AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Raut on Somaiya: स्वतः शेण खाणारे दुसऱ्यांच्या तोंडाचा वास घेतात, राऊतांची सोमय्यांवर टीकेची झोड

शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, आयएनएस विक्रांतच्या पैशाचा शंभर टक्के अपहार झाला आहे. आरोपी निर्दोष सुटलेले नाहीत. ते भूमिगत झाले होते. फरार झाले होते आणि तुम्ही जर खालच्या कोर्टाचा निकाल पहाल, किंबहुना हायकोर्टातलाही निकाल पहाल. आरोपी निर्दोष नाहीत. आरोपींची कसून चौकशी व्हायला पाहिजे.

Raut on Somaiya: स्वतः शेण खाणारे दुसऱ्यांच्या तोंडाचा वास घेतात, राऊतांची सोमय्यांवर टीकेची झोड
संजय राऊत आणि किरीट सोमय्या.
| Edited By: | Updated on: Apr 14, 2022 | 11:45 AM
Share

मुंबईः जे स्वतः शेण खातात आणि दुसऱ्याच्या तोंडाचा वास घेतात, त्यांचे पितळ आता उघडे पडले आहे, असे म्हणत शिवसेना (Shiv Sena) खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी गुरुवारी मुंबईत पुन्हा एकदा भाजप नेते आणि आएनएस विक्रांत प्रकरणात संशयित असलेले किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांच्यावर टीकेच झोड उडवली. राऊत म्हणाले की, किरीट सोमय्या यांनी आपण आरोपी आहात हे विसरू नये. तुमच्यावरती आरोपपत्र आहे. तुम्ही जनतेच्या पैशाचा अपहार केलेला आहे. टीव्हीसमोर येऊन मोठ्यामोठ्याने बोलल्याने तुमचे आरोप धुवून निघत नाहीत. आणि याही पेक्षा भयंकर अशी तुमची प्रकरणे समोर येणार आहेत हे लक्षात घ्या. जे स्वतः शेण खातात आणि दुसऱ्याच्या तोंडाचा वास घेतात, त्यांचे आता पितळ उघडे पडलेले आहे. तेव्हा कोणी जर काही म्हणत असेल, तर त्यांना म्हणू द्या. आरोपीच्या आणि गुन्हेगाराच्या बोलण्यावर लोकं विश्वास ठेवत नाहीत, असा दावाही त्यांनी केला.

आंबेडकरांनी अश्रू ढाळले असते…

संजय राऊत म्हणाले की, घोटाळा 58 रुपयांचा असो की 58 कोटींचा असो. गुन्हा हा गुन्हाच असतो. सोमय्यांना न्यायालयाने अजून निरपराध ठरवले नाही. मात्र, महाराष्ट्रात एका विशिष्ट पक्षाच्या लोकांना न्यायालयात दिलासा कसा मिळतो. महाविकास आघाडीच्या लोकांना असा दिलासा का मिळत नाही. न्यायव्यवस्थेत एका पक्षाच्या विचारांची लोक आहेत, त्यामुळे असे सुरू आहे. आता आम्ही कोणाला कायदा शिकवायचा. आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. हे पाहून आज डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा अश्रू ढाळले असते, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

आरोपीने संयम बाळगावा…

राऊत म्हणाले की, आयएनएस विक्रांतच्या पैशाचा शंभर टक्के अपहार झाला आहे. आरोपी निर्दोष सुटलेले नाहीत. ते भूमिगत झाले होते. फरार झाले होते आणि तुम्ही जर खालच्या कोर्टाचा निकाल पहाल, किंबहुना हायकोर्टातलाही निकाल पहाल. आरोपी निर्दोष नाहीत. आरोपींची कसून चौकशी व्हायला पाहिजे. आरोपीला पोलीस स्टेशनला हजेरी लावलेली आहे. त्यामुळे आरोपी उगाच जास्त वचवच करू नये. तात्पुरत्या जामिनावर सुटलेल्या आरोपीने संयम बाळगायला हवा. आरोपीने कोणत्या परिस्थितीमध्ये हा जामीन मिळवलाय याबाबत लोकांच्या मनात शंका आणि संभ्रम असल्याचेही ते म्हणाले.

इतर बातम्याः

Special Report | देशातल्या सर्वात मोठ्या लेखकाची ख्यातनाम प्रकाशकांकडून लूट; कोण फोडणार पुस्तकांचा तुरुंग?

Kumar Vishvas Birth Day Special | सृजन का बीज हूँ, जाया हो नही सकता, 10 वर्ष राजकारण, हजारो वर्ष कविता!!

Lata Mangeshkar | चैतन्याची परी, सांध्यपर्वातील वैष्णवी, हृदयामधल्या निशिगंधाचे फूल; लतादीदींच्या आठवणींचा मोहक कोलाज!

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.