AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

भाजप नेत्यांवरील ईडी कारवाईचं काय झालं?, राष्ट्रवादी जाब विचारणार; ईडी कार्यालयावर धडकणार

ईडीने राज्यभरात कारवाया सुरू केलेल्या असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसने ईडीच्या कार्यालयावर धडक देण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप नेत्यांवर ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यांचं काय झालं?

भाजप नेत्यांवरील ईडी कारवाईचं काय झालं?, राष्ट्रवादी जाब विचारणार; ईडी कार्यालयावर धडकणार
नवाब मलिक
| Edited By: | Updated on: Nov 11, 2021 | 6:32 PM
Share

मुंबई: ईडीने राज्यभरात कारवाया सुरू केलेल्या असतानाच आता राष्ट्रवादी काँग्रेसने ईडीच्या कार्यालयावर धडक देण्याचा निर्णय घेतला आहे. भाजप नेत्यांवर ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यांचं काय झालं? भाजप नेत्यांची चौकशी का केली नाही? त्यांना कोर्टात का उभं केलं नाही? असा जाब विचारण्यासाठी राष्ट्रवादीचं एक शिष्टमंडळ ईडीच्या कार्यालयात जाणार आहे. पक्षाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी दिली आहे.

नवाब मलिक यांनी आज पत्रकार परिषद घेतली होती. यावेळी त्यांनी ही माहिती दिली. भाजपच्या अनेक नेत्यांवर ईडीने कारवाई केली होती. मात्र त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यावर त्यांच्यावरील कारवाई थांबवण्यात आली होती. या सर्व प्रकरणाची माहिती राष्ट्रवादीकडून गोळा करण्यात आली आहे. ही संपूर्ण यादी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे मंत्री, नेते ईडीच्या कार्यालयात जाऊन देणार आहेत. तसेच भाजप नेत्यांवरील कारवाईला गती का देत नाही? हे तपास का थांबले आहेत? याची माहिती घेणार आहेत, असे मलिक यांनी सांगितलं. ईडीला सहकार्य करण्यासाठी सगळी माहिती गोळा झाली आहे. ज्यांच्यावर तक्रारी दाखल आहेत, त्या गतीमान करा असे आवाहनही ईडी अधिकार्‍यांना करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

भानुशाली फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये काय करत होता?

दरम्यान, गुजरातमध्ये पकडण्यात आलेल्या ड्रग्जवरूनही त्यांनी भाजपला घेरलं. समुद्रमार्गे गुजरातमधून देशभरात ड्रग्जचा व्यापार चालतोय हे आता सिद्ध होतेय. त्यामुळे याच्यामागे कोण आहे याचा खुलासा एनसीबी आणि एनआयए यांनी करावा, अशी मागणी त्यांनी केली. काल गुजरातच्या द्वारका येथे 350 कोटीचे ड्रग्ज सापडले होते. त्याआधी मुंद्रा एअरपोर्टवर तीन टन ड्रग्ज सापडले होते. त्याची किंमत 27 हजार कोटी रुपये होती. या ड्रग्जच्या खेळात मनिष भानुशाली, धवल भानुशाली, केपी गोसावी, सुनिल पाटील हे किरीट सिंग राणा यांच्याकडे वारंवार का जात आहेत? हे सगळे गुजरातच्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये कशासाठी राहत आहेत?, असे सवालही त्यांनी केले.

सत्य शोधणे ही एनसीबीची जबाबदारी

मुंद्रा एअरपोर्टवरील ड्रग्ज प्रकरण एनआयएकडे सोपविण्यात आले आहे. आता द्वारका येथे 350 कोटीचे ड्रग्ज सापडल्यानंतर यातून सत्यबाहेर काढण्याची एनसीबीची जबाबदारी आहे. या देशातून अमली पदार्थाचा व्यापार नेस्तनाबूत करण्यासाठी 1985 मध्ये कायदा करण्यात आला होता. त्याची अमलबजावणी करावी, अशी मागणीही त्यांनी केली.

कितीही मोठा माणूस असू द्या, कारवाई करा

मुंबईत दोन – चार ग्रॅम ड्रग्ज पकडून बॉलिवूडला बदनाम करुन प्रसिद्धी करण्यात येत आहे. पण गुजरातमध्ये तर समुद्रमार्गे ड्रग्ज येत आहेत. मनिष भानुशाली, धवल भानुशाली व त्यांचे इतर सहकारी गुजरातमधून हे ड्रग्जचं रॅकेट सांभाळत आहेत. त्यामुळे या तपासाचा छडा एनसीबी व एनआयए यांनी लावावा. मग यामध्ये कोण कितीही मोठा असो, मंत्री असो किंवा कार्यकर्ता हे न पाहता ड्रग्जच्या खेळाला जो कुणी जबाबदार असेल त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला शिक्षा झालीच पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

संबंधित बातम्या:

वक्फ बोर्डात मी क्लिन अप मोहीम राबवली, ईडीच्या चौकशीचं स्वागत, बातम्या पेरल्या तरी लढा थांबणार नाही: नवाब मलिक

Kangana Ranaut: ‘या विचारसरणीला वेडेपणा म्हणावे की देशद्रोह?’, भाजप खासदार वरुण गांधींची कंगनावर जोरदार टीका

VIDEO: संजय राऊतांना बॉर्नविटा पिण्याची गरज; चंद्रकांत पाटलांची खोचक टीका

Follow Us
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा
जे कोणाचेच नाहीत, ते कुणाचे राहणार?पवारांचा बड्या नेत्यांवर थेट निशाणा.
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं...
भोंदू खरातला लागली लॉट्री, तुरुंगात असातानाच मिळणार 3 कोटी, नेमकं....
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण...
मोठी बातमी! मराठा आरक्षणासाठी पुन्हा आमरण उपोषण....
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर.......
मुख्यमंत्रीच सर्वेसर्वा तर मग जबाबदार कोण? जरांगेंचा फडणवीसांवर........
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?
होय मी झुरळ आहे आणि मी झुरळच राहणार; अंजली दमानिया असं का म्हणाल्या?.
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार...
मोठी बातमी! मनोज जरांगे पाटलांचा मराठ्यांसाठी एल्गार, सरकार वारंवार....
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल
8 महिने गेले, कुणबी प्रमाणपत्र कुठे? जरांगेंचा सरकारला जळजळीत सवाल.
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत
मला लाथ मारून हाकलण्याचा...NCPच्या आणखी एका नेत्याने बोलून दाखवली खंत.
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल
परीक्षा रद्द, स्वप्नं उद्ध्वस्त; 3 विद्यार्थ्यांनी उचललं टोकाचं पाऊल.
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात..
मिसिंग लिंकवर मृत्यूचा थरार; बसची वाहनांना जोरदार धडक आणि क्षणार्धात...