AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Pawar Live | शरद पवार म्हणाले, ‘अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली’

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज वाय बी चव्हाण सेंटर येथे धडाकेबाज भाषण केलं. यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यांवरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटावर निशाणा साधला.

Sharad Pawar Live | शरद पवार म्हणाले, 'अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली'
| Updated on: Jul 05, 2023 | 5:04 PM
Share

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईत वाय. बी. चव्हाण सेंटर येथे आपल्या पक्षाच्या सर्व आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांची बैठक बोलावली आहे. या बैठकीला अनेक नेत्यांनी भाषण केली. विशेष म्हणजे या बैठकीला शेकडो तरुण कार्यकर्त्यांनी हजेरी लावली आहे. कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी सुरु आहे. या बैठकीत भाषण करताना शरद पवार यांनी नाशिकमध्ये काल घडलेल्या घडामोडीवर भाष्य केलं. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली तेव्हा आपण काँग्रेस पक्षाचं कार्यालय आपल्या हातात होतं पण ती काँग्रेसची प्रॉपर्टी होती. त्यामुळे आम्ही त्या कार्यालयावर ताबा मिळवला नाही. पण नाशिकमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर काल जो प्रकार घडला त्यावर शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला आपल्या भाषणातून चांगलंच सुनावलं.

“काँग्रेसमध्ये आम्ही लोकं होतं. आम्ही नवीन पक्ष काढण्याचा निर्णय घेतला. आम्ही काँग्रेसचं भवन सोडून दिलं. कारण ती संपत्ती काँग्रेस पक्षाची होती. ती आम्ही हिसकावून घेण्याची आवश्यकता नव्हती. आमच्या हातात होती. नाशिकला काय झालं? काही लोक येतात, पोलिसांची मदत घेतात, ताब्यात घेतात आणि सांगतात, हा पक्ष आमचा. ही घड्याळाची खूण आमची आहे”, असं शरद पवार म्हणाले.

“ठिक आहे, तुम्ही सांगू शकता. निवडणूक आयोगाने घड्याळाची खूण कुणाला दिली? ही सगळ्या देशाला माहिती आहे. तुमच्यासाठी सांगतो, कोण कुठे जाणार नाही”, असं आश्वासन शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना दिलं. तसेच यावेळी शरद पवार आपल्या कार्यकर्त्यांना उद्देशून, अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली, असे म्हणाले.

‘चिन्ह घेऊन जात असाल तर….’

“माझ्या वैयक्तिक आयुष्यात मी अनेक निवडणुका लढलो. १९६७ साली मी पाहिली निवडणूक लढवली तेव्हा माझी खूण बैलजोडी होती. त्यानंतर काँग्रेसचे दोन भाग झाले. इंदिरा काँग्रेस आणि इतर काँग्रेस. त्यामध्ये आमची खूण गेली. मग आमची गाय-वासरु खूण आली. त्यानंतरच्या काळात चरखा आला. त्यानंतरच्या काळात हात आला आणि आता त्यानंतर घड्याळ आला”, असं शरद पवार यांनी सांगितलं.

“बैलजोडीवर लढलो, हातावर लढलो, चरख्यावर लढलो, गाय-वासरुवर लढलो, घड्याळवर लढलो. कशात काही कमतरता नाही. त्यामुळे कुणी काही सांगत असेल की चिन्ह आम्ही घेऊन जाऊ. चिन्ह जाणार नाही. जाऊ देणार नाही. पण चिन्ह घेऊन जात असाल तर कोणतंही चिन्ह असूद्या, जोपर्यंत सामान्य माणसाच्या अंतकरणात त्या पक्षाचा विचार आणि कार्यकर्त्याची भूमिका चोखंदळ आहे तोपर्यंत काही चिंता करण्याचं कारण नाही”, असं शरद पवार म्हणाले.

'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला
'स्टाईल वापरुन काही होत नाही, कतृत्व...',आदित्य यांना महाजन यांचा टोला.
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात
माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचा पणतू,पालिका निवडणूकीच्या रिंगणात.
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी
मुंबईत आम्हाला 14-15 जागा मिळाल्या पाहिजेत, रामदास आठवले यांची मागणी.
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप
अशोक चव्हाण यांना भाजपा हिरवा करायचाय, प्रताप पाटील चिखलीकर यांचा आरोप.
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा
मुंबईचा महापौर उत्तर भारतीय होणार, सुनील शुक्ला यांचा दावा.
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आली तर काँग्रेस स्वबळावर लढेल - वडेट्टीवार.
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप
काँग्रेसमध्ये आलो तरी शरद पवार कायम श्रद्धास्थानी - प्रशांत जगताप.
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी
जळगाव महापालिकेत प्रतिनिधीत्व द्या, बारा बुलतेदार महासंघाची मागणी.
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा
याक्षणी आम्ही मुंबई पालिकेत 115 जागा जिंकत आहोत, संजय राऊत यांचा दावा.
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले
पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीची युती होणार की नाही? काकडे काय म्हणाले.