AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Nitesh Rane on raza academy : रझा अकादमीच्या इफ्तारला पोलीस आयुक्तांना हजर राहायला सांगणं हा सरकारी आदेश नाही ना?; नितेश राणे यांचा सवाल

मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे हे रझा अकादमीने आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीला उपस्थित राहिले होते. त्यावरून आता राजकारण रंगताना दिसत आहे.

Nitesh Rane on raza academy : रझा अकादमीच्या इफ्तारला पोलीस आयुक्तांना हजर राहायला सांगणं हा सरकारी आदेश नाही ना?; नितेश राणे यांचा सवाल
रझा अकादमीला पोलीस आयुक्तांना हजर राहायला सांगणं हा सरकारी आदेश नाही ना?; नितेश राणे यांचा सवालImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 18, 2022 | 1:06 PM
Share

मुंबई: मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे (sanjay pandey) हे रझा अकादमीने (raza academy ) आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीला उपस्थित राहिले होते. त्यावरून आता राजकारण रंगताना दिसत आहे. रझा अकादमीने आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीला हजर राहण्याचे पोलीस आयुक्तांना सरकारी आदेश तर नव्हते ना? असा सवाल भाजपचे नेते नितेश राणे (nitesh rane) यांनी केला आहे. तसेच पोलीस आयुक्त रझा अकादमीच्या इफ्तार पार्टीला हजर राहिल्याने संताप व्यक्त केला आहे. हीच ती रझा अकादमी ज्यांनी हुतात्मा स्मारकाची मोडतोड केली. महिला पोलिसांवर हल्ले केले. भिवंडीत महिला पोलीस अधिकाऱ्यांना मारलं. नांदेड, मालेगावसारख्या ठिकाणी दंगली भडकवल्या. कायम देशाविरोधात भूमिका घेणाऱ्या रझा अकादमीच्या इफ्तारला मुंबईचे पोलीस कमिश्नर जातातच कसे? असा संतप्त सवालही त्यांनी केला आहे.

नितेश राणे यांनी मीडियाशी संवाद साधताना आणि ट्विटरवरून हा संताप व्यक्त केला आहे. ज्या ‘रझा अकादमीने’ आझाद मैदानात अमर जवान मूर्ती तोडली. महिला पोलिस भगिनींशी गैरवर्तन केले अशा देशविरोधी कृती करणाऱ्यांच्या इफ्तारमध्ये सामिल होऊन त्यांना अधिकृतरित्या प्रोत्साहित करणे हे महाविकास आघाडीचं धोरण राबविण्याचा अधिकाऱ्यांवरती दबाव आहे का?, असा सवाल नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ट्विटरवरू केला आहे.

पोलिसांचा तो फोटो ट्विट

एकीकडे गृहमंत्री सभागृहात रझा अकादमीवर बंदी घालण्याचा विचार करत आहोत अस सांगत असतात. तर दुसरीकडे त्यांचे अधिकारी रझा अकादमीच्या इफ्तारला हजर राहतात. हा सरकारी आदेश म्हणावा का?, असा सवालही त्यांनी केला आहे. नितेश राणे यांनी रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांसोबतचा पोलीस आयुक्तांचा एक फोटोही ट्विट केला आहे.

हिंदू किती सुरक्षित हे मुख्यमंत्र्यांनी सांगावं

या आधी नितेश राणे यांनी ठाकरे सरकार हिंदू विरोधी असल्याचा आरोप केला होता. आम्ही वारंवार सांगतोय हे महाविकास आघाडीचे सरकार हिंदू विरोधी आहे. याचे असंख्य पुरावे दाखण्याचा प्रयत्न करतोय हे सरकार हिंदू विरोधी आहे. या महाराष्ट्रमध्ये हिंदूने जगले पाहिजे का? आम्हाला प्रत्येक वेळी अडवे जात असाल तर हिंदू किती सुरक्षित आहे हे मुख्यमंत्र्यांनी संगितले पाहिजे, असं ते म्हणाले होते.

हिंदूंच्या बाजूने बोलणे गुन्हा आहे का?

या राज्यात हिंदूंच्या बाजूने बोलणे गुन्हा आहे का? शक्ती कायदा कशासाठी आणलाय? तीन महिने एखादी महिला सापडत नसेल तर या कायदा काय करायचा? आम्ही कोणत्या धर्मा विरोधात नाही. मात्र आम्ही हिंदू सण, मिरवणुका काढायच्या नाही का? बाळासाहेबांचा मुलगा मुख्यमंत्री असतांना नगरमध्ये पाकिस्तानच्या घोषणा दिल्या जात आहे, असंही ते म्हणाले.

संबंधित बातम्या:

Raj Thackeray Effect : राज ठाकरे इफेक्ट, नाशिकचा पॅटर्न महाराष्ट्रभर राबवण्याची तयारी, गृहमंत्र्यांची डीजींसोबत बैठक, एसपी, आयुक्तांना आदेश

Kishori Pednekar: राज ठाकरेंना एवढंच सांगेन, जागते रहो, नाही तर निवडणुका आल्यावर…; किशोरी पेडणेकरांचा टोला

PNB Scam: नाशिकमध्ये चोकसीची जमीन विक्री आयकरने थांबवली; अनेक जण रडारवर, प्रकरण काय?

Follow Us
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने...
ठाकरेंना विधानपरिषद हवी असेल तर...नरेश म्हस्केंच्या त्या विधानाने....
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांचा शपथविधी.
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू
आखाती युद्धाचा भारतावर परिणाम; देशात ESMA कायदा लागू.
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार
मुंबईनंतर आता ठाण्यातही इलेक्ट्रिक डबल डेकर बस धावणार.
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.