AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra Bhushan : हे प्रशासनाला कळालं नाही का? श्री सदस्यांच्या मृत्यूवर राज ठाकरे यांचा सरकारला सवाल

महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्या दरम्यान उष्माघाताने मृत्यू झालेल्या श्री सेवकांच्या निधनावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे. पण त्यांनी प्रशासनाला देखील धारेवर धरलं आहे.

Maharashtra Bhushan : हे प्रशासनाला कळालं नाही का? श्री सदस्यांच्या मृत्यूवर राज ठाकरे यांचा सरकारला सवाल
| Updated on: Apr 17, 2023 | 12:39 PM
Share

मुंबई : महाराष्ट्र भूषण पुरस्कार ( Maharashtra Bhushan Award ) सोहळ्यात 11 श्री सदस्यांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे. या कार्यक्रमाला एकप्रकारे गालबोट लागल्याची भावना अनेकांनी व्यक्त केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील या घटनेवर दु:ख व्यक्त केले असून राज्य सरकारवर टीका केली आहे. राज ठाकरे यांनी सरकारला पुन्हा अशा घटना होणार नाही म्हणून काळजी घेण्याचा सल्ला देखील दिला आहे. रविवार खारघरच्या सेंट्रल पार्क येथील मैदानावर अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार देण्यात आला. यावेळी राज्यभरातून त्यांचे अनुयायी उपस्थित होते.

राज ठाकरे यांनी फेसबूक पोस्ट लिहित म्हटले की, ‘काल ज्येष्ठ निरुपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी ह्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान झाला, ही अतिशय आनंदाची बाब आहे. हा पुरस्कार जेंव्हा घोषित झाला तेंव्हा मी आप्पासाहेबांचं आणि सरकारचं अभिनंदन केलं होतं. पण ह्या सोहळ्याला जे गालबोट लागलं ते टाळता आलं नसतं का ? कधी नव्हे ते मुंबईत सुद्धा उष्माघाताच्या बातम्या वाचायला मिळत असताना, इतक्या कडाक्याच्या उन्हात हा कार्यक्रम न करता त्याची वेळ संध्याकाळची असावी हे प्रशासनाला कळलं नाही का? सरकारने जरी मृतांच्या नातेवाईकांना मदतीची घोषणा केली असली तरी इतक्यावर न थांबता अशा दुर्दैवी घटना पुन्हा होणार नाहीत आणि प्रशासन अशा चुका करणार नाही ह्याची काळजी घ्यावी.  ह्या घटनेत मृत्युमुखी पडलेल्या श्री भक्तांच्या कुटुंबियांच्या दुःखात महाराष्ट्र नवनिर्माण सहभागी आहे.’

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि विधानसभा विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांनी देखील एमजीएम हॉस्पिटलमध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. खारघर येथील पुरस्कार सोहळ्यात मृत्यूमुखी पडलेल्या श्रीसदस्यांनाही दोघांनी श्रध्दांजली वाहिली असून त्यांच्या नातेवाईकांबद्दल सहसंवेदना व्यक्त केली आहे.

Follow Us
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ
पुण्यातील हॉटेलमध्ये सिलेंडरचा तुटवडा, चुलीवर स्वयंपाक करण्याची वेळ.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे विधानसभेत महिला दिनानिमित्त निवेदन.
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत
मुंबईत घरी परतल्यावर सूर्यकुमार यादवचं जल्लोषात स्वागत.
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड
अन् अरे संसार संसार म्हणताना सुनेत्रा पवारांचा आवाज झाला जड.
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत
युद्धामुळे भाजीपाला निर्यातीवर परिणाम, दर घसरले, शेतकरी चिंतेत.
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू
पुरवठा-समतोल वितरण नियंत्रणासाठी जीवनावश्यक वस्तू कायदा लागू.
शांतता सामर्थ्यवानांची असते; राऊतांना नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर
शांतता सामर्थ्यवानांची असते; राऊतांना नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर.
लोकसभेत विरोधकांचा गदारोळ, सभागृहात जोरदार घोषणाबाजी
लोकसभेत विरोधकांचा गदारोळ, सभागृहात जोरदार घोषणाबाजी.
युद्धामुळे संभाजीनगरमध्ये एलपीजी गॅस पुरवठ्यावर परिणाम
युद्धामुळे संभाजीनगरमध्ये एलपीजी गॅस पुरवठ्यावर परिणाम.
आता सोशल मीडियावर बदनामी करणं महागात पडणार
आता सोशल मीडियावर बदनामी करणं महागात पडणार.