AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुप्रिया सुळे का म्हणाल्या देशात मोठा सोशल चेंज हवा?; वाचा सविस्तर

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारच्या कारभारावर जोरदार हल्ला चढवला आहे. देशात आणीबाणीसारखी परिस्थिती आहे. अस्वस्थता आहे. (india needs to big change, says supriya sule)

सुप्रिया सुळे का म्हणाल्या देशात मोठा सोशल चेंज हवा?; वाचा सविस्तर
उद्धव ठाकरे शेतकऱ्याला भेटत नाहीत; राष्ट्रवादी पदाधिकाऱ्याची सुप्रियाताईंपुढे 'लाईव्ह' तक्रार
| Edited By: | Updated on: Aug 13, 2021 | 11:20 AM
Share

मुंबई: राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केंद्र सरकारच्या कारभारावर जोरदार हल्ला चढवला आहे. देशात आणीबाणीसारखी परिस्थिती आहे. अस्वस्थता आहे, असं सांगतानाच आता देशात मोठा सोशल चेंज व्हायला हवा, असं मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं आहे. (india needs to big change, says supriya sule)

स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी एका चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत हे मत व्यक्त केलं. नेतृत्व हे पुरोगामी विचाराचे व समाजात तेढ आणि कटुता न ठेवता करणारे हवे. त्यासाठी देशात मोठा सोशल चेंज व्हायला हवा. जनतेला मोकळा श्वास घेण्यास संधी मिळायला हवी मात्र आज देशात दडपशाही सुरू आहे, असं स्पष्ट व परखड मत सुळे यांनी व्यक्त केलं. देश स्वातंत्र्य झाल्यानंतर 60 वर्षांमध्ये कोणतीही अस्वस्थता दिसली नाही. मात्र मागील पाच-सात वर्षात ही अस्वस्थता पहायला मिळत आहे, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्राने देशाला खूप काही दिलं

15 ऑगस्टला आपला देश 75 वर्षाचा होतोय. यामध्ये प्रोग्रेसिव्ह स्टेट म्हणून महाराष्ट्राकडे सातत्याने पाहिले गेले आहे. राज्याने पाच गोष्टींमध्ये बदल केला आहे. महाराष्ट्रात उत्तम शिक्षण सुरू झाले. रयत शिक्षण, अंजूमन इस्लाम या संस्था तयार झाल्या. आईवडिलांना सुरक्षित वाटणारे शिक्षण संस्था आपण तयार केल्या. आरोग्य हा दुसरा मुद्दा असून त्यामध्ये पोलिओ, देवी, कुष्ठरोग अशा अनेक रोगांवर आपण मात केली आहे. तिसरा मुद्दयामध्ये चांगल्या संस्था बांधल्या गेल्या. ज्यातून विचारांची देवाणघेवाण झाली. हे केवळ राज्यापूरते सीमित नाही. तर देशपातळीवर याची दखल घेतली आहे. चौथा मुद्दा नरेगा. ही स्किम राज्याने केंद्राला दिली. स्वच्छ भारत योजना, रोजगार हमी योजना या महाराष्ट्राने तयार केल्या आणि केंद्राला दिल्या. आपल्या राज्याचे साहित्य हे फार मोठे आहे. राज्यातील साहित्य इतर राज्यांनी घेतले आहे, असे त्यांनी सांगितलं.

लोकसंख्या आणि लिंगभेद मोठा मुद्दा

यासोबतच अपयश असलेल्या बाजूही आहेत. यातील सर्वप्रथम मुद्दा हा लोकसंख्या आहे. लोकसंख्येवर आपण नियंत्रण करू शकलो नाही. त्यासोबतच पर्यावरण, अर्बन प्लॅनिंग, स्वच्छता या गोष्टींवर जे काम करायला हवे ते आपण अजूनही केलेले नाही. लिगंभेद हा अजून एक मोठा प्रश्न आपल्याकडे आहे. यासाठी एक राज्यच नाही तर देश म्हणूनही आपण अपयशी ठरलो आहोत, असे परखड मतही त्यांनी व्यक्त केले.

हिंदी, इंग्रजीचंही शिक्षण द्यावं

देशातील लोकांवर प्रचंड विश्वास आहे. वर्तमान युवा पिढीत कोणताही मतभेद उरलेला दिसत नाही. त्यावर बोलताना ग्रामीण आणि शहरी भागात हा मतभेद याआधी दिसून येत होता. मात्र आता हा मतभेद दिसत नाही. सध्या सेमी इंग्रजी ही कल्पना सर्वत्र पहायला मिळते मात्र याचे दुष्परिणामही आहेत. खरंतर कोणत्याही भाषेचा द्वेष न करता आपल्या देशात हिंदी, स्थानिक भाषा, व इंग्रजी भाषेचे शिक्षण देणे गरजेचे आहे, असे त्यांनी सांगितलं.

देशात आणीबाणी सारखी स्थिती

मागील राजकीय पिढीचा विचार केला तर अधिवेशनात येणारी विधेयक चर्चेतून किंवा विरोधकांची मत घेवून पास केली जायची. आता मात्र विधेयकावर चर्चा करणे ही चुकीची गोष्ट वाटत असावी. यावेळच्या पावसाळी अधिवेशनात केवळ एका विधेयकावर चर्चा करण्यात आली आहे. राजकारण म्हटलं की वैचारिक मतभेद आलेच, मात्र यातही स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांच्या शिवकणीतून आपली राजकीय नाती कशी जपावी ही गोष्ट महाराष्ट्राने अजूनही पाळली आहे. आणीबाणी हा काळ आपल्या कोणालाच आवडणारा नव्हता. तशीच परिस्थिती आज देशात पहायला मिळत आहे. केंद्रातील संस्थेचा गैरवापर होतोय, मीडियावर वचक ठेवला जातोय. या सगळ्या गोष्टी मला आपण कपड्याने लिब्रल झालो पण विचाराने लिब्रल झालेलो नाही हे दाखवत आहेत, असं त्या म्हणाल्या.

पर्यावरण हा गंभीर विषय

पर्यावरण हा विषय अतिशय गंभीर आहे. यासाठी खरंतर देशातले लोकप्रतिनिधीच जबाबदार आहेत. कचरा, पाण्याचे नियोजन, प्लास्टिक अशा अनेक गोष्टीतून पर्यावरणाची हानी होत आहे. याचे सुनियोजन करणे जरुरी आहे. भारतीय नागरिक आपले घर अतिशय स्वच्छ ठेवतील मात्र घराबाहेर गेल्यावर पर्यावरण स्वच्छ ठेवणे कोणालाही जमत नाही. पर्यावरण हे खातं फार हलके आहे असा सगळ्यांचा समज आहे. मात्र सद्यस्थितीला पर्यावरण या खात्याकडे मोठी जबाबदारी आहे. यासाठी पर्यावरणाच्या दृष्टीने शहर व ग्रामीण भागाचे योग्य नियोजन करायला हवे, असं त्यांनी सांगितलं. (india needs to big change, says supriya sule)

संबंधित बातम्या:

वे डरते हैं कि, एक दिन निहत्थे और ग़रीब लोग उनसे डरना बंद कर देंगे; जयंत पाटलांचा कवितेतून भाजपवर हल्लाबोल

धनंजय मुंडे म्हणाले होते, आमच्या बहिणीने तर चिक्कीचे पैसे खाल्ले, आता हायकोर्ट म्हणतं अजून FIR का नाही?

भागवतराव कराडांची बरोबरी करण्याचं सोडाच, पण इम्तियाज जलीलही चंद्रकांत खैरेंपेक्षा उजवे आहेत; भाजप आमदाराचा पलटवार

(india needs to big change, says supriya sule)

Follow Us
अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
Anna Hazare | अण्णा हजारे विद्यार्थ्यांसाठी मैदानात, उद्या आंदोलन करणार
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले
हे आंदोलन तर बेजबाबदारपणा, एकनाथ शिंदेंची राहुल गांधींवर टीका; म्हणाले आंदोलनाची जागा...
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
देशाची बदनामी होऊ नये याचा विचार करा, CM फडणवीसांचे आंदोलकांना आवाहन
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर..
आम्हाला कोणतेही व्हिडिओ पाहायचे नाहीत; जंतर-मंतर लाठीचार्ज प्रकरणावर सुप्रीम कोर्टाचा सुनावणीला तात्काळ नकार
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलीस...
हे सरकार हटवा, आम्ही वर्दीत आहोत; राहुल गांधींना फरफटत नेताना पोलिसांने कानात काय सांगितलं?
152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त!
Rahul Gandhi | 152 पेपरफुटी, 5 कोटी विद्यार्थ्यांचं भविष्य उद्ध्वस्त! राहुल गांधींचा मोदी सरकारवर घणाघात
तोंडातून रक्त येत होतं अन्,.. स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटके
तोंडातून रक्त येत होतं अन्... स्वतः राहुल गांधींंनीच सांगितलं, अटकेवेळी नेमकं काय घडलं?
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार
Aashish Jaiswal | धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्याच्या मागणीवर आशिष जैस्वालांचा पलटवार; म्हणाले थेट संबंध नाही...
ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी
Arvind Sawant | ओमराजेंसह सर्व फुटीर खासदारांना... ठाकरे गटाने कोर्टात धाव घेताच मोठी अपडेट समोर
राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश...
Ameet Satam | राहुल गांधींना अमित साटमचं थेट चॅलेंज! पासपोर्ट दाखवा, परदेश दौऱ्यांचा हिशेब द्या
मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी.

मोठी बातमी! दिल्लीत राडा… तलवार फिरवली, आदोलकांकडून पोलिसांवर दगडफेक; दोन अधिकाऱ्यांसह अनेकजण जखमी

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती.

धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेणार का? जे पी नड्डा यांचं थेट उत्तर, दिली सर्वात मोठी माहिती

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ.

आता एकाही जहाजावर हल्ला केला तर आम्ही थेट…, डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी, जगभरात खळबळ

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या.

मोठी बातमी! जंतर मंतरवर पुन्हा मोठा गोंधळ, पोलिसांकडून लाठीचार्ज, आश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा.

Commonwealth Games 2026 स्पर्धा 23 जुलैपासून, 74 देश रणांगणात; भारताचे 126 खेळाडू करणार स्पर्धा

घशात अन्न अडकलं अन् अचानक श्वास बंद, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत भयंकर प्रकार; काय घडलं?.

घशात अन्न अडकलं अन् अचानक श्वास बंद, प्रसिद्ध अभिनेत्यासोबत भयंकर प्रकार; काय घडलं?