राहुल गांधींसाठी राष्ट्रवादीची बॅटींग, थेट ट्वीटर इंडियाला घेरलं; विचारला कळीचा प्रश्न

काँग्रेस नेते राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांचे ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीने थेट ट्विटर इंडियालाच घेरलं आहे. (ncp leader nawab malik asked twitter india its own policy)

राहुल गांधींसाठी राष्ट्रवादीची बॅटींग, थेट ट्वीटर इंडियाला घेरलं; विचारला कळीचा प्रश्न
rahul gandhi
Follow us
| Updated on: Aug 13, 2021 | 1:57 PM

मुंबई: काँग्रेस नेते राहुल गांधींसह काँग्रेस नेत्यांचे ट्विटर अकाऊंट सस्पेंड करण्यात आले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीने थेट ट्विटर इंडियालाच घेरलं आहे. तुमची ब्लॉक पॉलिसी नेमकी काय आहे? ते एकदा जाहीरच करा, असा कळीचा प्रश्नच राष्ट्रवादीकडून उपस्थित करण्यात आला आहे. (ncp leader nawab malik asked twitter india its own policy)

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी हा सवाल केला आहे. ट्विटरने कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी व काँग्रेसच्या अन्य नेत्यांची ट्विटर हँडल ब्लॉक केले आहेत. त्यामुळे नवाब मलिक यांनी ट्विटरच्या भूमिकेवर शंका निर्माण केली आहे. ट्विटर इंडियाने त्यांची ब्लॉक पॉलिसी नेमकी काय आहे हे जाहीर करावे, अशी मागणी मलिक यांनी केली आहे.

केंद्राच्या दबावाखालीच काम

मागील काही दिवसांपूर्वी ट्विटर व केंद्रसरकारमध्ये वाद उफाळून आला होता. त्यानंतरच विरोधी पक्षांच्या नेत्यांची ट्विटर हँडल ब्लॉक होत आहेत आणि हे दबावाखाली होत आहे, असा आरोपही त्यांनी केला. कोणत्या गोष्टींसाठी आणि कोणत्या कारणांसाठी हँडल आणि पोस्ट ब्लॉक करणार आहे. किती दिवसांसाठी व त्यांच्या कक्षेत जी – जी ट्विटर हँडल येतील त्या सर्वांवर कारवाई करणार का? याबाबतची पॉलिसी ट्विटर इंडियाने स्पष्ट करावी अन्यथा केंद्रसरकारच्या दबावाखाली ट्विटर काम करतंय ही जनतेची शंका अजून वाढेल, असेही त्यांनी म्हटलं आहे.

शाहु- फुले-आंबेडकरांच्या विचारांचा पक्ष

दरम्यान, मलिक यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंवर टीका केली आहे. राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर राज्यात जातीय अस्मितेचा मुद्दा पुढे आला, असं विधान मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं आहे. त्यावर राष्ट्रवादीने पलटवार केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शाहू – फुले – आंबेडकरांच्या विचारांचा पक्ष आहे. त्यांच्या ठरलेल्या धोरणानुसार आम्ही राजकारण करतो. मात्र राज ठाकरे यांना हे माहीत नसावे किंवा जातीव्यवस्थेचा इतिहास माहित नसावा म्हणून ते अशाप्रकारचे वक्तव्य करत आहेत, असा पलटवार मलिक यांनी केला आहे.

ते वक्तव्य अज्ञानातून

छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवांनी जातीव्यवस्था नष्ट करण्याचे काम केले. समता मुलक समाज घडवण्याचं काम केलं हेही राज ठाकरे यांना माहीत नसावे असा उपरोधिक टोला लगावतानाच राज ठाकरे यांनी अज्ञानातून हे वक्तव्य केले असावे असा चिमटाही त्यांनी काढला. (ncp leader nawab malik asked twitter india its own policy)

संबंधित बातम्या:

राज ठाकरेंना जातीव्यवस्थेचा इतिहास माहीत नसावा, राज यांच्या ‘त्या’ वक्तव्यावर राष्ट्रवादीचा पलटवार

शरीरसुखाची मागणी केल्याची महिलेची गंभीर तक्रार; संजय राठोड मीडियासमोर आले, म्हणाले…

सुप्रिया सुळे का म्हणाल्या देशात मोठा सोशल चेंज हवा?; वाचा सविस्तर

(ncp leader nawab malik asked twitter india its own policy)

Non Stop LIVE Update
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?
सलमान खानच्या घरावर गोळीबार करणारे आरोपी महिनाभर पनवेलमध्ये?.
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?
एका रात्रीत तुझं पार्सल बीडला माघारी पाठवणार, मोहितेंचा कुणावर निशाणा?.
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट
माढ्यासाठी फडणवीस मैदानात, विशेष विमानाने 'या' 4 नेत्याची तडकाफडकी भेट.
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार
अजितदादा जर मला नटसम्राट म्हणून हिणवत असतील तर...अमोल कोल्हेंचा पलटवार.
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग
सलमान खानच्या घरावरील हल्ल्याचा कट महिन्यापूर्वीच? इथं झालं प्लानिंग.
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,
अभिषेक घोसाळकर हत्येच्या तपासावर तेजस्वी घोसाळकरांची नाराजी,.
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिढा वाढला; राणे-सामतांनी घेतले उमेदवारी अर्ज
रत्नागिरी-सिंधुदुर्गात तिढा वाढला; राणे-सामतांनी घेतले उमेदवारी अर्ज.
21 माजी न्यायाधीशांचं सरन्यायाधीशांना पत्र, काय केला आरोप?
21 माजी न्यायाधीशांचं सरन्यायाधीशांना पत्र, काय केला आरोप?.
प्रचारादरम्यान विरोधकांनी विरोधकांच्या प्रभागात मारला मिसळीवर ताव
प्रचारादरम्यान विरोधकांनी विरोधकांच्या प्रभागात मारला मिसळीवर ताव.
हंडाभर पाण्यासाठी वणवण, tv9च्या बातमीनंतर 'पाणीदूत' हाकेला धावला
हंडाभर पाण्यासाठी वणवण, tv9च्या बातमीनंतर 'पाणीदूत' हाकेला धावला.