AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

अजित पवार यांचा दिल्ली दौरा नेमका कशासाठी? प्रफुल्ल पटेल यांच्याकडून आतली बातमी

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आज दिल्लीत दाखल झाले आहेत. अजित पवार यांच्या या दिल्ली दौऱ्याबाबत प्रफुल्ल पटेल यांनी सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भूमिका मांडली.

अजित पवार यांचा दिल्ली दौरा नेमका कशासाठी? प्रफुल्ल पटेल यांच्याकडून आतली बातमी
Chetan Patil
Chetan Patil | Updated on: Jul 12, 2023 | 9:06 PM
Share

मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल हे सध्या दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. त्यांच्यासोबत मंत्री हसन मुश्रीफ हे देखील दिल्लीला गेले आहेत. उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अजित पवार हे पहिल्यांदाच दिल्ली दौऱ्यावर गेले आहेत. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटप याबाबत तिढा सुटत नसल्याने अजित पवार दिल्लीत भाजपच्या ज्येष्ठ नेत्यांच्या भेटीसाठी गेल्याची माहिती मिळत आहे. या भेटीत मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटपाच्या तिढ्यावर मार्ग निघण्याची शक्यता आहे. दरम्यान, दिल्लीत दाखल झाल्यानंतर प्रफुल्ल पटेल यांनी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्या दिल्ली दौऱ्याचं कारण सांगितलं.

“राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरकारमध्ये सामील झाल्यापासून दिल्लीत अजित पवार, माझी आणि भाजपचे पक्षश्रेष्ठी यांच्यासोबत आमची भेट झालेली नव्हती. त्यामुळे आज एक औपचारिक भेट होणार आहे”, असं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं. तसेच आपण केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची औपचारिक भेट घेणार असल्याची माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली. तसेच मंत्री हसन मुश्रीफ हे त्यांच्या वैयक्तिक कामानिमित्ताने दिल्लीत आले आहेत. ते आमच्यासोबत कुठेही येणार नाहीत, असंही पटेल यांनी यावेळी स्पष्ट केलं.

‘मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आमच्यात कुठलाही वाद नाही’

“मंत्रिमंडळ विस्ताराबाबत आमच्यात कुठलाही वाद नाही. जवळपास सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या आहेत. आजच्या भेटीत मंत्रिमंडळ आणि खातेवाटपाचे विषय चर्चेत येणार नाहीत. आम्हीसुद्धा टीव्ही पाहतोय. जे टीव्हीवर चाललंय तसं वास्तव्यात नाही”, अशी प्रतिक्रिया पटेल यांनी दिली.

“काही खाते भाजप आणि शिवसेनेकडे आहेत. याबाबत चर्चा सुरु आहे. याबाबत काल रात्री सखोल चर्चा झाली आहे. याबाबत कोणताही वाद नाही. उद्या किंवा परवा तुम्हाला खातेवाटप झालेलं दिसेल”, अशी माहिती प्रफुल्ल पटेल यांनी दिली.

“केंद्राच्या विषयी आम्ही अजिबात चर्चा केलेली नाही. मुंबईच्या विषयी स्वभाविक आहे. कारण आम्ही सरकारमध्ये सामील झालो आहोत. आज औपचारिक एक भेट आहे. एक शिष्टाचार असतो, ज्यांच्याबरोबर आम्ही आलो त्यांच्यासोबत चहा तरी घ्यावा आणि औपचारिक भेट घ्यावी”, असं प्रफुल्ल पटेल म्हणाले.

‘पंतप्रधान मोदींना 18 तारखेला भेटणार’

“आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत आता भेट होणार नाही. एनडीएची 18 जुलैला बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीचं निमंत्रण मला आणि अजित पवार आम्हा दोघांना आलेलं आहे. आम्ही स्वभाविकपणे त्या बैठकीला हजर राहणार आहोत. तेव्हा आमची दोघांची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत भेट होईल”, असं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं.

‘राजपाल नियुक्त 12 आमदारांमध्ये आमचाही समावेश असेल’

“आम्ही सरकारमध्ये सामील झालो आहोत. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत आमचा वाटा असेल. त्यामुळे राज्यपाल नियुक्त 12 आमदारांमध्ये आमचा वाटा असेलच”, असं पटेल म्हणाले. “आम्ही इथे कोणताही मुद्दा घेऊन आलेलो नाहीत. मुद्दे असतील तर आम्ही सरकारमध्ये का सहभागी झालो असतो? आम्ही एक राजशिष्टाचार म्हणून इथे आलो आहोत”, असंही पटेल यावेळी म्हणाले.

“मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार आणि माझी भेट झाली. आमची काल भेट झाली. त्यावेळी आमची सविस्तर चर्चा झाली. सर्व गोष्टी क्लिअर आहेत”, असा पुनरुच्चार त्यांनी केला.

“सरकार आधीपासून स्थापन झालेलं आहे. त्यामध्ये आम्ही आता सहभागी झालो आहोत. खातेवाटप आधीच झालेलं आहे. त्यामुळे आता आम्ही सत्तेत सहभागी झाल्याने त्यांच्या मंत्र्यांकडे असणारे काही खाती आमच्याकडे येतील. तर त्या मंत्र्याला दुसरं कुठलं खातं द्यायचं हे काम होणार आहे. या कामाला दोन ते दिवस लागतातच. सर्व व्यवस्थित आणि चांगल्याप्रकारे सुरु आहे. पुढच्या दोन दिवसात सर्व चित्र महाराष्ट्र आणि मुंबईत स्पष्ट होईल”, असं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं.

Follow Us
शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल
Nagpur Farmer | शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! नागपूरच्या शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल चर्चेत, व्हिडिओ होतोय व्हायरल
राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे...
Rahul Gandhi | राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे परराष्ट्र धोरण नाही म्हणत मोदींवर निशाणा
शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
तू तेव्हा वाचला आहेस, आता वाचणार नाहीस! शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल
MNS Protest | केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल; आंदोलन पेटलं
हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Ramp Walk | हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! आत्मसमर्पित महिला नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन....
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन; रेशीम उद्योगाला मिळणार नवी झेप
राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
Supriya Sule | राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाल्या...
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मुदतवाढ नाही; १५ ऑगस्ट डेडलाईन
प्रताप सरनाईक: अमराठी रिक्षा-टॅक्सी चालकांना मुदतवाढ नाही, १५ ऑगस्ट अंतिम तारीख
धीरज परदेशी हत्या प्रकरणात पोलिसांकडून दिशाभूल केल्याचा जगतापांचा आरोप
धीरज परदेशी हत्या प्रकरण: तपासात पोलिसांकडून दिशाभूल केल्याचा संग्राम जगतापांचा आरोप