी मुस्लिमांना प्रवेश नाही, हिंदूंनाही टिळा लावणं आवश्यक; आणखी नियम कोणते?
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत..
हिंजवडीतील आयटी कर्मचाऱ्यांच्या मोर्चात आदित्य ठाकरे सहभागी, पायाभूत सुविधांसाठी मागणी
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी...
मीनाताईंच्या स्मृतीस्थळी ठाकरे कुटुंबीय; उद्धव-रश्मी ठाकरेंनी वाहिली आदरांजली