AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाविकास आघाडीत बिघाडी? काँग्रेस आणि ठाकरे गटात सारं काही आलबेल नाही?

विधान परिषदेच्या निवडणुकीत ठाकरे गटाने परस्पर उमेदवार दिल्याने काँग्रेसमध्ये नाराजी आहे. कोकण आणि नाशिकच्या जागेवरील उमेदवार मागे घ्या, अशी मागणी काँग्रेसने ठाकरे गटाकडे केली आहे.

महाविकास आघाडीत बिघाडी? काँग्रेस आणि ठाकरे गटात सारं काही आलबेल नाही?
नाना पटोले आणि उद्धव ठाकरे
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Jun 11, 2024 | 5:07 PM
Share

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस हा महाराष्ट्रातला सर्वात मोठा पक्ष ठरला. काँग्रेसला महाराष्ट्रात सर्वाधिक 13 जागांवर यश मिळालं. त्यापाठोपाठ महाविकास आघाडीत ठाकरे गटाला 9 आणि शरद पवार गटाला 8 जागांवर यश मिळालं. या निवडणुकीनंतर महाविकास आघाडीच्या नेत्यांचा आत्मविश्वास निश्चितच वाढला आहे. असं असलं तरी काँग्रेस आणि ठाकरे गटात सध्या सारं काही आलबेल नाही, असं चित्र बघायला मिळत आहे. विशेष म्हणजे विधान परिषदेच्या निवडणुकीमुळेच काँग्रेस आणि ठाकरे गटात आलबेल नाही का? असा प्रश्न आता निर्माण होतोय. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंना फोन केले. पण त्यांच्याशी संपर्क झाला नाही, असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले आहेत. ठाकरे गटाकडून विधान परिषदेच्या चारही जागांसाठी उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.

ठाकरे गटाने परस्पर उमेदवार दिल्याने काँग्रेसमध्ये नाराजी आहे. कोकण आणि नाशिकच्या जागेवरील उमेदवार मागे घ्या, अशी मागणी काँग्रेसने ठाकरे गटाकडे केली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीत उद्धव ठाकरेंनी परस्पर उमेदवार जाहीर केले, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. त्यामुळे ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये सारं काही आलबेल नाही, असं स्पष्ट होत आहे.

नाना पटोले आणखी काय म्हणाले?

याबाबत राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण येऊ नये म्हणून नाना पटोले यांनी सारं काही आलबेल आहे, असं सूचित करण्याचा प्रयत्न केला. “कोणतीही नाराजी नाही किंवा मतभेद नाहीत. सर्व खासदार त्यांना भेटत आहेत. सर्वांसोबत चर्चा होत आहे. चर्चा तर होईलच, चर्चा का नाही होणार. उद्धव ठाकरे यांच्यासोबत अजून बातचित झालेली नाही. बातचित नक्की होईल. महाविकास आघाडी म्हणून आम्ही काम करु. सर्वांनी एकत्रित चर्चा करुन विधान परिषदेच्या उमेदवारांबाबत चर्चा व्हावी, अशी आमची इच्छा होती”, अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली.

विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदान कधी?

विधान परिषदेच्या मुंबई आणि कोकण पदवीधर तसेच मुंबई आणि नाशिक शिक्षक या चार मतदारसंघांसाठी येत्या 26 जूनला मतदान होणार आहे. याआधी ही तारीख 7 जून होती. पण शाळांना सुट्टी असल्याच्या कारणास्तव शिक्षक संघटनांनी मतदानाची तारीख पुढे ढकलण्याची विनंती केली होती. या निवडणुकीसाठी आता प्रत्येक पक्ष कंबर कसताना दिसत आहेत.

Follow Us
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही..
पार्थ पवारांनी भेट घेताच फडणवीसांनी दिली मोठी माहिती; म्हणाले, आम्ही...
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी..
शरद पवार- प्रफुल्ल पटेल भेटीची इनसाईड स्टोरी, खरंच पार्थ पवारांविषयी...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्...
अंगावर काटा आणणारा अपघात, कार थेट 35 फूट खोल विहिरीत; ब्रेक फेल अन्....
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?
अभिनेत्री उषा चव्हाणांनी जीवनगौरव पुरस्कार केला परत, नेमकं कारण काय?.
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात....
चांदीच्या आयातीवर निर्बंध, आता सराफा बाजारात चिंता वाढली, भविष्यात.....
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार
कल्याण हादरलं! रेल्वे स्थानकात 14 वर्षांच्या मुलीवर अत्याचार.
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत....
अजित पवार गटात फुटीचे संकेत? तुटलेली मनं जुळणार नाहीत.....
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण
भोर तालुक्यात निसर्गाचा रुद्रावतार; नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण.
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात...
फक्त तटकरेच नाही, प्रफुल्ल पटेलही शरद पवारांच्या भेटीला; राजकारणात....
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत
ऐटीत चालणाऱ्या वाघाने वेधलं लक्ष; बोर व्याघ्र प्रकल्पातील VIDEO चर्चेत.