महामोर्चाला किती लोक आले? आकडे वेगवेगळे, पोलिसांचा दावा काय?, मिटकरी आणि नवनीत राणा यांचा आकडा काय?

मोर्चात प्रत्यक्ष सहभागी लोकं 2 लाखांच्यावर. मात्र देवेंद्रजी यांच्या आदेशावरून पोलिसांनी काढलेली आकडेवारी 65 हजार... नाही उद्विग्न व्हावं माणसांनी पण इतकंही नाही...

महामोर्चाला किती लोक आले? आकडे वेगवेगळे, पोलिसांचा दावा काय?, मिटकरी आणि नवनीत राणा यांचा आकडा काय?
महामोर्चाला किती लोक आले? आकडे वेगवेगळे, पोलिसांचा दावा काय?Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Dec 18, 2022 | 6:59 AM

मुंबई: महापुरुषांच्या सातत्याने होत असलेल्या अवमानाच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने मुंबईत प्रचंड मोर्चा काढला. सरकारचा आणि खासकरून भाजप नेत्यांसह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा निषेध करण्यासाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चा निमित्ताने सत्तांतरानंतर पाहिल्यांदाच उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले हे महाविकास आघाडीचे दिग्गज नेते एकाच मंचावर दिसले. या मोर्चाला मोठी गर्दी जमवण्यात आघाडीला यश आलं. पण या गर्दीवरून मतमतांतरे व्यक्त होत आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मोर्चाचा सांगितलेला आकडा एक आहे, पोलिसांनी सांगितलेला वेगळा तर खासदार नवनीत राणा यांनी सांगितलेला आकडा वेगळाच आहे. त्यामुळे मोर्चाचा आकडा नेमका काय? असा सवाल केला जात आहे.

महाविकास आघाडीच्या कालच्या मोर्चाला 65 हजार लोक उपस्थित होते असा पोलिसांचा दावा आहे. पण पोलिसांचा हा दावा राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी खोडून काढला आहे.

हे सुद्धा वाचा

मोर्चात प्रत्यक्ष सहभागी लोकं 2 लाखांच्यावर. मात्र देवेंद्रजी यांच्या आदेशावरून पोलिसांनी काढलेली आकडेवारी 65 हजार… नाही उद्विग्न व्हावं माणसांनी पण इतकंही नाही… असा टोला अमोल मिटकरी यांनी ट्विटमधून लगावला आहे. मिटकरी यांच्या मते कालच्या मोर्चाला 2 लाखाहून अधिक लोक उपस्थित होती.

तर खासदार नवनीत राणा यांनी मोर्चाचा आकडा वेगळाच सांगितला आहे. मोर्चाला फक्त तीन हजारच लोक उपस्थित होते. हा नौटंकी मोर्चा असल्याची टीका नवनीत राणा यांनी केली आहे. महाविकास आघाडी कडून काढण्यात आलेला महामोर्चा नसून हे नौटंकी मोर्चा आहे. ठाकरे सरकार गुंडशाही सरकार होतं, अशी टीकाही राणा यांनी केली आहे.

हनुमान चालीसा वाचणे म्हणजे देशद्रोह ही आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठी नोंद ठाकरे सरकारच्या काळात झाली आहे. सध्याचे शिंदे-फडणवीस सरकार हे संविधानावर चालणारं सरकार आहे. उद्धव ठाकरे यांच्या नाटक कंपनीकडून संत आणि देवांना घेऊन जे नाटक सुरू आहे ते ठाकरेंनी बंद केले पाहिजे, असंही त्या म्हणाल्या.

मोर्चा पूर्णपणे फसला आणि फेल गेला आहे. मोर्चाला जी गर्दी झाली ती पैसे देऊन झाली होती. उद्धव ठाकरे आपण जे भाषण केले ही आमची ताकद आहे. आपण जे गार्दी आणली ती पण पैसे देऊन आणली. झाकली मूठ सव्वा लाखाची. या मोर्चाच्या माध्यमातून सत्य उघड झालं आहे, अशी टीका भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

Non Stop LIVE Update
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात
बॉलिवूड कलाकार राजकारणात, सेनेकडून हे स्टार प्रचारक लोकसभेच्या रिंगणात.