AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाराष्ट्रात कॅरम चुकीचा फुटला; राज ठाकरे यांनी कोणता दिला इशारा

Raj Thackeray : राज ठाकरे यांनी त्यांचा खास ठाकरी शैलीत राज्यातील राजकारणाचा समाचार घेतला. राज्यातील राजकारणावर त्यांनी तोंडसूख घेतले. राज्यातील राजकीय परिस्थितीवर त्यांनी टीका केली. महाराष्ट्रात कॅरम चुकीचा फुटल्याचा टोला त्यांनी लगावला.

महाराष्ट्रात कॅरम चुकीचा फुटला; राज ठाकरे यांनी कोणता दिला इशारा
Raj thackeray
| Updated on: Apr 09, 2024 | 9:14 PM
Share

राज ठाकरे यांनी मोदींना पाठिंबा जाहीर करत अनेक मुद्यांवर भाष्य केले. मुंबईत शिवतीर्थावर त्यांनी मनसेची राजकीय भूमिका स्पष्ट केली. महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर केला. आता यानंतर राज ठाकरे यांची तोफ प्रचार सभातून धडाडणार आहे. लोकसभेत मनसे उमेदवार देणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पण विधानसभेच्या मैदानात मनसे उतरणार असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील राजकीय परिस्थितीचा त्यांनी त्यांच्या शैलीत समाचार घेतला. महाराष्ट्रात कॅरम चुकीचा फुटलाय. कुणाच्या सोंगट्या कुणाच्या भोकात माहीत नाही माणूस राजकारणात आला की कोणत्या पक्षात असं विचारावं लागतं, असा टोला त्यांनी लगावला.

ही निवडणूक देशाचं भवितव्य ठरवणारी

सध्याच्या परिस्थितीत मोदींकडून अपेक्षा आहे. अनेक गोष्टींची अपेक्षा आहे. या देशाची निवडणूक देशाचं भवितव्य ठरवणार आहे. आपण खड्ड्यात जाणार की वर जाणार. उद्या अनेक निवडणुका येतील. आज हाणामाऱ्या सुरू आहेत. विधानसभा निवडणुकीत काय होईल. कोथळे बाहेर काढतील. याचं कारण महाराष्ट्रात कॅरम चुकीचा फुटलाय. कुणाच्या सोंगट्या कुणाच्या भोकात माहीत नाही माणूस राजकारणात आला की कोणत्या पक्षात असं विचारावं लागतं, असा टोला त्यांनी हाणला.

व्याभिचाराला मान्यता देऊ नका

  • या महाराष्ट्रातून पुढे जाताना आपल्याला मार्ग काढायचा आहे. आपल्या महाराष्ट्र सैनिकांवर विश्वास आहे. आपण योग्य मार्ग दाखवू. माझी महाराष्ट्राला अपेक्षा आहे. मतदारांकडूनही अपेक्षा आहे. कृपा करून व्याभिचाराला राज मान्यता देऊ नका. ज्या प्रकारचं राजकारण सुरू आहे. त्याला राजमान्यता मिळाली तर पुढचे दिवस भीषण आहेत, असा इशारा त्यांनी दिला.
  • आजच्या परिस्थितीत मी पाहतो. तेव्हा पुढच्या ५० वर्षाचा विषय़ करायचा असतो. पण मी बसलो तेव्हा सीएम आणि फडणवीस यांच्याशी बोललो. म्हटलं वाटाघाटीत पाडू नका. मी तुम्हाला आज सांगतो. राज्यसभा नको आणि विधान परिषद नको. पण या देशाला चांगल्या नेत्याची गरज आहे. त्याच्याकडून अपेक्षा आहे. त्या पूर्ण झाल्या नाही तर राज ठाकरेंचं तोंड आहे. मला काही अपेक्षा नाही.

तरुण हेच फ्युचर

जगात सर्वात तरुण देश आपला देश आहे. जपान ना , अमेरिका. फक्त भारत तरुण आहे. या तरुणांना तरुणींना चांगल्या शिक्षणाची गरज आहे. तंत्रज्ञानाची गरज आहे. व्यवसायाची गरज आहे. मार्गदर्शनाची गरज आहे. त्यासाठी सरकारने काम केलं पाहिजे. १८ वर्ष निघून गेली. उरली १० वर्ष. दहा वर्षानंतर हा देश पुन्हा वयस्कर होणार. मोदींना विनंती आहे, भारतातील तरुणांकडे लक्ष द्या. हेच ते फ्युचर आहे. भविष्य आहे.

तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक
तपोवन वृक्षतोडीविरोधात मनसे नाशिककरांच्या सोबतीला, चित्रपट सेना आक्रमक.
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?
फडणवीस सरकारच 1 वर्ष, मुख्यमंत्र्यांना किती मार्क? काय सांगतो सर्व्हे?.
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?
फोडाफोडीन नाराजी, वाक् युद्धानंतर आज शिंदे-रवींद्र चव्हाण एकाच मंचावर?.
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा
फडणवीसांच्या इशाऱ्याने इतर पक्ष चालतात, कुणाच्या वक्तव्याची होते चर्चा.
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?
CM सह शिंदे दादांची महत्त्वाची बैठक; पक्षांतर्गत प्रवेशबंदीवर तोडगा?.
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका
इंडिगोच्या विस्कळीत सेवेविरोधात प्रवाशांना मनस्ताप, थेट कोर्टात याचिका.
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण
रूपाली ठोंबरेंकडून बाळासाहेब अन् पवारांसोबत फोटो शेअर, चर्चांना उधाण.
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?
मुंबईत भाजपच्या महापौरामुळं कॉलर टाईट होणार! लोढांचं मोठं वक्तव्य काय?.
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी
चैत्यभूमीवर जनसागर... बाबासाहेबांच्या महापरिनिर्वाण दिनी मोठी गर्दी.
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली
डॉ. आंबेडकरांना राज्यपाल, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांकडून आदरांजली.