AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महामोर्चाला किती लोक आले? आकडे वेगवेगळे, पोलिसांचा दावा काय?, मिटकरी आणि नवनीत राणा यांचा आकडा काय?

मोर्चात प्रत्यक्ष सहभागी लोकं 2 लाखांच्यावर. मात्र देवेंद्रजी यांच्या आदेशावरून पोलिसांनी काढलेली आकडेवारी 65 हजार... नाही उद्विग्न व्हावं माणसांनी पण इतकंही नाही...

महामोर्चाला किती लोक आले? आकडे वेगवेगळे, पोलिसांचा दावा काय?, मिटकरी आणि नवनीत राणा यांचा आकडा काय?
महामोर्चाला किती लोक आले? आकडे वेगवेगळे, पोलिसांचा दावा काय?Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Dec 18, 2022 | 6:59 AM
Share

मुंबई: महापुरुषांच्या सातत्याने होत असलेल्या अवमानाच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने मुंबईत प्रचंड मोर्चा काढला. सरकारचा आणि खासकरून भाजप नेत्यांसह राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचा निषेध करण्यासाठी या मोर्चाचं आयोजन करण्यात आलं होतं. या मोर्चा निमित्ताने सत्तांतरानंतर पाहिल्यांदाच उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले हे महाविकास आघाडीचे दिग्गज नेते एकाच मंचावर दिसले. या मोर्चाला मोठी गर्दी जमवण्यात आघाडीला यश आलं. पण या गर्दीवरून मतमतांतरे व्यक्त होत आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी मोर्चाचा सांगितलेला आकडा एक आहे, पोलिसांनी सांगितलेला वेगळा तर खासदार नवनीत राणा यांनी सांगितलेला आकडा वेगळाच आहे. त्यामुळे मोर्चाचा आकडा नेमका काय? असा सवाल केला जात आहे.

महाविकास आघाडीच्या कालच्या मोर्चाला 65 हजार लोक उपस्थित होते असा पोलिसांचा दावा आहे. पण पोलिसांचा हा दावा राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी खोडून काढला आहे.

मोर्चात प्रत्यक्ष सहभागी लोकं 2 लाखांच्यावर. मात्र देवेंद्रजी यांच्या आदेशावरून पोलिसांनी काढलेली आकडेवारी 65 हजार… नाही उद्विग्न व्हावं माणसांनी पण इतकंही नाही… असा टोला अमोल मिटकरी यांनी ट्विटमधून लगावला आहे. मिटकरी यांच्या मते कालच्या मोर्चाला 2 लाखाहून अधिक लोक उपस्थित होती.

तर खासदार नवनीत राणा यांनी मोर्चाचा आकडा वेगळाच सांगितला आहे. मोर्चाला फक्त तीन हजारच लोक उपस्थित होते. हा नौटंकी मोर्चा असल्याची टीका नवनीत राणा यांनी केली आहे. महाविकास आघाडी कडून काढण्यात आलेला महामोर्चा नसून हे नौटंकी मोर्चा आहे. ठाकरे सरकार गुंडशाही सरकार होतं, अशी टीकाही राणा यांनी केली आहे.

हनुमान चालीसा वाचणे म्हणजे देशद्रोह ही आजपर्यंतच्या इतिहासातील सर्वात मोठी नोंद ठाकरे सरकारच्या काळात झाली आहे. सध्याचे शिंदे-फडणवीस सरकार हे संविधानावर चालणारं सरकार आहे. उद्धव ठाकरे यांच्या नाटक कंपनीकडून संत आणि देवांना घेऊन जे नाटक सुरू आहे ते ठाकरेंनी बंद केले पाहिजे, असंही त्या म्हणाल्या.

मोर्चा पूर्णपणे फसला आणि फेल गेला आहे. मोर्चाला जी गर्दी झाली ती पैसे देऊन झाली होती. उद्धव ठाकरे आपण जे भाषण केले ही आमची ताकद आहे. आपण जे गार्दी आणली ती पण पैसे देऊन आणली. झाकली मूठ सव्वा लाखाची. या मोर्चाच्या माध्यमातून सत्य उघड झालं आहे, अशी टीका भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.

मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र
मुंबईत चौरंगी लढत, ठाकरेंना टेंशन? बदलत्या राजकीय समीकरणांचे चित्र.
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?
मोदी, ईव्हीएममुळे भाजपचा माज; राज ठाकरेंचा हल्लाबोल, कशाववरून निशाणा?.
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला
पुणे, पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही NCP एकत्र, जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला.
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी
घड्याळ्याशी घरोबा, तुतारीचा खेळखंडोबा? नेत्यांची पक्षाला सोडचिठ्ठी.
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्....
तिकीट वाटपावरून निष्ठावंतांचा उद्रेक, उपऱ्यांना उमेदवारी अन्.....
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य
शिवसेनेला मत देणारे स्वर्गात जाणार, शहाजीबापू पाटलांचे अजब वक्तव्य.
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी
कोकणी मतांसाठी भाजपकडून नारायण राणेंवर मोठी जबाबदारी.
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले...
दिनकर पाटलांना विजयाची खात्री, उमेदवारी अर्ज भरल्यावर म्हणाले....
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन
भाजपची माजी नगरसेविका बंडखोरीच्या तयारीत, पत्राद्वारे भावनिक आवाहन.
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर..
आम्हाला न्याय द्या, नाराज इच्छुकांची ठाकरेंकडे मागणी, मातोश्री बाहेर...