AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लोकांच्या जीवापेक्षा मोदींचे प्रतिमा संवर्धन महत्वाचे आहे का?; नाना पटोले यांचा सवाल

कोविशिल्डच्या (covishield vaccine ) दोन डोसमधील अंतर कमी करण्याची कोणतीही शिफारस केली नसल्याचं संशोधकांनी म्हटलं आहे. त्यावरून केंद्रातील मोदी सरकारवर टीका होत असतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही केंद्र सरकारवर टीका केली आहे.

लोकांच्या जीवापेक्षा मोदींचे प्रतिमा संवर्धन महत्वाचे आहे का?; नाना पटोले यांचा सवाल
नाना पटोले
| Edited By: | Updated on: Jun 16, 2021 | 6:24 PM
Share

मुंबई: कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्याची कोणतीही शिफारस केली नसल्याचं संशोधकांनी म्हटलं आहे. त्यावरून केंद्रातील मोदी सरकारवर टीका होत असतानाच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनीही केंद्र सरकारवर टीका केली आहे. कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याचा निर्णय कोणाच्या सांगण्यावरून घेतला? लसीकरण फसल्यामुळे मोदींच्या अपयशावर पांघरून घालण्याचा केविलवाणा प्रयत्न होत आहे का? लोकांच्या जीवापेक्षा मोदींचे प्रतिमा संवर्धन महत्वाचे आहे का? असे सवाल नाना पटोले यांनी केले आहेत. (nana patole slams modi government over The gap between covishield vaccine jabs)

नाना पटोले यांनी मीडियाशी संवाद साधताना हे सवाल केले आहेत. कोरोना महामारीचे संकट हाताळण्यात केंद्रातीलमोदी सरकार सपशेल अपयशी ठरल्याचे वारंवार उघड झाले आहे. लसीकरणाचेही कोणतेच ठोस धोरण मोदी सरकारकडे नसल्याने या मोहिमेचा फज्जा उडाला आहे. आता तर कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर 6 ते 8 आठवड्यांवरून 12 ते 16 आठवडे करण्याचा निर्णय 13 मे रोजी सरकारने घेतला. हा निर्णय तज्ज्ञ गटाच्या शिफारशीवरून घेतल्याचे सांगितले गेले. परंतु अशी शिफारस केली नसल्याचा आणि त्याला कोणताच वैज्ञानिक आधार नसल्याचा खुलासा त्या गटातील संशोधकांनी केला आहे. मग हा निर्णय मोदी सरकारने कोणाच्या सांगण्यावरून व कशाच्या आधारावर घेतला याचा खुलासा झाला पाहिजे?, अशी मागणी पटोले यांनी केली आहे.

मोदी सरकारच्या काळात मरण स्वस्त

ज्या संशोधकांचा हवाला देत मोदी सरकारने लसींच्या दोन डोसमधील अंतर वाढवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले होते. तो सरकारचा दावा धादांत खोटा असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. दोन लसीमधील अंतर वाढवण्याचा निर्णय फक्त कोविशिल्ड लसीबद्दलच का घेतला गेला? लसींच्या तुडवड्यामुळे लसीकरण केंद्रे बंद करण्याची वेळ आली आणि त्यामुळे मोदींची प्रतिमा मलीन होऊ नये म्हणून हा सारा खाटाटोप केला आहे का? लसीकरण मोहिमेत मोदी सरकारला आलेले अपयश झाकण्यासाठीच हा निर्णय घेतला नाही ना? असे प्रश्न उपस्थित होत असून केंद्र सरकारने जनतेच्या जीवाशी खेळ मांडला आहे. मोदी सरकारच्या काळात मरण स्वस्त झाले आहे, अशी खोचक टीका त्यांनी केली आहे.

आता तरी सल्ला ऐका

लसीमुळे कोरोनापासून होणारा धोका कमी होण्यास मदत होते हे अनेक तज्ज्ञांनी सांगितले आहे. परंतु मोदी सरकारकडे लसीकरणाचे राष्ट्रीय धोरणच नाही. लसींची आवश्यक मागणी लस उत्पादक कंपन्याकडे न करताच आधी 45 वर्षांवरील आणि नंतर 18 वर्षावरील लोकांना लस देण्याचा निर्णय घेतला. परंतु राज्य सरकारकडे लसींचा पुरवठाच योग्य त्या प्रमाणात केला गेला नाही. दोन कंपन्यांवरच विसंबून राहिल्याने लसीकरण मोहीम फसली. घरोघरी जावून लस द्यावी असे उच्च न्यायालयाने केंद्र सरकारला सांगितले होते. तसेच माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग, काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी व खासदार राहुल गांधी यांनीही सर्वांना मोफत लस देण्यासंदर्भात मोदी सरकारला पत्र पाठवून सल्ला दिला होता. त्यांच्या सल्ल्याकडे मोदींनी दुर्लक्ष केले, आतातरी त्यांचा सल्ला ऐकून लोकांच्या जिवीताचे रक्षण करण्याचा प्रयत्न करावा, असेही ते म्हणाले. (nana patole slams modi government over The gap between covishield vaccine jabs)

संबंधित बातम्या:

Maharashtra News LIVE Update | दारू पिऊन झालेल्या वादात एकाची हत्या, अहमदनगरच्या तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Maharashtra Coronavirus LIVE Update : गेल्या 24 तासात भारतात 62 हजार 224 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद 

VIDEO: “आम्ही बाळासाहेबांच्या रणरागिणी आहोत”, मुंबईतल्या राड्यानंतर शिवसेनेच्या महिला आघाडीच्या प्रतिक्रिया

(nana patole slams modi government over The gap between covishield vaccine jabs)

Follow Us
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी...
पेपरफुटीला लगाम! महाराष्ट्रात परीक्षा पद्धतीत मोठे बदल; फडणवीसांनी गठीत केली उच्चस्तरीय समिती
शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या: शिवसेना सुनावणी, नीट आंदोलन, राजकीय घडामोडींचा आढावा
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले,
आवडत्या शिक्षकाची बदली रोखण्यासाठी विद्यार्थी थेट आमदारांकडे पोहोचले, मग शिंदेंच्या आमदाराने काय प्रतिक्रिया दिली पाहा...
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक,
मोठी खळबळ! कुंभमेळा घोटाळ्यात मत्री गिरीश महाजनांच्या 2 नातलगांना अटक, नेमकं काय घडलं?
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन
CM फडणवीसांचा मोठा निर्णय; भरती परीक्षांबाबत सरकारचा मास्टरप्लॅन, नेमकं काय घडणार?
इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
मोठी बातमी! इमामपूर रोडवर वाल्मिक कराड समर्थकांकडून गोळीबार; नेमकं काय घडलं?
चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड
Kolkata To Chennai Flight | चेन्नईला जाणाऱ्या इंडिगो विमानाच्या इंजिनमध्ये बिघाड; विमानाचं तातडीने लँडिंग, चेन्नई विमानतळावर आपत्काल जाहीर
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल..
कोर्टाच्या आगामी सुनावणीत मोठं घडणार? सुनावणीच्या अखेरीच कपिल सिब्बल यांची मोठी मागणी
शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; कोर्टात नेमकं काय घडलं?
Shivsena Case Hearing | एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदावरच सिब्बलांचा सवाल; सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडलं?
फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; सिब्बलांचा युक्तिवाद
Shivsena Hearing | फूट म्हणजे नक्की काय? सुप्रीम कोर्टाचा थेट सवाल; कपिल सिब्बलांचा जोरदार युक्तिवाद