AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांचं राज ठाकरे यांना वर्षभरापासून साकडं काय?; राज ठाकरेंचा सर्वात मोठा दावा काय?

Raj Thackeray : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरे एकत्र येतील का? ते दिल्लीत अमित शाह यांच्या भेटीला गेल्यानंतर हा विषय माध्यमातंन अधिक चर्चिला गेला. त्याविषयीची माहिती ठाकरे यांनी दिली. त्यांना शिंदे-फडणवीस यांनी काय घातलं साकडं...

एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांचं राज ठाकरे यांना वर्षभरापासून साकडं काय?; राज ठाकरेंचा सर्वात मोठा दावा काय?
राज ठाकरे
| Updated on: Apr 09, 2024 | 8:43 PM
Share

लोकसभेच्या निवडणुकीच्या तोंडावर राज ठाकरे काय बोलणार याकडे राज्याचेच नाही तर देशाचे लक्ष लागले आहे. राज ठाकरे यांनी मुंबईतील शिवतीर्थावर, गुढीपाडवा मेळाव्यात अनेक मुद्यांना हात घातला. त्यांनी दिल्लीवारीची चर्चा केली. माध्यमातील चर्चेंना विराम देण्यासाठी गोटातील माहिती दिली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी त्यांचे गेल्या एक वर्षांपासून चांगले सूर जुळल्याचे दिसत होते. त्यावर राज ठाकरे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. शिंदे आणि फडणवीस यांनी काय साकडं घातलं हे त्यांनी स्पष्ट केले.

जागा वाटपाची चर्चा नाही

जागा वाटपाची चर्चा झाली. मी शेवटच्या जागा वाटपाच्या चर्चेला १९८५ला बसलो. त्यानंतर मी कधी चर्चेला बसलो नाही. दोन तू घे, चार मला दे. दोन तू घे. मला ते जमत नाही. माझ्याकडून होत नाही. मला ते जमणार नाही. मला सांगितलं. आमच्या निशाणीवर लढा. रेल्वे इंजिन आहे. तुमच्या कष्टाने कमावलेलं चिन्ह आहे. माझ्याकडे आयतं आलेलं नाही. सहज आलंय म्हणून लढवायचं अजिबात नाही. चिन्हावर कॉम्प्रमाईज होणार नाही. दिल्लीला गेलेले ठाकरे पहिलेच. पत्रकारांना माहीत नसतं. जुन्या गोष्टी माहीत नसतात. आताच्या गोष्टीवर रेटायचं. १९८० साली बाळासाहेब ठाकरे, दिल्लीला इंदिरा गांधी, संजय गांधींना भेटायला गेले होते. भेटायला जायला काय प्रॉब्लेम आहे. मला अनेक लोक भेटायला येत असतात. मी काय समजायचं, अनेक लोक भेटत असतात. त्यात मोठेपणा कमीपणा कुठून आला, असा सवाल करत त्यांनी अमित शाह यांच्या भेटीवर त्यांचे मत मांडले.

एकत्र येण्याचं घातलं साकडं

वर्ष दीड वर्ष झाली. मुख्यमंत्री माझ्याशी बोलतात. आपण एकत्र आलं पाहिजे. एकत्र काही तरी केलं पाहिजे. म्हटलं शी… म्हटलं काय केलं पाहिजे? असं वर्ष दीड वर्ष ऐकतोय. फडणवीस आणि शिंदे सांगत होते एकत्र आलं पाहिजे. म्हटलं म्हणजे काय. मग त्यात विषय निघाले. म्हणून अमित शाह यांना फोन केला आणि म्हटलं मला भेटायचं. काय चाललंय मला समजायचं आहे. मग आमचं बोलणं झालं, याविषयीची माहिती राज ठाकरे यांनी दिली.

कोणत्याही सेनेचा प्रमुख होणार नाही

समजलंच नाही. जाऊन दे. तो झाला भूतकाळ. त्यामुळे असल्या कोणत्याही गोष्टीवर विश्वास ठेवू नका. मी कोणत्याही शिवसेनेचा प्रमुख अध्यक्ष होणार नाही. मी जे मनसे नावाचं अपत्य जन्माला घातलंय त्याचाच मी अध्यक्ष राहणार. तुमच्या विश्वासावर पक्ष उभा केला. १८ वर्ष झाली. असली गोष्ट मनाला शिवतही नाही, असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.

Follow Us
स्वातंत्र्यादिनी लाल किल्ल्यावर घडणार इतिहास! पहिल्यांदाच...
स्वातंत्र्यादिनी लाल किल्ल्यावर घडणार इतिहास! पहिल्यांदाच... एकनाथ शिंदेंनी काय सांगितलं?
राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण?
राष्ट्रवादीत मोठा भूकंप? तटकरे जाणार, नवा प्रदेशाध्यक्ष कोण? अनिल पाटलांनी स्पष्टच सांगितलं!
हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! पवार संतापले
Rohit Pawar Tweet | हा अपघात नाही, निर्दयी व्यवस्थेने केलेला प्रशासकीय खून! आश्रमशाळेतील विद्यार्थिनींच्या मृत्यूवर रोहित पवार संतापले
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं...
मोठी बातमी! मनोज जरांगेंच्या ताफ्यातील वाहनांचा अपघात, 2- 3 वाहनं एका पाठोपाठ...
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल
मुंबईत बॅचलर्सना घर नाही? मराठी तरुणीचा थेट प्रशासनालाच सवाल, म्हणाली, आम्ही फक्त...
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
पंगतीत बसल्या अन् वरण संपलं; सुषमा अंधारेंवर कल्याण शेट्टींचा जोरदार पलटवार!
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले;
लेकीच्या रिसेप्शन दरम्यान सुळेंच्या 'त्या' कृतीकडे सगळे पाहतच राहिले; पंतप्रधानांच्या अगदी मागे उभा असलेल्या नेत्याला...
मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
Manoj Jarange | मनोज जरांगे पुन्हा आक्रमक! सरकारला थेट इशारा; चूक मान्य करा, नाहीतर...
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून ..
संजय राऊतांचा सरकारवर संताप, गडचिरोलीतील विद्यार्थिनींच्या घटनेवरून सवाल
वडापाव घ्यायला गेला अन्... पायाला धक्का लागल्याच्या वादातून मोठा घात,
मोठी खळबळ! वडापाव घ्यायला गेला अन् जीवाला मुकला... पुण्यात काय घडलं?