AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाना पटोले यांनी लिहीलं राज्यपालांना पत्र, कोणत्या कारणासाठी घेणार आमदारांच्या सह्यांसह राज्यपालांची भेट

खारघरमध्ये अमित शहा यांचा शामियाना एअर कंडिशनमध्ये केला होता. या कार्यक्रमाला लाखो भक्त आले होते.

नाना पटोले यांनी लिहीलं राज्यपालांना पत्र, कोणत्या कारणासाठी घेणार आमदारांच्या सह्यांसह राज्यपालांची भेट
congrss stat president nana patole
Govinda Hatwar
Govinda Hatwar | Updated on: Apr 24, 2023 | 3:30 PM
Share

मुंबई : काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सरकारवर सडकून टीका केली. नाना पटोले म्हणाले, 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांची सत्ता आली. तेव्हा मोदी यांनी लोकसभेच्या सभेमध्ये सांगितलं होतं की, आमचं सरकार गरिबांसाठी काम करेल. शेतकऱ्यांसाठी काम करेल. मात्र काल आम्हाला कळलं सगळ्यात गरीब माणूस कोण. अदानीकडून जीएसटी माफ करण्याचं पाप सरकार करत आहे, असा आरोप नाना पटोले यांनी लावला.

दुसरीकडे पिण्याचे पाणी नव्हते

खारघर उष्माबळीच्या दुर्घटनेवर बोलताना नाना पटोले म्हणाले, खारघरमध्ये अमित शहा यांचा शामियाना एअर कंडिशनमध्ये केला होता. या कार्यक्रमाला लाखो भक्त आले होते. 13 कोटी 80 लाख जनतेचे खर्च करताना जनता राजा उन्हात बसली होती. एका बाजूला पंचपक्वान्न खात होते. तर, दुसरीकडे मात्र भक्तांना पिण्याचे पाणी मिळत नव्हते.

चुकीच्या नियोजनामुळे घडली घटना

अमित शहा यांना उशीर होणार म्हणून 10.30 वाजता चालू होणारा कार्यक्रम हा 11.30 वाजता चालू केला गेला. 12 वाजता उष्माघाताचा पहिला मृत्यू झाला, तरीही कार्यक्रम चालू होता, अशी बातमी वाचायला मिळाली. हत्याकांड हा राज्याच्या चुकीच्या नियोजनमुळे घडला आहे, असा थेट आरोप नाना पटोले यांनी केला.

सरकारने नेमका आकडा जाहीर करावा

हे सरकार बेशरम आहे. ह्यांना जीव गेला तरी काही फरक पडत नाही. राज्य सरकार 18 मृत्यूचा आकडा दाखवत आहेत. मात्र चेंगरा-चेंगरी पाहून मोठा आकडा आहे. नेमका आकडा सरकारने जाहीर करावा, अशी मागणी नाना पटोले यांनी केली.

या घटनेची चौकशी अशी करावी

खारघर प्रकरणी सरकारने हायकोर्टाची कमिटी बसवून या घटनेची चौकशी करावी. याबाबत राज्यपालाना पत्र लिहलं आहे. 30 तारखेनंतर आमदारांच्या सह्या निशी राज्यपालांची भेट घेऊ, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली.

देशात सैनिकही सुरक्षित नाहीत

पुलवामाबाबत सत्यपाल मलिक यांनी भूमिका मांडली. त्यांनी प्रधानमंत्री यांना कळवलं होतं. मग एअरशिफ्टिंग का केली नाही. देशामध्ये सैनिकही सुरक्षित नाहीत. डाळ मे कुछ काला है. ह्याच उत्तर त्यांनी दिलं पाहिजे, अशी मागणीही नाना पटोले यांनी केली.

Follow Us
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी धडाकाच लावलाय, मदरशांबाबत घेतला मोठा
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्र्यांनी धडाकाच लावलाय, मदरशांबाबत घेतला मोठा.
मोटेगावकराने फोडलेल्या पेपरचा उघडपणे घेतला सराव, त्यानंतर व्हिडिओ...
मोटेगावकराने फोडलेल्या पेपरचा उघडपणे घेतला सराव, त्यानंतर व्हिडिओ....
मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या नव्या कार्यकारिणीच्या यादीत धनंजय मुंडे...
मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या नव्या कार्यकारिणीच्या यादीत धनंजय मुंडे....
प्रत्येक गोष्टीमध्ये हिंदू-मुस्लीम...वांद्रे कारवाईनंतर वरुण सरदेसा...
प्रत्येक गोष्टीमध्ये हिंदू-मुस्लीम...वांद्रे कारवाईनंतर वरुण सरदेसा....
वांद्र्यात झोपड्या हटवताना मोठी धुमश्चक्री, पोलीस आणि स्थानिक आमनेसामन
वांद्र्यात झोपड्या हटवताना मोठी धुमश्चक्री, पोलीस आणि स्थानिक आमनेसामन.
“औषध कुठे मिळणार?” सांगलीत मेडिकल बंदमुळे नातेवाईक हतबल
“औषध कुठे मिळणार?” सांगलीत मेडिकल बंदमुळे नातेवाईक हतबल.
प्राध्यापक ते ब्युटी पार्लर, नीट पेपरफुटीचं चक्रावून टाकणारं कनेक्शन
प्राध्यापक ते ब्युटी पार्लर, नीट पेपरफुटीचं चक्रावून टाकणारं कनेक्शन.
पुण्यात तडकाफडकी मोठी कारवाई; RCC क्लासेसवर थेट...
पुण्यात तडकाफडकी मोठी कारवाई; RCC क्लासेसवर थेट....
मोठी खळबळ! राष्ट्रवादीत फूट पडणार? 22-23 आमदार शरद पवारांच्या संपर्कात
मोठी खळबळ! राष्ट्रवादीत फूट पडणार? 22-23 आमदार शरद पवारांच्या संपर्कात.
मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या बैठकीत विलिनीकरणाविषयी मोठा निर्णय....
मोठी बातमी! राष्ट्रवादीच्या बैठकीत विलिनीकरणाविषयी मोठा निर्णय.....