AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आजच्या ‘भारत बंद’ला पाठिंबा आहे का? प्रकाश आंबेडकर म्हणतात…

बहुजन क्रांती मोर्चाकडून आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे. मात्र, याबाबत आपल्याला काहीच कल्पना नसल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे.

आजच्या 'भारत बंद'ला पाठिंबा आहे का? प्रकाश आंबेडकर म्हणतात...
| Updated on: Jan 29, 2020 | 2:46 PM
Share

मुंबई : बहुजन क्रांती मोर्चाकडून आज भारत बंदची हाक देण्यात आली आहे. मात्र, याबाबत आपल्याला काहीच कल्पना नसल्याची माहिती वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिली आहे. “भारत बंदबाबत कोणत्याही प्रकारची माहिती पत्रामार्फत कार्यालयात आलेली नाही. त्यामुळे भारत बंद आहे की नाही? याची जाणीवही आम्हाला नाही”, असं स्पष्टीकरण प्रकाश आंबेडकर यांनी दिलं आहे.

दरम्यान, बहुजन क्रांती मोर्चाच्या ‘भारत बंद’चे काहीसे पडसाद महाराष्ट्रात पडताना दिसत आहेत. मुंबईत आज सकाळी कांजूरमार्ग रेल्वे स्थानकाजवळ काही आंदोलकांनीनी ‘रेल रोको’ आंदोलन केले. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाली होती. मात्र, रेल्वे पोलीस घटनास्थळी दाखल झाल्याने 15 ते 20 मनिटांनंतर मध्य रेल्वेची वाहतूक सुरु झाली.

बहुजन क्रांती मोर्चाकडून भारत बंदच्या पार्श्वभूमीवर देशातील व्यापारी, दुकानदार आणि सर्वसामान्य नागरिकांना बंद पाळण्याचे आवाहन करण्यात आलं होतं. मात्र, राज्यातील काही व्यापारी संघटनांनी बंद पाळण्यास नकार दिला आहे. व्यापारी संघटनांनी स्थानिक पोलीस ठाणे आणि जिल्हाधिकारी कार्यालयांना निवेदन पाठवून सुरक्षेची जबाबदारी घेण्याची विनंती केली होती. दरम्यान, राज्यात बंदच्या पार्श्वभूमीवर कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून संवेदनशील भागात अधिक लक्ष देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी कायद्याविरोधात वंचित बहुजन आघाडीकडून 24 जानेवारी रोजी महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती. यावेळी प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांना शांततेत बंद पाळण्याचे आदेश दिले होते. याशिवाय संध्याकाळी 4 वाजता प्रकाश आंबेडकर यांनी बंद मागे घेतला होता. त्यानंतर आज बहुजन विकास आघाडीकडून नागरिकत्व दुरुस्ती कायदा आणि राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी कायद्याविरोधात बंद पुकारण्यात आला आहे. यावर प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

Follow Us
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का
बुलढाण्यातील चिखली विधानसभा मतदारसंघात काँग्रेसला धक्का.
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये...
इराण–इस्त्रायल युद्धाचा परिणाम; घरगुती गॅस सिलिंडर महाग,महिलांमध्ये....
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले
युद्धामुळे शिपिंग सेवा ठप्प; JNPA बंदरावर 1500 कंटेनर अडकले.
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त
शरद पवार यांच्यापेक्षा पार्थ पवार यांची संपती जास्त.
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?
रोहित पवारांशी संबंधित साखर कारखान्याच्या प्रदूषणामुळे विमान अपघात?.
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला
अधिवेशनात एक दोन दिवस येतात, मीडियासमोर... शिरसाटांचा ठाकरेंना टोला.
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान
मविआचा निर्णय आम्ही योग्य वेळी घेऊ; संजय राऊत यांचं मोठं विधान.
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग
गॅस सिलेंडर दरवाढीचा फटका; घरगुती सिलेंडर 60 रुपयांनी महाग.
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह
कर्जमाफीच्या घोषणांवर राऊतांची टीका; अर्थसंकल्पावर प्रश्नचिन्ह.
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम
परळीतील महादेव मुंडे हत्या प्रकरणावरून राजकीय वातावरण गरम.