AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘हम साथ-साथ हैं’, शिंदे-फडणवीसांच्या मध्यस्थीनंतर रवी राणांचा सूर बदलला

"हम साथ-साथ हैं, आमचा वाद मिटलेला आहे", असं विधान आमदार रवी राणा यांनी केलं

'हम साथ-साथ हैं', शिंदे-फडणवीसांच्या मध्यस्थीनंतर रवी राणांचा सूर बदलला
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: | Updated on: Nov 01, 2022 | 12:12 AM
Share

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या चार ते पाच दिवसांपासून आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्यातील वादामुळे अनेक घडामोडी घडल्या. अखेर या प्रकरणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मध्यस्थी करावी लागली. शिंदे-फडणवीस यांनी रवी राणा आणि बच्चू कडू या दोन्ही नेत्यांना मुंबईत बोलावलं होतं. त्यानुसार हे दोन्ही नेते रविवारी मुंबईत आले त्यानंतर रात्री मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी दोघांची समजूत घातली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा या शासकीय निवासस्थानी या दोन्ही नेत्यांचं मनोमिलन करण्यात आलं. त्यानंतर आज आमदार रवी राणा यांनी दिलगिरी व्यक्त करत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. विशेष म्हणजे एकमेकांवर अतिशय खालच्या पातळीवर टीका करणारे नेते महाराष्ट्राच्या हितासाठी एकत्र आल्याचा दावा स्वत: रवी राणा यांनी केलाय. तसेच रवी राणा यांनी ‘हम साथ-साथ हैं’ असं म्हटलं आहे.

“हम साथ-साथ हैं, आमचा वाद मिटलेला आहे”, असं विधान आमदार रवी राणा यांनी केलं आहे. आमदार बच्चू कडू आणि मी आम्ही दोघांनी एकत्र येऊन वाद मिटवला आहे”, असं विधान रवी राणा यांनी केलं. “विरोधकांचं टीका करण्याचं एक कलमी काम सुरुय”, असंही ते म्हणाले.

“हम साथ-साथ हैं. कारण हे सरकार महत्त्वाचं आहे. मुख्यमंत्री-उमुख्यमंत्री महाराष्ट्रात जे काम करत आहेत, महाराष्ट्राला वेगाने पुढे नेण्याचं काम सरकार करत असेल तर त्यामध्ये असे वादविवाद नसले पाहिजेत. म्हणून आम्ही दोघांनी एकत्र येऊन हा विषय संपवला आहे. पुढे महाराष्ट्रात अनेक विकासाची कामे करायची आहेत”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

बच्चू कडू यांचं पोश्टर चर्चेत

दरम्यान, रवी राणांनी बच्चू कडू यांच्यावर खोके घेतल्याचा आरोप केल्याने प्रहार संघटनेचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. हे कार्यकर्ते उद्या आंदोलन करणार आहेत. याच आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बच्चू कडू यांचं लावण्यात आलेलं पोश्टर हे चर्चेला कारण ठरलं आहे. कारण या पोश्टरवर “मै झुकेंगा नहीं”, असं लिहिलं आहे. तसेच सोबत बच्चू कडू यांचाही फोटो पोश्टरमध्ये आहे. त्यामुळे बच्चू कडू उद्या कार्यकर्त्यांसमोर काय भूमिका मांडतात हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Follow Us
उद्धव ठाकरेंचा विधानपरिषदेचा शेवटचा दिवस, एकनाथ शिंदेंकडून शुभेच्छा
उद्धव ठाकरेंचा विधानपरिषदेचा शेवटचा दिवस, एकनाथ शिंदेंकडून शुभेच्छा.
भोंदूबाबाच्या संपत्तीबाबात फडणवीसांचा मोठा खुलासा, एकूण संपत्ती....
भोंदूबाबाच्या संपत्तीबाबात फडणवीसांचा मोठा खुलासा, एकूण संपत्ती.....
खरातकडून फोटो व्हायरल होण्याची धमकी देत पाच कोटींच्या खंडणीची मागणी
खरातकडून फोटो व्हायरल होण्याची धमकी देत पाच कोटींच्या खंडणीची मागणी.
5 नरबळी, हरणाची शिकार, अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती
5 नरबळी, हरणाची शिकार, अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती.
भोंदूबाबा अशोक खरातच्या तपासाला वेग, सरकारी वकिलांची नियुक्ती
भोंदूबाबा अशोक खरातच्या तपासाला वेग, सरकारी वकिलांची नियुक्ती.
दरवाज्यात अडकून जखमा? चाकणकर-तटकरेेंचे नाव घेत सुषमा अंधारे म्हणाल्या
दरवाज्यात अडकून जखमा? चाकणकर-तटकरेेंचे नाव घेत सुषमा अंधारे म्हणाल्या.
हॉटेलसाठी फक्त एक व्यावसायिक LPG सिलेंडर; प्रशासनाने ठरवले निकष
हॉटेलसाठी फक्त एक व्यावसायिक LPG सिलेंडर; प्रशासनाने ठरवले निकष.
ज्या भुयारी खोलीत महिलांच्या किंकाळ्या घुमल्या, भोंदूबाबाकडून अत्याचार
ज्या भुयारी खोलीत महिलांच्या किंकाळ्या घुमल्या, भोंदूबाबाकडून अत्याचार.
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले....
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले.....
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत.