AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाना पटोले यांनी लिहीलं राज्यपालांना पत्र, कोणत्या कारणासाठी घेणार आमदारांच्या सह्यांसह राज्यपालांची भेट

खारघरमध्ये अमित शहा यांचा शामियाना एअर कंडिशनमध्ये केला होता. या कार्यक्रमाला लाखो भक्त आले होते.

नाना पटोले यांनी लिहीलं राज्यपालांना पत्र, कोणत्या कारणासाठी घेणार आमदारांच्या सह्यांसह राज्यपालांची भेट
congrss stat president nana patole
| Updated on: Apr 24, 2023 | 3:30 PM
Share

मुंबई : काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सरकारवर सडकून टीका केली. नाना पटोले म्हणाले, 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांची सत्ता आली. तेव्हा मोदी यांनी लोकसभेच्या सभेमध्ये सांगितलं होतं की, आमचं सरकार गरिबांसाठी काम करेल. शेतकऱ्यांसाठी काम करेल. मात्र काल आम्हाला कळलं सगळ्यात गरीब माणूस कोण. अदानीकडून जीएसटी माफ करण्याचं पाप सरकार करत आहे, असा आरोप नाना पटोले यांनी लावला.

दुसरीकडे पिण्याचे पाणी नव्हते

खारघर उष्माबळीच्या दुर्घटनेवर बोलताना नाना पटोले म्हणाले, खारघरमध्ये अमित शहा यांचा शामियाना एअर कंडिशनमध्ये केला होता. या कार्यक्रमाला लाखो भक्त आले होते. 13 कोटी 80 लाख जनतेचे खर्च करताना जनता राजा उन्हात बसली होती. एका बाजूला पंचपक्वान्न खात होते. तर, दुसरीकडे मात्र भक्तांना पिण्याचे पाणी मिळत नव्हते.

चुकीच्या नियोजनामुळे घडली घटना

अमित शहा यांना उशीर होणार म्हणून 10.30 वाजता चालू होणारा कार्यक्रम हा 11.30 वाजता चालू केला गेला. 12 वाजता उष्माघाताचा पहिला मृत्यू झाला, तरीही कार्यक्रम चालू होता, अशी बातमी वाचायला मिळाली. हत्याकांड हा राज्याच्या चुकीच्या नियोजनमुळे घडला आहे, असा थेट आरोप नाना पटोले यांनी केला.

सरकारने नेमका आकडा जाहीर करावा

हे सरकार बेशरम आहे. ह्यांना जीव गेला तरी काही फरक पडत नाही. राज्य सरकार 18 मृत्यूचा आकडा दाखवत आहेत. मात्र चेंगरा-चेंगरी पाहून मोठा आकडा आहे. नेमका आकडा सरकारने जाहीर करावा, अशी मागणी नाना पटोले यांनी केली.

या घटनेची चौकशी अशी करावी

खारघर प्रकरणी सरकारने हायकोर्टाची कमिटी बसवून या घटनेची चौकशी करावी. याबाबत राज्यपालाना पत्र लिहलं आहे. 30 तारखेनंतर आमदारांच्या सह्या निशी राज्यपालांची भेट घेऊ, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली.

देशात सैनिकही सुरक्षित नाहीत

पुलवामाबाबत सत्यपाल मलिक यांनी भूमिका मांडली. त्यांनी प्रधानमंत्री यांना कळवलं होतं. मग एअरशिफ्टिंग का केली नाही. देशामध्ये सैनिकही सुरक्षित नाहीत. डाळ मे कुछ काला है. ह्याच उत्तर त्यांनी दिलं पाहिजे, अशी मागणीही नाना पटोले यांनी केली.

अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.